शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
4
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
5
बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
6
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
7
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
8
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
9
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
10
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
11
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
12
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
13
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
14
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
15
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
16
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
17
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
18
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
19
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
20
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक

 स्मार्ट पुण्याचा अजूनही मूलभूत समस्यांशीच झगडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 16:24 IST

एकीकडे स्मार्ट सिटीचा बोलबाला करणाऱ्या पुणे शहरात अजूनही नागरी समस्येचे मूळ कचरा, पाणी, रस्ते आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येत अडकले असल्याचे समोर आले आहे. 

ठळक मुद्देपुण्यात अजूनही फक्त रस्ते, पाणी, गटारे आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्या  कोणत्याही पक्षाने समस्या न सोडवल्याने समस्या तशाच असल्याची स्वयंसेवी संस्थांची टीका 

पुणे :  एकीकडे स्मार्ट सिटीचा बोलबाला करणाऱ्या पुणे शहरात अजूनही नागरी समस्येचे मूळ कचरा, पाणी, रस्ते आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येत अडकले असल्याचे समोर आले आहे. पुण्यात सध्या सुरु असलेल्या महापौर आपल्या दारी या उपक्रमात ही स्थिती लक्षात आली आहे. त्यामुळे स्मार्ट पुण्यात नागरिकांचा आजही मूलभूत समस्यांशी झगडा सुरु आहे. 

        सुमारे ५ हजार ५९२ कोटी रुपयांचा भरभक्कम अर्थसंकल्प यंदा पुणे महापालिकेने सादर केला. त्यानुसार गेल्या सहा महिन्यात शहरात वेगवेगळ्या योजना राबवण्यास सुरुवातही झाली आहे. याशिवाय शहराच्या काही भागात स्मार्ट सिटी योजना सुरु आहे. त्यातील काही योजना संपूर्ण शहरातही राबवल्या जात आहेत.शहराची लोकसंख्या सध्या सुमारे ४० लाखांच्या आसपास आहे. महापालिकेत नुकतीच ११ गावेही समाविष्ट करण्यात आली. वाढत्या क्षेत्रफळामुळे महापालिकेचे कार्य जास्तीत जास्त विस्तारत आहे. मात्र त्याआधीच शहरात मूलभूत सुविधांची वानवा आहे का असा प्रश्न पडावा अशा समस्या महापौर तुमच्या दारी या उपक्रमातून समोर आल्या आहेत. महापौरांकडे नागरिकांना थेट प्रश्न मांडता यावेत म्हणून सर्व क्षेत्रीय कार्यालयात एक दिवस या प्रमाणे पंधरा दिवस महापौर नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या ऐकून घेतात. शक्य त्या समस्या सोडवण्याचे आदेश देतात. प्रश्न अधिक किचकट असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना वेगाने काम करण्याची सूचना करतात. सध्या महापौर मुक्ता टिळक करत असलेल्या उपक्रमात सर्वाधिक समस्या या रस्ते, गटार, पाणी, भटकी कुत्री अशाच दिसून येत आहेत. एका प्रभागात चार नगरसेवक, क्षेत्रीय कार्यालय अशी सर्व सुविधा असतानाही नागरिक अजूनही मूलभूत समस्यांसोबत झुंजत असल्याचे दुर्दैवी चित्र बघायला मिळत आहे. या समस्या अनेक वर्षांपासून असून कोणत्याही पक्षाचा महापौर झाला तर त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात याच समस्या मांडल्या जात आहेत. त्यामुळे राजकीय मुद्द्यावर गोंधळ घालणारे पक्ष विकासाच्या मुद्द्यावर पुणेकरांना समाधानी करण्यात अपयशी ठरल्याचे दिसते का या विषयावर आम्ही काही स्वयंसेवी संस्थांशी  संवाद साधला. 

सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी बोलताना हे फक्त सोहळे चालू असल्याची प्रतिक्रिया दिली. महापौरांना लोकांपर्यंत जाऊन मूलभूत समस्या सोडवाव्या लागत असतील तर ते स्थानिक नगरसेवकांचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात दिले जाणारे आदेशांचे पुढे काय झाले हेदेखील बघितले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पीपल्स युनियनचे रमेश धर्मवत यांनी या उपक्रमात फक्त मूलभूत समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित नसल्याचे सांगितले. रस्ते, पाणी, गटार असे प्रश्न सोडवायला नगरसेवक आहेतच. महापौरांनी लोकांसमोर करवाढ किंवा पार्किंग पॉलिसी अशा विषयांवर भूमिका मांडणे गरजेचे आहे. असे केले तर हा कार्यक्रम चमकोगिरी ठरणार नाही. 

 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMukta Tilakमुक्ता टिळक