शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, २२२ खड्ड्यांसाठी जागा आणायची कुठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:13 IST

पावसाळा आला की दर वर्षी शासनस्तरावरून वृक्षारोपणाची लगबग चालू होते. पावसाळ्यापूर्वी झाडे लावण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश पाठविले जातात.

जेजुरी : पावसाळा आला की दर वर्षी शासनस्तरावरून वृक्षारोपणाची लगबग चालू होते. पावसाळ्यापूर्वी झाडे लावण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश पाठविले जातात. विशेषत: संख्येने मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षकांची यात मदत घेतली जाते. या वर्षी एका शाळेने ५५ झाडे लावण्याचा आदेश निघालाय, गेल्याच वर्षी ३० खड्डे खोदून ती झाडे जगवण्याचा प्रयत्नही झाला आहे. आता नव्याने या वर्षी परत ही झाडे लावायची कुठे? असा प्रश्न शाळांसमोर उभा राहिला आहे.खरंतर वृक्षारोपणाची गरज आणि महत्त्व कुणीच नाकारू शकत नाही, पण दरवर्षी त्याच शाळा त्यांच्या ठराविक जागेत किती झाडे लावू शकतात, याचा विचार करण्याची कुवत अधिकाºयांकडे नसावी, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. मुळातच नऊ ते दहा वर्षांपासून चालू असलेला हा विषय गुरुजी त्यांच्या पद्धतीने हाताळत होते. पण यावेळच्या आदेशाने सगळ्यांची गोची झालीय. कारण घेतलेल्या खड्ड्यांची माहिती आॅनलाइन भरायची आहे. खड्ड्यांंचे व लावलेल्या झाडांचे स्वतंत्र फोटो शासनाच्या वेबसाइटवर अपलोड करायचे आहेत. यासाठी शाळांना खरेच जागा उपलब्ध आहे का? याचा विचार न करता आदेश काढणे म्हणजे शासनाची ही दंडेलशाहीच आहे, असा सूर शिक्षकांमधून येत आहे.ज्या शाळांना जागा उपलब्ध होती त्यांनी गेल्यावर्षी खड्डे घेतले आहेत. यावर्षी परत खड्डे घेण्यासाठी जागा कुठे शोधायची, हा प्रश्न बºयाच शाळांसमोर आहे. सर्वच माध्यमांच्या शाळांसाठी यात सहभागी होणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. गेल्यावर्षी काही शाळांनी वृक्षारोपणासाठी शाळेच्या मैदानांचा वापर केला आहे, असेही काही ठिकाणी आढळून आले आहे. एकीकडे मुलांना खेळण्यासाठी अनेक शाळांतून मैदाने नाहीत, दुसरीकडे वृक्षलागवडी करून जागा संपत आलेली आहे.।प्रत्येक वेळी नोकरशाहीचा वापर करून कागदोपत्री योजना यशस्वी करण्यापेक्षा सर्वच घटकांचा यात सहभाग घेतल्यास ही योजना अधिक प्रभावीपणे राबवली जावू शकते. याचा प्रशासकीय पातळीवरून विचार व्हायलाच हवा.