शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भामा आसखेडच्या पाण्यावरून वाद पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:28 IST

पुणे : गेले आठ-दहा वर्ष रखडलेला भामा आसखेड प्रकल्प मार्गी लागला आहे. या प्रकल्पामधून पुण्याच्या पूर्व भागाची पाण्याची निकड ...

पुणे : गेले आठ-दहा वर्ष रखडलेला भामा आसखेड प्रकल्प मार्गी लागला आहे. या प्रकल्पामधून पुण्याच्या पूर्व भागाची पाण्याची निकड भागणार आहे. मुळात हा प्रकल्पच येरवडा, वडगाव शेरी, नगर रस्ता, खराडी, चंदननगर आदी भागांतील नागरिकांसाठी राबविला आहे. परंतु, हा प्रकल्प पूर्ण होताच पाणी वाटपावरुन वाद उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण, हे पाणी पुण्यात पोचण्याआधीच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी खडकीसाठी तर, नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी हडपसरसाठी मागणी केली आहे.

भामा आसखेड योजना मागील दोन्ही सरकारच्या काळात रखडली होती. भूसंपादनासह शेतकऱ्यांच्या मोबदल्याचे अनेक प्रश्न, आंदोलने कौशल्याने हाताळत ही योजना पुर्णत्वास आली आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. तर, राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्तेच उद्घाटन करण्याचा चंग बांधला आहे. यामुळे या योजनेच्या पाण्याला वादाची धग जाणवू लागली आहे.

हडपसर भागाला लष्कर जलकेंद्रामधून होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर तो आता हडपसर वानवडी भागाला वळविण्याचा आग्रह सत्ताधारी भाजपने धरला आहे. वडगावशेरी भागाला सोडण्यात येणारे रोजचे दोनशे ‘एमएलडी’ पाणी हडपसरला हवे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविक पुंडे यांनी केली आहे. हे नियोजन केल्यास पूर्व भागामध्ये पुरेसे पाणी मिळेल असे पुंडे यांनी स्पष्ट केले आहे. लष्कर जलकेंद्रातील पूर्व भागाच्या वाट्याचे पाणी अन्य परिसरांना दिल्यास आंदोलनाचा पवित्रा पुंडे यांनी घेतला आहे.

भामा आसखेड योजनेतून पूर्व भागाला पाणीपुरवठा होणार असून त्याच्या अंतिम चाचण्याही झाल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये योजना प्रत्यक्ष कार्यान्वित होईल. त्यानंतर लष्कर जलकेंद्रातून या भागांना होणारा पाणीपुरवठा बंद होणार आहे.

====

सध्या पूर्व भागासाठी खडकवासला धरणामधून लष्कर जलकेंद्रात ४०० एमएलडी पाणी घेतले जाते. त्यातील दोनशे एमएलडी पाणी भामा आसखेडमधून उचलले जाणार असल्याने शिल्लक राहिलेले पाणी अन्य भागाला पुरविण्याचे नियोजन आहे.