शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक तयार केली पुढे अटलजी, अडवाणी आणि मोदींनी त्यावर कळस चढवला- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 13:25 IST

भारतीय जनता पक्षात जे-जे संयम ठेवतात त्यांना सब्र का फल मीठा है याचा अनुभव येतो- चंद्रकांत पाटील

पुणे: वर्षानुवर्षे मेहनत घेऊन वोटबँक तयार केली जाते. ही वोटबँक संत-महंतपर्यंत पोहोचते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही हिंदुत्वाची वोटबँक तयार केली होती. त्यावर अलीकडच्या काळात अटलजी, अडवाणी आणि मोदींनी कळस चढवला. त्यामुळे तिकीट पक्षाचे असते, वोटबँक पक्षाची असते. त्यामुळे कर्तुत्व पाहून एखाद्या व्यक्तीला तिकीट दिले जाते, असे सांगत भारतीय जनता पक्ष कुणावरही उगाच अन्याय करत नसल्याचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या उमेदवारांची तिकीटं कापली त्यांना न्याय मिळणार का असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. त्यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, तयार असलेली वोटबँक तुम्हाला मिळते, त्यासाठी थोडासा तुमचा चेहरा, तुमचं नाव त्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळे माझं तिकीट कापलं म्हणून मी नाराज अशी कार्यपद्धतीच भाजपात नाही. परंतु एखाद्याचं तिकीट कापल्यानंतर माणूस म्हणून काही वेळ नाराज वाटतं. चंद्रकांत बावनकुळे यांच्या आयुष्यात त्या दिवशी काय प्रसंग आला होता त्याचा साक्षीदार मी आहे. परंतु त्या कुटुंबाने हे विष पचवलं आणि त्याचं यश त्यांना आज मिळालं. 

भारतीय जनता पक्षात जे-जे संयम ठेवतात त्यांना 'सब्र का फल मीठा है' याचा अनुभव येतो. विनोद तावडे, पंकजा मुंडे राष्ट्रीय राजकारणात गेल्या. भारतीय जनता पक्ष कुणावरही उगाच अन्याय करत नाही. काहीतरी कारण घडलेलं असतं. काळाच्या ओघात ते सर्व नीट करण्याचा पक्षाचा प्रामाणिक प्रयत्न असतो.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडchandrakant patilचंद्रकांत पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदी