शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिंधी बांधवांना अखेर मिळाले भारतीय नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 16:30 IST

फाळणी नंतर गेली अनेक वर्षे पाकिस्तानमध्ये हाल साेसणाऱ्या सिंधी बांधवांना अखेर भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.

पुणे : फाळणी नंतर गेली अनेक वर्षे पाकिस्तानमध्ये हाल साेसणाऱ्या सिंधी बांधवांना अखेर भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. पाकिस्तानच्या नागरिकत्वातून त्यांची अखेर त्यांची झाली असून त्यांच्या डाेळ्यात आनंदाश्री दिसत आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज 45 नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद औसंडून वाहत हाेता. 

अनेक वर्षे पाकिस्तानात राहिल्यानंतर अखेर सिंधी बांधवांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. तसेच पुन्हा कधीच पाकिस्तानात जायचे नाही असा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले. गेली अनेक वर्षे हे सिंधी बांधव भारतात राहत आहेत. परंतु त्यांच्याकडे पाकिस्तानचे नागरिकत्व हाेते. यामुळे त्यांना अनेक अडणींचा सामना करावा लागत हाेता. सातत्याने विविध फाॅर्म भरणे, पासपाेर्ट रिनिव्ह करणे, त्याचबराेबर शिक्षण आणि इतर सरकारी कामांमध्ये देखील त्यांना अनेक अडचणी येत हाेता. त्यामुळे भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरु हाेता. अखेर आज त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले असून त्यांना पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. 

यावेळी बाेलताना 45 वर्षांच्या लाज विरवाणी म्हणाल्या, पाकिस्तानमध्ये राहत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. बाहेर काही गडबड झाली तर आम्ही घराबाहेर पडत नव्हताे. माझे पाचवी पर्यंतचेच शिक्षण सिंधी मधून झाले. आम्ही काही वर्षांपूर्वी भारतात येण्याचा विचार केला. त्यानंतर पुन्हा कधीच पाकिस्तानात जायचे नाही असा निर्णय घेतला. परंतु आमच्याकडे पाकिस्तानी पासपाेर्ट हाेता. भारतीय नागरिकत्व नसल्याने अनेक अडचणी येत हाेत्या. परंतु आता भारतीय नागरिकत्व मिळाल्याने खूप आनंद हाेत आहे. 

गेल्या अनेक वर्षे हे सिंधी बांधव पुण्यातील पि्ंपरी भागात राहत आहेत. अजूनही त्यांचे काही बांधव पाकिस्तानामध्ये वास्तव्यास आहेत. भारतीय नागरिकत्व मिळाल्याने त्यांना अत्यंत आनंद झाला असून पुन्हा घरी आल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत हाेती. 

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम म्हणाले, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणीस्तान या देशांमधील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करुन 45 नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या नागरिकांचे कागदपत्र आयबीकडे प्रलंबित हाेते. परंतु गेल्या दाेन महिन्यांपासून या संदर्भात झालेल्या कार्यलयीन कामकाजानंतर नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. प्रमाणपत्र देण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्याची खात्री करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतNavalkishor Ramनवलकिशोर राम