शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

शिवाजी महाराजांनी रयतेच्या नावाने राज्य चालवले, त्यांचा आर्दश घेण्याची गरज : शरद पवार

By अजित घस्ते | Updated: June 6, 2023 17:26 IST

घराण्याच्या नावाने राज्य चालवंल नाही तर रयतेचं राज्य चालवले याचा आर्दश घेण्याची गरज...

पुणे : देशात अनेक राजे होऊन गेले, देवगिरीचे यादव, दिल्लीचे मुघल, आदिलशाह होऊन गेले. अशी अनेकांची नावे सांगता येतील ज्यांनी राज्य केलं. पण त्यांचं राज्य त्यांच्या घराण्याच्या नावाने चाललं. याला एकच अपवाद म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी जातीपातीच्या पलीकडे भेदभाव न करता रयतेचे राज्य केले. त्यांनी कधी भोसल्यांचं राज्य केलं नाही. तर त्यांनी उभं केलं ते हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य. साडेतीनशे वर्षाच्या इतिहासात आजही सर्वसामान्य माणसांच्या अंतःकरणात रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते. त्यांचा आर्दश डोळ्यासमोर ठेवला जातो. रयतेचं राज्य चालवायचे असले तर छत्रपतीचा आर्दश घेण्याची गरज असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने लाल महालात ३५० वर्षे व्या शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अभिषेक शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार वंदना चव्हाण, आमदार रवींद्र धंगेकर, विकास पासलकर, काँग्रेसचे मोहन जोशी, दीपक मानकर, चंद्रकांत मोकाटे, रोहित टिळक, चित्रलेखा संपादक ज्ञानेश महाराव, ज्ञानेश्वर मोळक, राजाभाऊ पासलकर, संतोष शिंदे तसेच विविध राजकीय पक्षातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज वैदिक विद्यालयात धार्मिक विधीचे प्रशिक्षण घेतलेले शिवसेवक कैलास वडघुले यांनी राज्याभिषेक विधी पार पाडले. शस्र पूजन, शेतकऱ्यांच्या शेतात पिकवलेली फळे, धान्य यांच पूजन, छत्रपती शिवराय त्यांच्या नित्य वापरातील कवड्याच्या माळेचे पूजन, राजमुद्रेचे पूजन करण्यात आले. तसेच संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे पूजन करण्यात आले. समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड