शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिंधी बांधवांना अखेर मिळाले भारतीय नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 16:30 IST

फाळणी नंतर गेली अनेक वर्षे पाकिस्तानमध्ये हाल साेसणाऱ्या सिंधी बांधवांना अखेर भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.

पुणे : फाळणी नंतर गेली अनेक वर्षे पाकिस्तानमध्ये हाल साेसणाऱ्या सिंधी बांधवांना अखेर भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. पाकिस्तानच्या नागरिकत्वातून त्यांची अखेर त्यांची झाली असून त्यांच्या डाेळ्यात आनंदाश्री दिसत आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज 45 नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद औसंडून वाहत हाेता. 

अनेक वर्षे पाकिस्तानात राहिल्यानंतर अखेर सिंधी बांधवांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. तसेच पुन्हा कधीच पाकिस्तानात जायचे नाही असा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले. गेली अनेक वर्षे हे सिंधी बांधव भारतात राहत आहेत. परंतु त्यांच्याकडे पाकिस्तानचे नागरिकत्व हाेते. यामुळे त्यांना अनेक अडणींचा सामना करावा लागत हाेता. सातत्याने विविध फाॅर्म भरणे, पासपाेर्ट रिनिव्ह करणे, त्याचबराेबर शिक्षण आणि इतर सरकारी कामांमध्ये देखील त्यांना अनेक अडचणी येत हाेता. त्यामुळे भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरु हाेता. अखेर आज त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले असून त्यांना पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. 

यावेळी बाेलताना 45 वर्षांच्या लाज विरवाणी म्हणाल्या, पाकिस्तानमध्ये राहत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. बाहेर काही गडबड झाली तर आम्ही घराबाहेर पडत नव्हताे. माझे पाचवी पर्यंतचेच शिक्षण सिंधी मधून झाले. आम्ही काही वर्षांपूर्वी भारतात येण्याचा विचार केला. त्यानंतर पुन्हा कधीच पाकिस्तानात जायचे नाही असा निर्णय घेतला. परंतु आमच्याकडे पाकिस्तानी पासपाेर्ट हाेता. भारतीय नागरिकत्व नसल्याने अनेक अडचणी येत हाेत्या. परंतु आता भारतीय नागरिकत्व मिळाल्याने खूप आनंद हाेत आहे. 

गेल्या अनेक वर्षे हे सिंधी बांधव पुण्यातील पि्ंपरी भागात राहत आहेत. अजूनही त्यांचे काही बांधव पाकिस्तानामध्ये वास्तव्यास आहेत. भारतीय नागरिकत्व मिळाल्याने त्यांना अत्यंत आनंद झाला असून पुन्हा घरी आल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत हाेती. 

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम म्हणाले, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणीस्तान या देशांमधील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करुन 45 नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या नागरिकांचे कागदपत्र आयबीकडे प्रलंबित हाेते. परंतु गेल्या दाेन महिन्यांपासून या संदर्भात झालेल्या कार्यलयीन कामकाजानंतर नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. प्रमाणपत्र देण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्याची खात्री करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतNavalkishor Ramनवलकिशोर राम