शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

साहेब, २२२ खड्ड्यांसाठी जागा आणायची कुठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:13 IST

पावसाळा आला की दर वर्षी शासनस्तरावरून वृक्षारोपणाची लगबग चालू होते. पावसाळ्यापूर्वी झाडे लावण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश पाठविले जातात.

जेजुरी : पावसाळा आला की दर वर्षी शासनस्तरावरून वृक्षारोपणाची लगबग चालू होते. पावसाळ्यापूर्वी झाडे लावण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश पाठविले जातात. विशेषत: संख्येने मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षकांची यात मदत घेतली जाते. या वर्षी एका शाळेने ५५ झाडे लावण्याचा आदेश निघालाय, गेल्याच वर्षी ३० खड्डे खोदून ती झाडे जगवण्याचा प्रयत्नही झाला आहे. आता नव्याने या वर्षी परत ही झाडे लावायची कुठे? असा प्रश्न शाळांसमोर उभा राहिला आहे.खरंतर वृक्षारोपणाची गरज आणि महत्त्व कुणीच नाकारू शकत नाही, पण दरवर्षी त्याच शाळा त्यांच्या ठराविक जागेत किती झाडे लावू शकतात, याचा विचार करण्याची कुवत अधिकाºयांकडे नसावी, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. मुळातच नऊ ते दहा वर्षांपासून चालू असलेला हा विषय गुरुजी त्यांच्या पद्धतीने हाताळत होते. पण यावेळच्या आदेशाने सगळ्यांची गोची झालीय. कारण घेतलेल्या खड्ड्यांची माहिती आॅनलाइन भरायची आहे. खड्ड्यांंचे व लावलेल्या झाडांचे स्वतंत्र फोटो शासनाच्या वेबसाइटवर अपलोड करायचे आहेत. यासाठी शाळांना खरेच जागा उपलब्ध आहे का? याचा विचार न करता आदेश काढणे म्हणजे शासनाची ही दंडेलशाहीच आहे, असा सूर शिक्षकांमधून येत आहे.ज्या शाळांना जागा उपलब्ध होती त्यांनी गेल्यावर्षी खड्डे घेतले आहेत. यावर्षी परत खड्डे घेण्यासाठी जागा कुठे शोधायची, हा प्रश्न बºयाच शाळांसमोर आहे. सर्वच माध्यमांच्या शाळांसाठी यात सहभागी होणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. गेल्यावर्षी काही शाळांनी वृक्षारोपणासाठी शाळेच्या मैदानांचा वापर केला आहे, असेही काही ठिकाणी आढळून आले आहे. एकीकडे मुलांना खेळण्यासाठी अनेक शाळांतून मैदाने नाहीत, दुसरीकडे वृक्षलागवडी करून जागा संपत आलेली आहे.।प्रत्येक वेळी नोकरशाहीचा वापर करून कागदोपत्री योजना यशस्वी करण्यापेक्षा सर्वच घटकांचा यात सहभाग घेतल्यास ही योजना अधिक प्रभावीपणे राबवली जावू शकते. याचा प्रशासकीय पातळीवरून विचार व्हायलाच हवा.