शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महायुतीचा घटक पक्ष 'शिवसंग्राम' लोकसभेच्या तीन तर विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही

By राजू हिंगे | Updated: January 16, 2024 20:09 IST

भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील

पुणे : महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत तीन, तर विधानसभा निवडणुकीत बारा जागांसाठी आग्रही आहे, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी  दिली. आगामी काळातील निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणि संघटन बांधणीसाठी शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर पार पडले.  त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. 

यावेळी शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे, शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, प्रदेश सचिव शेखर पवार, हिंदुराव जाधव, ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, खजिनदार रामनाथ जगदाळे, पुणे शहराध्यक्ष भरत लगड, कालिंदी गोडांबे, चेतन भालेकर, विनोद शिंदे, लहू ओहोळ, भरत फाटक, सागर फाटक आदी उपस्थित होते. तानाजी शिंदे म्हणाले, "महायुतीमध्ये शिवसंग्राम हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष आहे. गेल्यावेळी शिवसंग्राम पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र या वेळेला शिवसंग्रामने लोकसभेच्या तीन जागांवर तयारी सुरू केलेली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षाचे गेल्यावेळी दोन आमदार निवडून आले होते. या वेळेला शिवसंग्राम पक्ष विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही आहे. भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, असा विश्वास आहे."

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असून त्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळायला हवे  

"मेटे साहेबांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन झाले होते. तेव्हा आरक्षणदेखील मिळाले होते. आताही मराठा आरक्षणासाठी शिवसंग्राम पक्षाची तीच भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आंदोलनात आम्ही पाठीशी आहोत. छगन भुजबळ यांच्या भूमिकेबाबत त्यांचा पक्ष निर्णय घेईल. पण ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळायला हवे. सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही शिवस्मारक अडकलेले आहे.  शिवस्मारक लवकरात लवकर उभारण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या, "शिवसंग्राम संघटना ही आपल्यासारख्या मावळ्यांच्या जीवावर पुढे वाटचाल करणार आहे. शिवसंग्राम संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु शिवसंग्राम कधीही संपणार नाही.  येणाऱ्या काळात आपल्याला संघर्ष करावा लागेल.

टॅग्स :Puneपुणेlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण