शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
6
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
7
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
8
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
9
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
10
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
11
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
12
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
13
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
14
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
15
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
16
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
17
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
18
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
19
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
20
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

श्रीमंत महापालिका भंगार विक्रीतही ‘श्रीमंत’

By admin | Updated: July 3, 2015 23:54 IST

एकेक करून अनेक चीजवस्तू निकालात काढून त्यांच्या विक्रीतून भांडार विभागाला २०१३-१४ या आर्थिक वर्षात थोडेथोडके नव्हे, तर मागील २ कोटी ५१ लाख ८१ हजार

अंकुश जगताप , पिंपरीपिंपरी : एकेक करून अनेक चीजवस्तू निकालात काढून त्यांच्या विक्रीतून भांडार विभागाला २०१३-१४ या आर्थिक वर्षात थोडेथोडके नव्हे, तर मागील २ कोटी ५१ लाख ८१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे आधीच श्रीमंत असणारी पिंपरी-चिंचवड महापालिका भंगार विक्रीतूनही मालामाल झाल्याचे बोलले जात आहे. शहरामध्ये विविध प्रभागांच्या अखत्यारीत असणाऱ्या भागामध्ये वेळोवेळी जुने साहित्य, यंत्रसामग्री बदलून त्या जागी नूतनीकरण केले जात आहे. त्यामध्ये जुने पथदिवे बदलण्याच्या कामाचा धडाका सर्वत्र राबविला जात आहे. त्यासाठी केवळ पथदिवेच नाही, तर आधीचे संपूर्ण खांबच बदलले जात आहेत. शहरभरात मागील २ वर्षांत बहुतांश प्रभागांमधील पथदिव्यांचे खांब बदलले आहेत. असे खांब आणि विद्युत बल्ब, इलेक्ट्रॉनिक साहित्य यांचे ढीग पालिकेच्या भांडार विभागात जमा झाले. मागील काही वर्षांमध्ये शहरात अतिक्रमण विभागाकडून विविध ठिकाणी जोरदार कारवाई करण्यात आली आहे. शहरभरात जाहिरातफलकांचा सुळसुळाट वाढला आहे. अशा फलकांवर सध्या शहरभर कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यात जाहिरातफलकांच्या लोखंडी चौकटी काढून त्या जप्त केल्या जात आहेत. विविध प्रभागांच्या आवारात अशा भंगारात काढलेल्या चौकटींचे ढीग पडत आहेत. दुसरीकडे शहरभरातील टपरी-पथारीवाल्यांवरही कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागातर्फे मागील काही वर्षांमध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रावेतच्या जलउपसा केंद्रापासून ते निगडीपर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलली आहे. यासह अनेक प्रभागांमधील लहान-मोठ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती अथवा नूतनीकरण करण्यात आल्याने जुन्या जलवाहिन्या भंगारात निघाल्या आहेत. याचबरोबर पंपसेट, पाणीवितरणाचे व्हॉल्व्ह यासह विविध विभागांमधील फर्निचर, शाळांमधील बाकडे, कार्यालयीन वस्तू व उपकरणांचाही त्यामध्ये समावेश आहे. कालबाह्य झालेल्या वाहनांचे टायर, ट्यूब, गिअर बॉक्स व भंगारात निघालेल्या विविध साहित्याचीही त्यामध्ये भर पडली आहे. मागील २ वर्षांमध्ये साठलेल्या अशा साहित्याचा लिलाव केला.चालू आर्थिक वर्षातील प्रलंबित लिलावाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या वर्षी अतिक्रमण विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई करून साहित्य जप्त केले आहे. इतर विभागांकडूनही साहित्य जमा झाले आहे. त्याची लिलाव प्रक्रिया पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महापालिका सभेपुढे हा विषय मान्यतेसाठी आहे. दोन महिन्यांत हा लिलावही पूर्ण होईल. त्यातून महापालिकेला कोट्यवधींचे उत्पन्न मिळणार आहे. - दिलीप गावडे (भांडार व्यवस्थापक, पिंपरी-चिंचवड महापालिका)