शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

राज्यात साजरा होणार सामाजिक समता सप्ताह

By admin | Updated: April 5, 2015 00:44 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दि. ८ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे.

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दि. ८ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. या कालावधीत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधूत्व या त्रिसूत्रीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याअनुषंगाने राज्यात अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर मागास वर्गातील घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. वंचित, दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत समता प्रस्थापित करण्याचा त्यामागे उद्देश आहे. त्यानिमित्त डॉ. आंबेडकर यांचे समतेचे मूल्य समाजात अधिक रुजावे, यासाठी सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे. त्या माध्यमातून राज्यात सर्वच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या सप्ताहासाठी १ कोटी ८२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण आयुक्त रणजितसिंह देओल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक चळवळीतील विचारवंतांचे समाजप्रबोधन व्याख्यान दि. १३ रोजी आयोजित केले जाणार आहे. पुण्यात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत सप्ताहाची सांगता होईल. (प्रतिनिधी)समता सप्ताहाचे उद्घाटन ८ एप्रिलला सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी एकाच वेळी केले जाणार आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेअंतर्गत कर्जाचे वाटप (दि. ९) लाभार्थ्यांना केले जाईल. दि. ११ रोजी रक्तदान शिबिर व दि. १२ तारखेला अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन आहे.