शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

...तर भामा आसखेड जलवाहिनी होऊ देणार नाही - आमदार सुरेश गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:00 IST

भामा आसखेडमध्ये बाधित झालेल्या अकराशे खातेदारांना शासनाने २५ लाख रु. प्रतिहेक्टरप्रमाणे पॅकेज मोबदला देण्याची धरणग्रस्तांनी एकमुखी मागणी केली आहे.

पाईट : भामा आसखेडमध्ये बाधित झालेल्या अकराशे खातेदारांना शासनाने २५ लाख रु. प्रतिहेक्टरप्रमाणे पॅकेज मोबदला देण्याची धरणग्रस्तांनी एकमुखी मागणी केली आहे. जोपर्यंत पॅकेजची रक्कम खातेदारांना देण्यात येणार नाही, तोपर्यंत जलवाहिनीचे काम पूर्ण होऊ देणार नसल्याचे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले.धरणग्रस्तांच्या पॅकेज संदर्भात रविवारी करंजविहिरे (ता. खेड) येथे भामा आसखेडच्या शासक ीय विश्रामगृहात धरणग्रस्तांच्या आमदार सुरेश गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी भामा आसखेड कृती समितीचे अध्यक्ष रोहिदास गडदे, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, माजी उपसभापती बन्सु होले, माजी सरपंच बळवंत डांगलेम, सत्यवान नवले, दत्तात्रय रौंधळ, किरण चोरघे मल्हारी शिवेकर, देवीदास बांदल, दत्तात्रय होले, बाळासाहेब पापळ, अरुण रौंधळ, दत्तात्रय शिंदे, शंकर रौंधळ, सुदाम शिंदे, गजानन कुडेकर, गणेश जाधव उपस्थित होते. आमदार सुरेश गोरे यांनी शासनाची भूमिका या वेळी धरणग्रस्तांना सांगितली. तसेच त्यांनी उर्वरित धरणग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यासाठी काय तोडगा काढायचा, याबाबत सूचना करण्यास सांगितले. भामा आसखेड धरणामुळे बाधित झालेल्या सर्व धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याशिवाय पुनर्वसन पूर्ण झाले, असे न मानता यासाठी शासनाला ते करायासाठी भाग पाडू असे सांगितले. यामध्ये या पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत बळवंत डांगले व समितीचे अध्यक्ष रोहिदास गडदे यांनी शासनाने धरणग्रस्तांना झुलवत ठेवण्यापेक्षा रोख स्वरूपात सन्मानपूर्वक पॅकेज देण्याची मागणी केली होती. या वेळी तोच धागा पकडून शासन १० लाख प्रतिहेक्टर देय संकलन रजिस्टरप्रमाणे देण्यास तयार आहे. परंतु धरणग्रस्तांनी ती रक्कम स्वीकारणार नसुन २५ लाख रु. प्रतिहेक्टर पॅकेज देणार असाल तर ती घेऊ त्यावर एकमत झाले आहे. ती सर्व रक्कम दिली तर जलवाहिनीचे काम पूर्ण करू देऊ अन्यथा हे काम होऊ देणार नसल्याचे धरणग्रस्तांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे