शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

महायुतीचा घटक पक्ष 'शिवसंग्राम' लोकसभेच्या तीन तर विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही

By राजू हिंगे | Updated: January 16, 2024 20:09 IST

भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील

पुणे : महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत तीन, तर विधानसभा निवडणुकीत बारा जागांसाठी आग्रही आहे, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी  दिली. आगामी काळातील निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणि संघटन बांधणीसाठी शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर पार पडले.  त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. 

यावेळी शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे, शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, प्रदेश सचिव शेखर पवार, हिंदुराव जाधव, ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, खजिनदार रामनाथ जगदाळे, पुणे शहराध्यक्ष भरत लगड, कालिंदी गोडांबे, चेतन भालेकर, विनोद शिंदे, लहू ओहोळ, भरत फाटक, सागर फाटक आदी उपस्थित होते. तानाजी शिंदे म्हणाले, "महायुतीमध्ये शिवसंग्राम हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष आहे. गेल्यावेळी शिवसंग्राम पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र या वेळेला शिवसंग्रामने लोकसभेच्या तीन जागांवर तयारी सुरू केलेली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षाचे गेल्यावेळी दोन आमदार निवडून आले होते. या वेळेला शिवसंग्राम पक्ष विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही आहे. भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, असा विश्वास आहे."

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असून त्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळायला हवे  

"मेटे साहेबांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन झाले होते. तेव्हा आरक्षणदेखील मिळाले होते. आताही मराठा आरक्षणासाठी शिवसंग्राम पक्षाची तीच भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आंदोलनात आम्ही पाठीशी आहोत. छगन भुजबळ यांच्या भूमिकेबाबत त्यांचा पक्ष निर्णय घेईल. पण ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळायला हवे. सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही शिवस्मारक अडकलेले आहे.  शिवस्मारक लवकरात लवकर उभारण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या, "शिवसंग्राम संघटना ही आपल्यासारख्या मावळ्यांच्या जीवावर पुढे वाटचाल करणार आहे. शिवसंग्राम संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु शिवसंग्राम कधीही संपणार नाही.  येणाऱ्या काळात आपल्याला संघर्ष करावा लागेल.

टॅग्स :Puneपुणेlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण