शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिवभोजन केंद्र ४० वरून १९ वर, पाच महिन्यांपासून अनुदानही रखडले

By नितीन चौधरी | Updated: December 3, 2024 09:02 IST

गरिबांना मिळणारी स्वस्तातील थाळी दुरापास्त होत असल्याचे चित्र आहे.

पुणे : जिल्ह्यात कोरोना काळात अनेकांना क्षुधातृप्तीसाठी आधार देणाऱ्या शिवभोजन केंद्रांची संख्या ४० इतकी होती. मात्र, अवेळी मिळणारे अनुदान, नागरिकांचा न मिळणारा प्रतिसाद यामुळे गेल्या पावणेदोन वर्षांत जिल्ह्यातील तब्बल २१ केंद्रे बंद झाली आहेत. जिल्ह्यातील ११ तालुक्यांत असलेले ४० शिवभोजन केंद्रे सध्या केवळ ७ तालुक्यांमध्येच १९ इतकेच उरले आहेत. या केंद्रांना गेल्या पाच महिन्यांपासून अनुदानही मिळाले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गरिबांना मिळणारी स्वस्तातील थाळी दुरापास्त होत असल्याचे चित्र आहे. राज्यातील गरीब व गरजू लोकांना दहा रुपयांत भोजन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारतर्फे शिवभोजन थाळीची योजना चालविली जाते. ही योजना महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाली होती. २०२३च्या मार्चअखेर जिल्ह्यात अशी ४० केंद्र सुरू होती. मात्र, राज्य सरकारकडून अनुदान वेळेत न मिळत असल्याने केंद्रचालकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. परिणामी, अनेक चालकांनी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या नोव्हेंबरअखेर जिल्ह्यात केवळ १९ केंद्रे सुरू असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे. अनुदानाव्यतिरिक्त विकलेल्या थाळ्यांचा हिशेब ठेवणे, सीसीटीव्ही लावणे, त्याची पडताळणी तहसीलदारांकडून होणे अशा जिकरीच्या अटी तसेच नागरिकांचा अल्प प्रतिसादही केंद्र बंद होण्यामागील कारण आहे.जिल्हा पुरवठा विभागाने २३ जूनपर्यंत शिवभोजन केंद्रांना अनुदान वितरित केले आहे. यासाठी राज्य सरकारकडून एकूण २ कोटी ८२ हजार ५१ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. संबंधित तहसीलदारांकडून सप्टेंबरपर्यंतचे शिवभोजन प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, या कालावधीचे अनुदान शिवभोजन केंद्रचालकांना चार-पाच दिवसांत वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. परिणामी, या १९ केंद्रचालकांना गेल्या पाच महिन्यांचे अनुदान मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.दहा रुपयांत काय मिळते?दहा रुपयांच्या या शिवभोजन थाळीत २ चपात्या, एक वाटी भाजी, १ मूद भात व एक वाटी वरण दिले जाते.केंद्रांना मिळते २५ आणि ४० रुपयांचे अनुदानया केंद्रांना राज्य सरकारकडून प्रतिथाळी अनुदान दिले जाते. त्यात ग्रामीण भागातील केंद्रांसाठी २५ रुपये तर शहरी भागासाठी ४० रुपयांचे अनुदान दिले जाते.जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रबारामती ४हवेली ६पुरंदर ३आंबेगाव १दौंड २मावळ १खेड २एकूण १९ 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकारMahayutiमहायुती