शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

देशात रोजगाराची परिस्थिती भयानक : नरसय्या आडम : पुण्यात 'साहित्य संस्कृती संमेलन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 12:51 IST

देशात शिक्षण आणि रोजगाराची परिस्थिती भयानक होत चालली आहे, अशी खंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस नरसय्या आडम यांनी व्यक्त केली. साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

ठळक मुद्देआडम यांच्या हस्ते करण्यात आले साहित्य संस्कृती संमेलनाचे उद्घाटनविषमता वाढल्यामुळे समाज मागे जातो, यासाठी आर्थिक राजकारण कारणीभूत : मुक्ता मनोहर

पुणे : भारतात बावीस कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी सत्तर लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात व इतर फक्त दहावी, बारावीपर्यंतच शिकतात त्यामुळे साक्षरतेचे प्रमाण कमी होऊन पुढे रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही. म्हणूनच देशात शिक्षण आणि रोजगाराची परिस्थिती भयानक होत चालली आहे, अशी खंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस नरसय्या आडम यांनी व्यक्त केली.दलित युवक आयोजित पहिल्या सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आडम यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संमेलन अध्यक्ष लोककलावंत सरुबाई वाघमारे, पुणे मनपा कामगार युनियन अध्यक्ष मुक्ता मनोहर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश राक्षे, दलित युवक आंदोलन अध्यक्ष सचिन बगाडे, ज्येष्ठ कार्यकर्त्या कलावती तुपसुंदर, भारिप सरचिटणीस वसंत साळवे, नगरसेवक सुभाष जगताप, मार्गदर्शक अंकत सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, वैशाली थोरात आदी उपस्थित होते.आडम म्हणाले, १९९५-९६ नंतर जागतिकीकरण आणि खासगीकरण झाले तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर नेत्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल असे सांगितले. त्यानंतर चोवीस वर्षांत बारा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि महाराष्ट्र त्यामध्ये सर्वांत पुढे आहे. ही फारच वाईट गोष्ट आहे. मोदी आल्यापासून यामध्ये ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  मुक्ता मनोहर म्हणाल्या, देशातील विषमता वाढल्यामुळे समाज मागे जातो, यासाठी आर्थिक राजकारण कारणीभूत आहे. आजही तंत्रज्ञान आपण विकसित करू शकलो नाही. हे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. बगाडे म्हणाले, ज्योतिबांनी  स्रियांना ज्ञानाचा हक्क मिळवून दिला. आणि त्यानंतर लहुजी साळवे यांनी आपली मुलगी मुक्ता साळवे हिला शाळेत प्रवेश घेऊन दिला. मुक्ता साळवे ही शाळेत जाणारी पहिली विद्यार्थिनी ठरली. वयाच्या बाराव्या वर्षांपासून मुक्ता यांनी साहित्य लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी साहित्यातून दलितांच्या दु:खाविषयी आणि विषमतावादी गोष्टी समाजासमोर मांडल्या. भारतात साक्षरतेचे प्रमाण कमी असताना शासनाने शाळाबंदीचा निर्णय घेतला. ही फारच धोकादायक बाब आहे. मुक्ता साळवे यांच्या साहित्यातून शिक्षणाबद्दल अनेक उत्तम उदाहरणे मांडली आहेत, तर या संमेलनद्वारे त्या समाजात पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

टॅग्स :Narsayya Adamनरसय्या आडमPuneपुणेManmohan Singhमनमोहन सिंगtechnologyतंत्रज्ञान