शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

दुकान खाली करण्यासाठी टाकला जातोय उतारा; काळ्या जादूचं कृत्य सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 09:34 IST

नवस फेडण्यासाठी, आपल्यावरील अरिष्ट दूर व्हावे म्हणून देवाच्या नावाने उतारा टाकण्याचा प्रकार पूर्वीपासून चालत आला आहे.

पुणे : नवस फेडण्यासाठी, आपल्यावरील अरिष्ट दूर व्हावे म्हणून देवाच्या नावाने उतारा टाकण्याचा प्रकार पूर्वीपासून चालत आला आहे. ही अंधश्रद्धा असली तर अजूनही समाजात त्याविषयी भीती पसरलेली आहे. त्यामुळे असा काही उतारा दिसला तर त्यापासून लांब राहण्याचा प्रकार अजूनही शहरात दिसून येत आहे. लोकांच्या मनातील या अंधश्रद्धेचा गैरफायदा दुकाने, घरे खाली करून घेण्यासाठी केला जाऊ लागला आहे. त्याचा प्रत्यय गोखलेनगरमध्ये असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. शिवसेनेच्या गोखलेनगर शाखेने उभारलेल्या सीसीटीव्हीमधून हा प्रकार उजेडात आला आहे.शिवसेनेच्या गोखलेनगर शाखेतर्फे मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. वेताळबाबा चौक, कुसाळकर पुतळा, अरुण कदम चौक येथील दुकाने, घराबाहेर नारळ, लिंबू व त्याला टोचलेल्या सुया असा उतारा टाकलेला आढळून आला होता. याबाबत शिवसेनेचे शिवाजीनगर मतदारसंघाचे प्रमुख उमेश वाघ आणि उपविभाग प्रमुख प्रकाश धामणे यांनी माहिती दिली. गोखलेनगर शिवसेना शाखेच्या वतीने शाखेसमोर व मैदानात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्याचे चित्रीकरण शाखेमध्ये ठेवण्यात आले आहेत. शाखेसमोरच्या घरमालकाने आमच्या दुकानाबाहेर कोणीतरी उतारा ठेवल्याचे सांगितले. त्यावरून आम्ही सीसीटीव्हीतील चित्रीकरण तपासले. तेव्हा एका दाम्पत्य दुचाकीवरून पहाटेच्या सुमारास त्यातील पुरुष खाली उतरून दुकानाच्या दरवाजात काही वस्तू ठेवतो व त्यानंतर दोघेही तेथून निघून जाताना दिसले. हे चित्रीकरण घरमालकाने पाहिल्यावर त्यातील व्यक्ती पहाटेच्या अंधारात काहीशी अस्पष्ट दिसत होती. तरीही त्यांनी त्याला ओळखले.गेल्या दिवाळीपासून ती व्यक्ती आपल्याकडे दुकान भाड्याने मागत असल्याचे घरमालकांनी सांगितले. दरवाजात लिंबू, त्याला टोचलेल्या सुया असा उतारा मिळाल्यावर लोक आपल्यामागे झंझट नको, म्हणून दुकान सोडून जातील असा त्यामागे होरा असल्याचे उमेश वाघ यांनी सांगितले. असे प्रकार यापूर्वी गोखलेनगर, जनवाडी परिसरात घडलेले आढळून आले आहेत. या भागात मुख्य रोडवर सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी आम्ही यापूर्वी केली होती. पण त्याची लिंक कोठे द्यावी, असा प्रश्न असल्याने शासनाकडे ही मागणी पडून आले. त्यानंतर शिवसेनेने स्वत: हे कॅमेरे बसविल्याने हा प्रकार पुढे येऊ शकला. घरे, दुकाने खाली करवून घेण्यासाठी अशा प्रकारे अंधश्रद्धा पसविण्याचे काम काही जण करीत असून लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वाघ यांनी केले आहे.