शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

विजेचा खोळंबा होऊनही येईना जाग!, बाणेरमधील तीन सोसायट्यांमधील परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 03:12 IST

बाणेर गावठाणातील प्रीमरोझ सोसायटी, दत्त पॅलेस, सनफ्लॉवर मॉल व सोसायटी या इमारतींमधील वीज तांत्रिक बिघाडामुळे रात्री १२ ते सकाळी १० गायब होत होती. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींच्या निवेदनाबाबत महावितरणच्या अधिका-यांनी तक्रारीच खोट्या असल्याची प्रतिक्रिया दिल्याने

पुणे : बाणेर गावठाणातील प्रीमरोझ सोसायटी, दत्त पॅलेस, सनफ्लॉवर मॉल व सोसायटी या इमारतींमधील वीज तांत्रिक बिघाडामुळे रात्री १२ ते सकाळी १० गायब होत होती. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींच्या निवेदनाबाबत महावितरणच्या अधिका-यांनी तक्रारीच खोट्या असल्याची प्रतिक्रिया दिल्याने नागरिक हतबल झाले. तब्बल वर्षभर डीपीवरील वेलींचे जाळी काढण्याची विनंती दुर्लक्षित केली गेल्याने आणि डीपीमध्ये बिघाड झाल्याने सतत पंधरवडाभर नागरिकांचे हाल झाले.महावितरणच्या डीपीच्या खांबावर वेलींनी जाळे केल्याने व तांत्रिक कारणांमुळे वीज जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसामुळे वेली भिजल्यावर शॉर्ट सर्किट होऊन अनेक तास वीजपुरवठा गायब होत असे. ऐन परीक्षेच्या दिवसांमध्ये हा त्रास झाल्याने येथील नागरिकांमध्ये संताप होता. वीज गायब झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून रात्री झोप येणेही अवघड बनल्याचे एका रहिवाशाने नमूद केले.महावितरणच्या औंध कार्यालयाकडे ५ ते ६ हजार मीटर आणि १५ ते २० कर्मचारी आहेत. वीजबिल एखाद्याने भरलेले नसल्यास महावितरणला तत्काळ माहिती मिळण्याची व्यवस्था केली गेली आहे. वीजपुरवठा गायब झालेला असल्यास ते समजण्याची यंत्रणा मात्र नाही, याबद्दल नागरिकांनी खेद व्यक्त केला. बिल न भरल्यास तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्याची तत्परता दाखविणाºया महावितरणकडे रात्रीच्या वेळी कर्मचारीच नसल्याने नागरिकांना नाहक अंधारात बसावे लागले. वेली काढण्याबाबत वारंवार निवेदने, तक्रारी देऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती. गेल्या पंधरवड्यात रोज रात्री वीजपुरवठा गायब होत असे. विद्यार्थ्यांचे, कामावर लवकर जाणाºयांचे विजेअभावी पाणीपुरवठा नसल्याने हाल होत होते. महावितरणचा कर्मचारी बिघाड दुरुस्त करण्यासाठी कधी सकाळी सात, तर कधी दहा वाजता उगवत होता. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते.तीन सोसायट्यांच्या तक्रारीचे निवेदन औंध येथील महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आले. स्थानिक नगरसेवकांकडेही त्याची प्रत देण्यात आली. तथापि, महावितरणच्या अधिकाºयांनी या तक्रारीच खोट्या असल्याचा आरोप केला. सत्य जाणून घेण्याऐवजी, दोषनिवारण करण्याऐवजी खोटेपणाचे आरोप केले गेल्याने निवेदन घेऊन गेलेल्या नागरिकांना वाईट वाटले. तक्रारींचे लेखी अर्ज अधिकाºयांनी तपासून पाहिले पाहिजेत, अशी त्यांची मागणी आहे.महावितरणच्या अधिकाºयांनी नागरिकांच्या प्रश्नांबाबत किमान संवेदनशीलता तरी दाखवावी, अशी या रहिवाशांची अपेक्षा आहे. वीज गायब झाल्याने होणारे हाल अधिकाºयांनी जाणून घेतल्यास तक्रार करण्याची वेळच येणार नाही, असे नागरिकांनी सांगितले.बूरे दिनचा प्रत्ययडीपीवरील वेली काढल्या गेल्याने आठ दिवसांपासून या सोसायट्यांचा वीजपुरवठासुरळीत झाल्याने नागरिकांना किमान दिवाळी तरी साजरी करता आली. औंध महावितरण कार्यालयात रात्रपाळीसाठी कर्मचारी नसल्याने तब्बल १५ दिवस या नागरिकांना वैताग येऊन अच्छे दिनऐवजी बूरे दिनचा प्रत्यय आला. शासनात बदल होऊनही काहीही बदलले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Puneपुणे