शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिवचरित्राची आजच्या काळात सर्वाधिक गरज - गीता उपासनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 03:56 IST

महाभारत, रामायणाचे संस्कार करूनच शिवरायांसारखा शिवसूर्य जन्माला येतो. आज शिवचरित्राची जितकी आवश्यकता आहे, तितकी आवश्यकता यापूर्वी कधीच नव्हती. शिवरायांना समजून घेण्यासाठी आधी जिजाऊंसारख्या मातेला समजून घ्यायला हवे.

पुणे - महाभारत, रामायणाचे संस्कार करूनच शिवरायांसारखा शिवसूर्य जन्माला येतो. आज शिवचरित्राची जितकी आवश्यकता आहे, तितकी आवश्यकता यापूर्वी कधीच नव्हती. शिवरायांना समजून घेण्यासाठी आधी जिजाऊंसारख्या मातेला समजून घ्यायला हवे. आपल्यामधील शिवज्योत आपण विझवत आहोत. प्रत्येकाने ज्योतीने ज्योत पेटवायला हवी. शिवरायांचा लढा हा जिहादी आतंकवाद्यांविरुद्ध आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होता. शिवरायांचे चरित्र हे सर्व प्रश्न सोडवणारे असून ते समजून घेण्याची सर्वाधिक गरज आहे, असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्यात्या गीता उपासनी यांनी केले.लाल महाल येथे समस्त हिंदू आघाडी, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, लाल महाल उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पौष पौर्णिमा व राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त मातृगौरव पुरस्कार प्रदान केले, त्या वेळी त्या बोलत होत्या. प्रा. संगीता मावळे, प्रीती शिंदे, चारुलता काळे, सारिका वारुळे, दीपाली गिते, उषा फडतरे, दीपाली झेंडे, अ‍ॅड. मोहन डोंगरे, शाहीर हेमंतराजे मावळे, नंदू एकबोटे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी बबई फडतरे, शकुंतला देशमाने, विजया कुलकर्णी, गीता हेंद्रे, चंद्रभागा काळे या मातांना मातृगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गीता उपासनी म्हणाल्या, ‘‘देवाधर्माची होणारी विंटबना ही महाराजांना पटणारी नव्हती. अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा यज्ञ केला. तीर्थक्षेत्रे मुक्त व्हावीत, हे त्यांचे ध्येय शेवटच्या क्षणापर्यंत होते आणि त्यासाठी ते लढत राहिले. जिथे हिंदू धर्म एकवटतो, ती तीर्थक्षेत्र आहेत. हिंदूधर्माचे हे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची आज गरज आहे.’’

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMaharashtraमहाराष्ट्र