शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

युती सरकारमुळे बिघडले सामाजिक सौख्य

By admin | Updated: July 10, 2015 02:33 IST

राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने एका वर्षातच जनतेचा विश्वास गमावला आहे. सातत्याने मंत्र्यांचे घोटाळे समोर येऊ लागल्याने सरकारची कारभारावरील पकड सुटत चालली आहे.

पुणे : राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने एका वर्षातच जनतेचा विश्वास गमावला आहे. सातत्याने मंत्र्यांचे घोटाळे समोर येऊ लागल्याने सरकारची कारभारावरील पकड सुटत चालली आहे. सामाजिक सलोखा बिघडत असून, दंगली वाढत चालल्या आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली. केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. यात युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे, दीप्ती चवधरी, शरद रणपिसे, उपमहापौर आबा बागूल, शहराध्यक्ष अभय छाजेड, जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष सचिन साठे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, रमेश बागवे, मोहन जोशी, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, मुख्तार शेख, सुनील शिंदे, युवक अध्यक्ष विकास लांडगे सहभागी झाले होते. सत्ताधारी मंत्रीच मुख्यमंत्र्यांच्या गृह खात्यावर टीका करतात. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते भाजपावर टीका करीत आहेत. कोणाचाच कोणाला पायपोस नसल्याची विचित्र परिस्थिती आहे. महिला बालकल्याण विभागाने एकाच दिवशी काढलेल्या २०६ कोटींच्या निविदांचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी अद्याप दिलेले नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास सभागृृह चालू देणार नाही, असा इशारा चव्हाण यांनी दिला. (प्रतिनिधी)