शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

समाजमन बदलण्याची ताकद सनदी सेवेत : चंद्रकांत दळवी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 19:12 IST

आज स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून या क्षेत्रात येऊ पाहणा-या व्यक्तींनी या क्षेत्राला असलेल्या वलयापेक्षा या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या संधीचे सोने कसे करता येईल यादृष्टीने विचार करावा.

ठळक मुद्देविचारांची बैठक पक्की असेल तर आपला विचार आपण शांतपणे देखील मांडू शकतो.

पुणे : तळागाळातील विशेष घटकांचा विकास व्हावा याकरिता मोठ्या प्रमाणावर दातृत्वाची गरज निर्माण झाली आहे. दुस-या बाजूला भवतालची सामाजिक परिस्थिती बदलण्याची ताकद ही सनदी सेवेत आहे, असे मत निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले. महात्मा फुले वसतिगृह या संस्थेतर्फे निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांचा सत्कार ज्येष्ठ विधीज्ञ अँड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात अ‍ॅड. सुरेश गुजराथी, अ‍ॅड. संदिप गुजराथी यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मंत्री शशिकांत सुतार, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. श्रीकृष्ण पाषाणकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या पवन साळुंखे आणि मैथली कोरडे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. दळवी म्हणाले की, उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय मिळावा याकरिता समाजातील दातृत्वान व्यक्तींनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच समाजातील जी परिस्थिती बदलता येत नाही ते बदलण्याची ताकद सनदी सेवेच्या माध्यमातून मिळते. त्याचा नवोदित अधिका-यांनी सदुपयोग क रावा. प्रशासकीय सेवांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे मोठे दालन खुले होत असते. आज स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून या क्षेत्रात येऊ पाहणा-या व्यक्तींनी या क्षेत्राला असलेल्या वलयापेक्षा या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या संधीचे सोने कसे करता येईल यादृष्टीने विचार करावा. आव्हाड म्हणाले, वकिली व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवा करता येते. वकिली व्यवसाय हा भावनिक आणि व्यवहारिक गुंतागुंत सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु विचारांची बैठक पक्की असेल तर आपला विचार आपण शांतपणे देखील मांडू शकतो. ओरडून किंवा मोठ्या आवाजात बोललो म्हणजे आपले म्हणणे खरे ठरत नसते. त्यामुळे वकिलांनी संयम आणि संयत भुमिका ठेवावी. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकृष्ण पाषाणकर, सुरेश गुजराथी आणि संदीप गुजराथी, महात्मा फुले वसतिगृहाचे मुख्य विश्वस्त उल्हास ढोले-पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केली. अरुण कुदळे यांनी  प्रास्ताविक केले. दिपक जगताप यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेChandrakant Dalviचंद्रकांत दळवी