शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

युती सरकारमुळे बिघडले सामाजिक सौख्य

By admin | Updated: July 10, 2015 02:33 IST

राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने एका वर्षातच जनतेचा विश्वास गमावला आहे. सातत्याने मंत्र्यांचे घोटाळे समोर येऊ लागल्याने सरकारची कारभारावरील पकड सुटत चालली आहे.

पुणे : राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने एका वर्षातच जनतेचा विश्वास गमावला आहे. सातत्याने मंत्र्यांचे घोटाळे समोर येऊ लागल्याने सरकारची कारभारावरील पकड सुटत चालली आहे. सामाजिक सलोखा बिघडत असून, दंगली वाढत चालल्या आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली. केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. यात युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे, दीप्ती चवधरी, शरद रणपिसे, उपमहापौर आबा बागूल, शहराध्यक्ष अभय छाजेड, जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष सचिन साठे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, रमेश बागवे, मोहन जोशी, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, मुख्तार शेख, सुनील शिंदे, युवक अध्यक्ष विकास लांडगे सहभागी झाले होते. सत्ताधारी मंत्रीच मुख्यमंत्र्यांच्या गृह खात्यावर टीका करतात. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते भाजपावर टीका करीत आहेत. कोणाचाच कोणाला पायपोस नसल्याची विचित्र परिस्थिती आहे. महिला बालकल्याण विभागाने एकाच दिवशी काढलेल्या २०६ कोटींच्या निविदांचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी अद्याप दिलेले नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास सभागृृह चालू देणार नाही, असा इशारा चव्हाण यांनी दिला. (प्रतिनिधी)