शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भामा आसखेडच्या पाण्यावरून वाद पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:28 IST

पुणे : गेले आठ-दहा वर्ष रखडलेला भामा आसखेड प्रकल्प मार्गी लागला आहे. या प्रकल्पामधून पुण्याच्या पूर्व भागाची पाण्याची निकड ...

पुणे : गेले आठ-दहा वर्ष रखडलेला भामा आसखेड प्रकल्प मार्गी लागला आहे. या प्रकल्पामधून पुण्याच्या पूर्व भागाची पाण्याची निकड भागणार आहे. मुळात हा प्रकल्पच येरवडा, वडगाव शेरी, नगर रस्ता, खराडी, चंदननगर आदी भागांतील नागरिकांसाठी राबविला आहे. परंतु, हा प्रकल्प पूर्ण होताच पाणी वाटपावरुन वाद उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण, हे पाणी पुण्यात पोचण्याआधीच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी खडकीसाठी तर, नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी हडपसरसाठी मागणी केली आहे.

भामा आसखेड योजना मागील दोन्ही सरकारच्या काळात रखडली होती. भूसंपादनासह शेतकऱ्यांच्या मोबदल्याचे अनेक प्रश्न, आंदोलने कौशल्याने हाताळत ही योजना पुर्णत्वास आली आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. तर, राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्तेच उद्घाटन करण्याचा चंग बांधला आहे. यामुळे या योजनेच्या पाण्याला वादाची धग जाणवू लागली आहे.

हडपसर भागाला लष्कर जलकेंद्रामधून होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर तो आता हडपसर वानवडी भागाला वळविण्याचा आग्रह सत्ताधारी भाजपने धरला आहे. वडगावशेरी भागाला सोडण्यात येणारे रोजचे दोनशे ‘एमएलडी’ पाणी हडपसरला हवे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविक पुंडे यांनी केली आहे. हे नियोजन केल्यास पूर्व भागामध्ये पुरेसे पाणी मिळेल असे पुंडे यांनी स्पष्ट केले आहे. लष्कर जलकेंद्रातील पूर्व भागाच्या वाट्याचे पाणी अन्य परिसरांना दिल्यास आंदोलनाचा पवित्रा पुंडे यांनी घेतला आहे.

भामा आसखेड योजनेतून पूर्व भागाला पाणीपुरवठा होणार असून त्याच्या अंतिम चाचण्याही झाल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये योजना प्रत्यक्ष कार्यान्वित होईल. त्यानंतर लष्कर जलकेंद्रातून या भागांना होणारा पाणीपुरवठा बंद होणार आहे.

====

सध्या पूर्व भागासाठी खडकवासला धरणामधून लष्कर जलकेंद्रात ४०० एमएलडी पाणी घेतले जाते. त्यातील दोनशे एमएलडी पाणी भामा आसखेडमधून उचलले जाणार असल्याने शिल्लक राहिलेले पाणी अन्य भागाला पुरविण्याचे नियोजन आहे.