शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

समाजाने उदारमतवाद, विचारस्वातंत्र्य स्वीकारावे : नरेंद्र चपळगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:07 IST

जागतिक पातळीवरच असहिष्णुतेचे वातावरण असल्याने आज विचारस्वातंत्र्याचे महत्व सांगावे लागत आहे.

ठळक मुद्देपहिला श्री. ग. माजगावकर स्मृतिसन्मान प्रदान समारंभ माणसाचे अस्तिवच विचार करण्याच्या शक्तीवर एक हजार वर्षाचा काळ उदारमतवादाचा व विचारस्वातंत्र्याचा

पुणे : अनेक समाजसुधारकांना समाजातील रुढी-परंपरा बदलताना अडचणी आल्या. कारण ते अल्पमतात तर असहिष्णु लोकांचे बहुमत होते. विरोधकांनी मांडलेल्या मुद्याला आपण किती संयमाने आणि कोणती भाषा वापरून उत्तर देतो, यावर तुमच्यातील विचारस्वातंत्र्याची भावना ठरते. त्यामुळे विचारस्वातंत्र्य आणि उदारमतवादाचा समाजानेच स्वीकार केला तरच तो खरे स्वातंत्र उपभोगु शकेल, असे मत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी येथे व्यक्त केले.डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्र व राजहंस प्रकाशनच्या वतीने रविवारी चपळगावकर यांना पहिला श्री. ग. माजगावकर स्मृतिसन्मान देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे व राजहंस प्रकाशनचे संपादक सदानंद बोरसे व्यासपीठावर उपस्थित होते. चपळगावकर यांनी ‘स्वातंत्र्य : लेखकांचे आणि वाचकांचे’ या विषयावर विचार व्यक्त केले. ते म्हणाले, जागतिक पातळीवरच असहिष्णुतेचे वातावरण असल्याने आज विचारस्वातंत्र्याचे महत्व सांगावे लागत आहे. माणसाचे अस्तिवच विचार करण्याच्या शक्तीवर आहे. एक हजार वर्षाचा काळ उदारमतवादाचा व विचारस्वातंत्र्याचा आहे. हेकेखोरपणा हा सत्तेचा दुर्गण आहे. त्यामुळे सल्ला देणारे विचारवंत समाजात असावे लागतात. ज्ञानाचे शत्रु असणारे जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा काय होते, हे आपण अनेकदा पाहिले आहे. हिंसेने किंवा कायद्याचा गैरवापर करून अधिकार काढू घेतले जातात. असे प्रकार पढे होणार नाही, याची खात्री देता येत नाही.लोकांच्या झुंडशाहीचा विरोध लेखकांना एकट्याला करावा लागतो. साहित्य संस्था त्यांच्या पाठिशी उभ्या राहत नाहीत. त्यामुळे अनेकदा लेखकाच्या मनात विचारांचे द्वंद्व निर्माण होते. त्यावर मात करून जो लेखक लिहितो तो निर्माणशील दृष्टीचे स्वातंत्र टिकवितो. वाड्मय कधीही एका जातीचे, पंथाचे, पक्षाचे नसते. जेवढी बंधने सत्ता घालते त्यापेक्षा जास्त बंधने लेखक स्वत:वर घालतात. लेखकाची सतत भलावण करणारे मित्र हे त्याचे शत्रु असतात. त्यामुळे लेखांनी स्तुतीपासून दुर राहायला हवे.  लेखक हा त्या काळाचा साक्षीदार असतो. त्यामुळे त्याने नेहमी खरे लिखाण करायला हवे. वाचकांचा व लेखकांचा अधिकार समांतर असायला हवा. त्यामुळे वाचकांचे स्वातंत्र्यही टिकवायला हवे. वाचनातून निर्माण होणारे विचारस्वातंत्र्य तरूण पिढी विसरत चालली आहे, असे चपळगावकर यांनी नमुद केले. ......दीर्घ वैचारिक वाड्मयाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात विचारवंतांची वानवा आहे. समाज अनुदार बनतोय. सर्व भ्रष्ट होत चालले आहे. सांस्कृतिक मुल्याच्यादृष्टीने गढूळ, निम्नस्तरीय वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या राजकीय व सामाजिक स्थितीचा विचार केला तर आज विचारवंतांची खुप गरज आहे. संकुचितपणा थोपवायचा असेल तर लोकांपर्यंत समाजातील आदर्श पोहचवायला हवेत.- डॉ. सुधीर रसाळ

टॅग्स :Puneपुणे