शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST

अभिजित कोळपे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करताना अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. किमान मागील १०-१२ ...

अभिजित कोळपे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करताना अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. किमान मागील १०-१२ वर्षांतील आयोगाच्या प्रश्नप्रत्रिकांचे तुलनात्मक (ॲनॅलिसिस) आकलन करावे. त्याचबरोबर आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि आयआरएसची पदे मिळालेल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांचे आकलन करावे. त्याप्रमाणे आपण अभ्यासाचे नियोजन करून पेपर सोडवण्याचा सातत्याने सराव केल्यास यश मिळू शकते. त्याचबरोबर यूपीएससी परीक्षेत दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने करिअरच्या दृष्टीने ‘प्लॅन-बी’चा विचार करावा, असा सल्ला संपूर्ण देशात सन २०१० साली २४४ वी रँक मिळवत भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवडलेले राजीव पांडे देतात. ते सध्या केंद्रशासित प्रदेश लडाख येथे विशेष पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

राजीव पांडे हे मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील प्रतापगड जिल्ह्यातील आहेत. परंतु, त्यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर, महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. विशेष बाब म्हणजे त्यांची मातृभाषा हिंदी असतानाही त्यांनी ‘मराठी’ विषयात पदवी घेतली आहे. तसेच यूपीएससीच्या परीक्षेत त्यांनी मराठी हाच वैकल्पिक विषय घेऊन परीक्षा दिली आहे.

---

पूर्व परीक्षा असो अथवा मुख्य परीक्षा. परीक्षेची तयारी करताना आयोगाच्या मागील १०-१२ वर्षांतील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यात प्रत्येक विषयात कोणत्या प्रश्नाला किती महत्त्व दिले जात आहे. याचा ट्रेंड लक्षात घ्यावा. त्यामुळे त्याप्रमाणे अभ्यासाची दिशा ठरवता येते. पूर्व आणि मुख्य परीक्षेत काही गोष्टी पाठांतराचा भाग असतो. त्या कोणत्या आहेत त्या लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर यापूर्वी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका मिळवाव्यात. त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक क्लासमध्ये उपलब्ध केल्या जातात. त्या मिळवून त्यात यशस्वी विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कसे लिहिले आहेत. त्या प्रश्नाला किती गुण मिळाले आहेत. याचे सूक्ष्म पद्धतीने आकलन, निरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.

बऱ्याच वेळा विद्यार्थी त्याकडे फार गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेबाबतचा फोकस बदलतो. त्यामुळे जे परीक्षेत विचारले जाणार नाही, अशा इतर घटकांचा विनाकरण अभ्यास करत राहतो. त्यात खूप वेळ जातो. त्यामुळे परीक्षेचा अभ्यासक्रम प्रत्येकाने व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. एखाद्या वेळेस आपल्याला तो समजला नाही, तर यशस्वी विद्यार्थी किंवा चांगल्या मार्गदर्शक शिक्षकांकडून समजून घ्यावे. त्याशिवाय अभ्यासाला सुरुवात करू नये. कारण, अभ्यासक्रम नक्की काय आहे, हेच जर समजले नाही तर विनाकारण भलत्याच विषयांचा तासंतास अभ्यास करण्यात वेळ वाया जातो. त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन अभ्यास करावा. त्यासाठी एक वेळ क्लास नाही लावला तरी चालेल; पण योग्य मार्गदर्शन घ्यावे. मी स्वत: गरजेपुरताच क्लास लावला होता; पण यशस्वी विद्यार्थी अधिकाऱ्यांचा सल्ला तसेच क्लासमधील अनुभवी शिक्षकांकडून अडचण आल्यास सातत्याने मार्गदर्शन घेत घरूनच अभ्यास केला आहे.

२५० गुणांसाठी एका विषयावर निबंध लिहितानासुद्धा विशेष काळजी घ्यावी. कारण, निबंधातील गुण आपल्याला हमखास मिळू शकतात. त्यासाठी निंबधाचा विषय तसेच सुरुवात, मध्य आणि शेवट करताना व्यवस्थित करणे गरजेचे आहे. बरेच विद्यार्थी निबंध लिहिताना जसे आठवेल तसे लिहितात. त्यामुळे त्यात विस्कळीतपणा खूप येतो. पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना निबंधाची मांडणी किचकट वाटली तर हातातील गुण जाऊ शकतात. त्यामुळे निबंधाच्या पेपरकडेदेखील गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

फोटो : राजीव पांडे