शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राज्यात साजरा होणार सामाजिक समता सप्ताह

By admin | Updated: April 5, 2015 00:44 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दि. ८ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे.

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दि. ८ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. या कालावधीत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधूत्व या त्रिसूत्रीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याअनुषंगाने राज्यात अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर मागास वर्गातील घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. वंचित, दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत समता प्रस्थापित करण्याचा त्यामागे उद्देश आहे. त्यानिमित्त डॉ. आंबेडकर यांचे समतेचे मूल्य समाजात अधिक रुजावे, यासाठी सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे. त्या माध्यमातून राज्यात सर्वच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या सप्ताहासाठी १ कोटी ८२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण आयुक्त रणजितसिंह देओल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक चळवळीतील विचारवंतांचे समाजप्रबोधन व्याख्यान दि. १३ रोजी आयोजित केले जाणार आहे. पुण्यात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत सप्ताहाची सांगता होईल. (प्रतिनिधी)समता सप्ताहाचे उद्घाटन ८ एप्रिलला सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी एकाच वेळी केले जाणार आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेअंतर्गत कर्जाचे वाटप (दि. ९) लाभार्थ्यांना केले जाईल. दि. ११ रोजी रक्तदान शिबिर व दि. १२ तारखेला अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन आहे.