शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
4
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
5
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
6
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
7
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
8
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
9
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
10
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
11
"लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"
12
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
13
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
15
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
16
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
17
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
18
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
19
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
20
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
Daily Top 2Weekly Top 5

शिवशंभूंच्या विचारांची समाजाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:47 IST

भारतात सर्व समाज एकत्र ठेवायचा असेल तर छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शंभूराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. जयंती पुण्यतिथी नावापुरती साजरी न करता शिवशंभू छत्रपतींचा विचार दैनंदिन जीवनात अंगिकारला तरच खऱ्या अर्थाने शिवशंभूना मानवंदना ठरू शकते

कोरेगाव भीमा : भारतात सर्व समाज एकत्र ठेवायचा असेल तर छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शंभूराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. जयंती पुण्यतिथी नावापुरती साजरी न करता शिवशंभू छत्रपतींचा विचार दैनंदिन जीवनात अंगिकारला तरच खऱ्या अर्थाने शिवशंभूना मानवंदना ठरू शकते त्याचवेळी महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिवरायांप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही योगदान मोठे आहे, हेही सर्व समाजांनी विसरता कामा नये, असे पुणे ग्रामीण अधीक्षक सुवेझ हक यांनी सांगितलेछत्रपती संभाजीमहाराजांचा ३२९ वा बलिदानस्मरण दिन १७ मार्च रोजी श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे होणार आहे. १ जानेवारी कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमिवर परिसरात सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली सणसवाडी, वढू बुद्रुक व कोरेगाव भीमा येथे सर्व समाजातील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले , प्रांताधिकारी भाऊ गलंडे, शिरूर तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी संदीप जठार, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, तिन्ही गावाचे दोन्ही समाजाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी सांगितले की , ‘१ जानेवारी दंगलीमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक हानी झाली आहे. शासन नुकसान भरपाई देईल. मात्र मनामध्ये निर्माण झालेली पोकळी दोन महिन्यांनंतरही भरू शकली नाही. जोपर्यंत ही मनातील पोकळी भरू शकत नाही, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होणार नाही, यासाठी गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी व वयोवृद्ध नागरिकांनी पुढाकार घेऊन तरुणांना विश्वासात घेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी प्रशासन व नागरिक एकाचनाण्याच्या दोन बाजू आहेत. गावामध्ये सामाजिक सालोख्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.यावेळी सणसवाडी येथे झालेल्या बैठकीत नागरिकांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की , ‘गावात सामाजिक सलोखा या आधीही प्रस्थापित असून यापुढेही अबाधित राहील, अशी ग्वाही यावेळी दिली तर गावातील तरुणांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असल्याने तरुण मानसिकरित्या तणावाखाली राहत असल्याने पोलिसांनी सहकार्य करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली. वढू बुद्रुक येथील बैठकीत वढू-चौफुला व वढू-कोरेगाव भीमा रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी करतानाच दिशादर्शक फलक लावण्याचीही मागणी यावेळी केली. गेली ४ वर्षापासून शासकीय मानवंदना देण्यात येत असुन यापुढेही शासकीय मानवंदना देण्यात यावी अशी सूचना यावेळी केली.कोरेगाव भीमा येथे झालेल्या बैठकीत नागरिकांनी नुकसान भरपाई तात्काळ मिळण्याची मागणी करतानाच १ जानेवारी रोजी स्वरक्षणासाठी केलेल्या प्रतिकारातून स्थानिकांवर झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.>मोबाइल मेसेजेसमुळे वितुष्टमोबाइलवर आलेल्या मेसेज समाजविघातक असलेतरी ते अनेकांना पाठविण्याची स्पर्धाच तरुणांमध्ये लागल्याने समाजात वितुष्ट निर्माण होऊ लागले आहे. यासाठी तरुणांनी आपल्या मोबाइलचा योग्य वापर करणे गरजेचे आहे; नाहीतर विघातक संदेश पसरविणारांवर कारवाई होणारच असल्याचे सुवेझ हक यांनी सांगितले.>बेकायदा फ्लेक्स काढण्यासाठी मदतविनापरवाना लावलेले फ्लेक्स काढण्यासाठी पोलीस बळ देऊन त्याचवेळी फ्लेक्स लावण्यासाठी ग्रामपंचायतीची सशुल्क परवानगी गरजेची असून तो फ्लेक्स काढण्याची व त्याची संरक्षणाची जबाबदारी फ्लेक्स लावणारावरच असेल त्याचप्रमाणे गावातील पुतळ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही पुतळा बसवणारांचीच असेल, असेही सुवेझ हक यांनी सांगितले.