शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

शिवशंभूंच्या विचारांची समाजाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:47 IST

भारतात सर्व समाज एकत्र ठेवायचा असेल तर छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शंभूराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. जयंती पुण्यतिथी नावापुरती साजरी न करता शिवशंभू छत्रपतींचा विचार दैनंदिन जीवनात अंगिकारला तरच खऱ्या अर्थाने शिवशंभूना मानवंदना ठरू शकते

कोरेगाव भीमा : भारतात सर्व समाज एकत्र ठेवायचा असेल तर छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शंभूराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. जयंती पुण्यतिथी नावापुरती साजरी न करता शिवशंभू छत्रपतींचा विचार दैनंदिन जीवनात अंगिकारला तरच खऱ्या अर्थाने शिवशंभूना मानवंदना ठरू शकते त्याचवेळी महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिवरायांप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही योगदान मोठे आहे, हेही सर्व समाजांनी विसरता कामा नये, असे पुणे ग्रामीण अधीक्षक सुवेझ हक यांनी सांगितलेछत्रपती संभाजीमहाराजांचा ३२९ वा बलिदानस्मरण दिन १७ मार्च रोजी श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे होणार आहे. १ जानेवारी कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमिवर परिसरात सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली सणसवाडी, वढू बुद्रुक व कोरेगाव भीमा येथे सर्व समाजातील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले , प्रांताधिकारी भाऊ गलंडे, शिरूर तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी संदीप जठार, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, तिन्ही गावाचे दोन्ही समाजाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी सांगितले की , ‘१ जानेवारी दंगलीमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक हानी झाली आहे. शासन नुकसान भरपाई देईल. मात्र मनामध्ये निर्माण झालेली पोकळी दोन महिन्यांनंतरही भरू शकली नाही. जोपर्यंत ही मनातील पोकळी भरू शकत नाही, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होणार नाही, यासाठी गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी व वयोवृद्ध नागरिकांनी पुढाकार घेऊन तरुणांना विश्वासात घेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी प्रशासन व नागरिक एकाचनाण्याच्या दोन बाजू आहेत. गावामध्ये सामाजिक सालोख्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.यावेळी सणसवाडी येथे झालेल्या बैठकीत नागरिकांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की , ‘गावात सामाजिक सलोखा या आधीही प्रस्थापित असून यापुढेही अबाधित राहील, अशी ग्वाही यावेळी दिली तर गावातील तरुणांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असल्याने तरुण मानसिकरित्या तणावाखाली राहत असल्याने पोलिसांनी सहकार्य करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली. वढू बुद्रुक येथील बैठकीत वढू-चौफुला व वढू-कोरेगाव भीमा रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी करतानाच दिशादर्शक फलक लावण्याचीही मागणी यावेळी केली. गेली ४ वर्षापासून शासकीय मानवंदना देण्यात येत असुन यापुढेही शासकीय मानवंदना देण्यात यावी अशी सूचना यावेळी केली.कोरेगाव भीमा येथे झालेल्या बैठकीत नागरिकांनी नुकसान भरपाई तात्काळ मिळण्याची मागणी करतानाच १ जानेवारी रोजी स्वरक्षणासाठी केलेल्या प्रतिकारातून स्थानिकांवर झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.>मोबाइल मेसेजेसमुळे वितुष्टमोबाइलवर आलेल्या मेसेज समाजविघातक असलेतरी ते अनेकांना पाठविण्याची स्पर्धाच तरुणांमध्ये लागल्याने समाजात वितुष्ट निर्माण होऊ लागले आहे. यासाठी तरुणांनी आपल्या मोबाइलचा योग्य वापर करणे गरजेचे आहे; नाहीतर विघातक संदेश पसरविणारांवर कारवाई होणारच असल्याचे सुवेझ हक यांनी सांगितले.>बेकायदा फ्लेक्स काढण्यासाठी मदतविनापरवाना लावलेले फ्लेक्स काढण्यासाठी पोलीस बळ देऊन त्याचवेळी फ्लेक्स लावण्यासाठी ग्रामपंचायतीची सशुल्क परवानगी गरजेची असून तो फ्लेक्स काढण्याची व त्याची संरक्षणाची जबाबदारी फ्लेक्स लावणारावरच असेल त्याचप्रमाणे गावातील पुतळ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही पुतळा बसवणारांचीच असेल, असेही सुवेझ हक यांनी सांगितले.