शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

समाजाकडे स्वतंत्रतेची प्रेरणा नाही : गजानन खातू

By admin | Updated: May 9, 2017 03:57 IST

गांधी, फुले, आंबेडकर यांच्या नावांचा वापर करण्याखेरीज समाजाला स्वतंत्र काही करण्याची प्रेरणा होत नाही. पूर्वीचे विचार हा ठेवा आहेच;

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गांधी, फुले, आंबेडकर यांच्या नावांचा वापर करण्याखेरीज समाजाला स्वतंत्र काही करण्याची प्रेरणा होत नाही. पूर्वीचे विचार हा ठेवा आहेच; समाज बदललेला नाही. प्रस्थापित व्यवस्थेला तोंड द्यायला नवे विचार आणि नवीन धारणा निर्माण करता आल्या नाहीत. गतिमान आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये काही घटक बाहेर फेकले जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत गजानन खातू यांनी व्यक्त केली.आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त सईद मिर्झालिखित आणि मिलिंद चंपानेरकर अनुवादित ‘लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’ या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारप्राप्त कादंबरीतील काही भागांचे अभिवाचन गजानन परांजपे, वंदना बोकील-कुलकर्णी आणि अमित वझे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. श्रुती तांबे, पुरोगामी कार्यकर्ते संजय मं. गो. आणि कवी गणेश विसपुते उपस्थित होते.सईद मिर्झा यांची ही कलाकृती म्हणजे अस्सल धर्मनिरपेक्ष साहित्य आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे पुस्तक मराठीमध्ये येणे गरजेचे होते. धर्मनिरपेक्षतेचा अभाव असल्याने आपण खूप काही सहन करत आहोत आणि आणखी काही सहन करण्याची चिन्हे दिसत असल्याचे मिलिंद चंपानेरकर यांनी सांगितले. अक्षय वाटवे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कराळे यांनी आभार मानले.