शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

स्मार्ट सिटीत ‘स्मार्ट एन्व्हायर्न्मेंट’चे धोरण - संजय कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 01:20 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सुरू आहे. पायाभूत आणि मूलभूत सुविधांची रेलचेल असल्याने या शहराची स्मार्ट सिटीत गणना होऊ लागली आहे. स्मार्ट होताना पर्यावरण संवर्धनही महत्त्वाचे असते. स्मार्ट सिटीत ‘एन्व्हायर्न्मेंटही स्मार्ट’ असावे, या उद्देशाने प्रदूषण नियंत्रणाच्या विविध उपाययोजना करण्यासाठीचे धोरण तयार करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वेळोवेळी विविध उपाययोजना करणे अत्यावश्यक असते. आरोग्य विभागामार्फत अनेक वर्षे शहरात घनकचरा व्यवस्थापनासह पर्यावरणाशी संबंधित प्रकल्पांची कामे केली जात होती. शास्त्रोक्त पद्धतीने काम व्हावे, या उद्देशाने २०१० मध्ये पर्यावरण अभियांत्रिकी विभाग कार्यरत झाला. या विभागाच्या माध्यमातून सध्या स्मार्ट सिटीत, स्मार्ट एन्व्हायर्न्मेंट असा उद्देश ठेवून काम केले जात आहे.शहरातून रोज ८०० टन कचऱ्याची निर्मिती होते. शहराच्या विविध भागांतून मोशीतील डेपोवर कचरा जमा होतो. मेकॅनिकल कम्पोस्टिंग प्लँटची प्रतिदिन ५०० टन कचºयावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. ३० टन प्रतिदिन गांडूळखत निर्मितीची क्षमता असलेला प्लँट तेथे कार्यरत आहे. प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीचा प्रतिदिन ५ टन कचºयावर प्रक्रिया करण्याचा प्लँट कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणावर जमा होणाºया कचºयावर प्रक्रिया करण्याची मोशी कचरा डेपोची क्षमता आता राहिलेली नाही. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर त्या-त्या भागात कचºयाची विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. नागरिकांनी त्यांच्या सोसायट्यांमध्ये कचºयाचे वर्गीकरण करावे, याबाबत जनजागृती केली जात आहे. शहरात रोज २९० दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी तयार होते. ९ ठिकाणी असलेल्या १३ मैलासांडपाणी केंद्रांची मिळून अंदाजे ३३३ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात प्रतिदिनी २६० ते २५० मैलासांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. आणखी काही सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. शहराच्या विविध भागांतील नाल्यांवाटे मैलापाणी थेट नद्यांमध्ये मिसळते. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून बाहेर पडणारे रसायनमिश्रित पाणीसुद्धा थेट नद्यांना मिळते. त्यामुळे पवना, मुळा, इंद्रायणी या नद्या प्रदूषित झाल्या आहेत.नदी प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आणखी उपाययोजना आखल्या जात आहेत. बांधकाम साहित्याचा राडारोडा टाकल्याने नद्यांचे पात्र उथळ झाले होते. उन्हाळ्यात नद्या कोरड्या न दिसता, पाण्याची डबकी दिसून येतात. हे दूषित पाण्याचे साठे मानवी आरोग्याला बाधा पोहोचवितात. मैला सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने पाण्याचे साठे दूषित झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मैला सांडपाणी थेट नदीत मिसळून नद्यांचे प्रदूषण वाढू नये, याकरिता महापालिकेने ‘नदी सुधार’ प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्याचा प्रकल्प अहवाल, कृती आराखडा तयार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या नदी सुधार प्रकल्पांतर्गत नदीच्या दुतर्फा मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. नदीच्या दोन्ही बाजूंनी येणारे सांडपाणी थेट नदीत न मिसळता, दोन्ही बाजूच्या जलवाहिन्यांमध्ये जमा केले जाईल. पुढे हे मैलासांडपाणी जवळच्या केंद्रावर प्रक्रियेसाठी नेले जाईल. प्रक्रियेनंतर ते नदीत सोडले जाईल. अशा स्वरूपाची नवीन योजना अमलात आणण्याचे प्रस्तावित आहे.शहरातील मोजक्या नामांकित कंपन्यांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहेत. छोट्या कारखान्यांसाठी मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. हवा प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या जात आहेत. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी प्रायोगिक तत्त्वावर यंत्रणा बसविण्यात आली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. महापालिकेने रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी प्रत्येकी १२ हजारांचे अनुदान दिले आहे. उद्यान विभागामार्फत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामागे स्मार्ट सिटीत स्मार्ट एन्व्हायर्न्मेंटचा उद्देश आहे.

टॅग्स :environmentवातावरणnewsबातम्या