शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

समाजमन बदलण्याची ताकद सनदी सेवेत : चंद्रकांत दळवी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 19:12 IST

आज स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून या क्षेत्रात येऊ पाहणा-या व्यक्तींनी या क्षेत्राला असलेल्या वलयापेक्षा या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या संधीचे सोने कसे करता येईल यादृष्टीने विचार करावा.

ठळक मुद्देविचारांची बैठक पक्की असेल तर आपला विचार आपण शांतपणे देखील मांडू शकतो.

पुणे : तळागाळातील विशेष घटकांचा विकास व्हावा याकरिता मोठ्या प्रमाणावर दातृत्वाची गरज निर्माण झाली आहे. दुस-या बाजूला भवतालची सामाजिक परिस्थिती बदलण्याची ताकद ही सनदी सेवेत आहे, असे मत निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले. महात्मा फुले वसतिगृह या संस्थेतर्फे निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांचा सत्कार ज्येष्ठ विधीज्ञ अँड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात अ‍ॅड. सुरेश गुजराथी, अ‍ॅड. संदिप गुजराथी यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मंत्री शशिकांत सुतार, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. श्रीकृष्ण पाषाणकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या पवन साळुंखे आणि मैथली कोरडे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. दळवी म्हणाले की, उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय मिळावा याकरिता समाजातील दातृत्वान व्यक्तींनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच समाजातील जी परिस्थिती बदलता येत नाही ते बदलण्याची ताकद सनदी सेवेच्या माध्यमातून मिळते. त्याचा नवोदित अधिका-यांनी सदुपयोग क रावा. प्रशासकीय सेवांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे मोठे दालन खुले होत असते. आज स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून या क्षेत्रात येऊ पाहणा-या व्यक्तींनी या क्षेत्राला असलेल्या वलयापेक्षा या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या संधीचे सोने कसे करता येईल यादृष्टीने विचार करावा. आव्हाड म्हणाले, वकिली व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवा करता येते. वकिली व्यवसाय हा भावनिक आणि व्यवहारिक गुंतागुंत सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु विचारांची बैठक पक्की असेल तर आपला विचार आपण शांतपणे देखील मांडू शकतो. ओरडून किंवा मोठ्या आवाजात बोललो म्हणजे आपले म्हणणे खरे ठरत नसते. त्यामुळे वकिलांनी संयम आणि संयत भुमिका ठेवावी. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकृष्ण पाषाणकर, सुरेश गुजराथी आणि संदीप गुजराथी, महात्मा फुले वसतिगृहाचे मुख्य विश्वस्त उल्हास ढोले-पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केली. अरुण कुदळे यांनी  प्रास्ताविक केले. दिपक जगताप यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेChandrakant Dalviचंद्रकांत दळवी