शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

शिवचरित्राची आजच्या काळात सर्वाधिक गरज - गीता उपासनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 03:56 IST

महाभारत, रामायणाचे संस्कार करूनच शिवरायांसारखा शिवसूर्य जन्माला येतो. आज शिवचरित्राची जितकी आवश्यकता आहे, तितकी आवश्यकता यापूर्वी कधीच नव्हती. शिवरायांना समजून घेण्यासाठी आधी जिजाऊंसारख्या मातेला समजून घ्यायला हवे.

पुणे - महाभारत, रामायणाचे संस्कार करूनच शिवरायांसारखा शिवसूर्य जन्माला येतो. आज शिवचरित्राची जितकी आवश्यकता आहे, तितकी आवश्यकता यापूर्वी कधीच नव्हती. शिवरायांना समजून घेण्यासाठी आधी जिजाऊंसारख्या मातेला समजून घ्यायला हवे. आपल्यामधील शिवज्योत आपण विझवत आहोत. प्रत्येकाने ज्योतीने ज्योत पेटवायला हवी. शिवरायांचा लढा हा जिहादी आतंकवाद्यांविरुद्ध आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होता. शिवरायांचे चरित्र हे सर्व प्रश्न सोडवणारे असून ते समजून घेण्याची सर्वाधिक गरज आहे, असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्यात्या गीता उपासनी यांनी केले.लाल महाल येथे समस्त हिंदू आघाडी, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, लाल महाल उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पौष पौर्णिमा व राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त मातृगौरव पुरस्कार प्रदान केले, त्या वेळी त्या बोलत होत्या. प्रा. संगीता मावळे, प्रीती शिंदे, चारुलता काळे, सारिका वारुळे, दीपाली गिते, उषा फडतरे, दीपाली झेंडे, अ‍ॅड. मोहन डोंगरे, शाहीर हेमंतराजे मावळे, नंदू एकबोटे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी बबई फडतरे, शकुंतला देशमाने, विजया कुलकर्णी, गीता हेंद्रे, चंद्रभागा काळे या मातांना मातृगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गीता उपासनी म्हणाल्या, ‘‘देवाधर्माची होणारी विंटबना ही महाराजांना पटणारी नव्हती. अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा यज्ञ केला. तीर्थक्षेत्रे मुक्त व्हावीत, हे त्यांचे ध्येय शेवटच्या क्षणापर्यंत होते आणि त्यासाठी ते लढत राहिले. जिथे हिंदू धर्म एकवटतो, ती तीर्थक्षेत्र आहेत. हिंदूधर्माचे हे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची आज गरज आहे.’’

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMaharashtraमहाराष्ट्र