शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शिवशंभूंच्या विचारांची समाजाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:47 IST

भारतात सर्व समाज एकत्र ठेवायचा असेल तर छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शंभूराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. जयंती पुण्यतिथी नावापुरती साजरी न करता शिवशंभू छत्रपतींचा विचार दैनंदिन जीवनात अंगिकारला तरच खऱ्या अर्थाने शिवशंभूना मानवंदना ठरू शकते

कोरेगाव भीमा : भारतात सर्व समाज एकत्र ठेवायचा असेल तर छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शंभूराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. जयंती पुण्यतिथी नावापुरती साजरी न करता शिवशंभू छत्रपतींचा विचार दैनंदिन जीवनात अंगिकारला तरच खऱ्या अर्थाने शिवशंभूना मानवंदना ठरू शकते त्याचवेळी महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिवरायांप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही योगदान मोठे आहे, हेही सर्व समाजांनी विसरता कामा नये, असे पुणे ग्रामीण अधीक्षक सुवेझ हक यांनी सांगितलेछत्रपती संभाजीमहाराजांचा ३२९ वा बलिदानस्मरण दिन १७ मार्च रोजी श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे होणार आहे. १ जानेवारी कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमिवर परिसरात सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली सणसवाडी, वढू बुद्रुक व कोरेगाव भीमा येथे सर्व समाजातील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले , प्रांताधिकारी भाऊ गलंडे, शिरूर तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी संदीप जठार, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, तिन्ही गावाचे दोन्ही समाजाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी सांगितले की , ‘१ जानेवारी दंगलीमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक हानी झाली आहे. शासन नुकसान भरपाई देईल. मात्र मनामध्ये निर्माण झालेली पोकळी दोन महिन्यांनंतरही भरू शकली नाही. जोपर्यंत ही मनातील पोकळी भरू शकत नाही, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होणार नाही, यासाठी गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी व वयोवृद्ध नागरिकांनी पुढाकार घेऊन तरुणांना विश्वासात घेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी प्रशासन व नागरिक एकाचनाण्याच्या दोन बाजू आहेत. गावामध्ये सामाजिक सालोख्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.यावेळी सणसवाडी येथे झालेल्या बैठकीत नागरिकांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की , ‘गावात सामाजिक सलोखा या आधीही प्रस्थापित असून यापुढेही अबाधित राहील, अशी ग्वाही यावेळी दिली तर गावातील तरुणांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असल्याने तरुण मानसिकरित्या तणावाखाली राहत असल्याने पोलिसांनी सहकार्य करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली. वढू बुद्रुक येथील बैठकीत वढू-चौफुला व वढू-कोरेगाव भीमा रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी करतानाच दिशादर्शक फलक लावण्याचीही मागणी यावेळी केली. गेली ४ वर्षापासून शासकीय मानवंदना देण्यात येत असुन यापुढेही शासकीय मानवंदना देण्यात यावी अशी सूचना यावेळी केली.कोरेगाव भीमा येथे झालेल्या बैठकीत नागरिकांनी नुकसान भरपाई तात्काळ मिळण्याची मागणी करतानाच १ जानेवारी रोजी स्वरक्षणासाठी केलेल्या प्रतिकारातून स्थानिकांवर झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.>मोबाइल मेसेजेसमुळे वितुष्टमोबाइलवर आलेल्या मेसेज समाजविघातक असलेतरी ते अनेकांना पाठविण्याची स्पर्धाच तरुणांमध्ये लागल्याने समाजात वितुष्ट निर्माण होऊ लागले आहे. यासाठी तरुणांनी आपल्या मोबाइलचा योग्य वापर करणे गरजेचे आहे; नाहीतर विघातक संदेश पसरविणारांवर कारवाई होणारच असल्याचे सुवेझ हक यांनी सांगितले.>बेकायदा फ्लेक्स काढण्यासाठी मदतविनापरवाना लावलेले फ्लेक्स काढण्यासाठी पोलीस बळ देऊन त्याचवेळी फ्लेक्स लावण्यासाठी ग्रामपंचायतीची सशुल्क परवानगी गरजेची असून तो फ्लेक्स काढण्याची व त्याची संरक्षणाची जबाबदारी फ्लेक्स लावणारावरच असेल त्याचप्रमाणे गावातील पुतळ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही पुतळा बसवणारांचीच असेल, असेही सुवेझ हक यांनी सांगितले.