शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

शिवभोजन केंद्र ४० वरून १९ वर, पाच महिन्यांपासून अनुदानही रखडले

By नितीन चौधरी | Updated: December 3, 2024 09:02 IST

गरिबांना मिळणारी स्वस्तातील थाळी दुरापास्त होत असल्याचे चित्र आहे.

पुणे : जिल्ह्यात कोरोना काळात अनेकांना क्षुधातृप्तीसाठी आधार देणाऱ्या शिवभोजन केंद्रांची संख्या ४० इतकी होती. मात्र, अवेळी मिळणारे अनुदान, नागरिकांचा न मिळणारा प्रतिसाद यामुळे गेल्या पावणेदोन वर्षांत जिल्ह्यातील तब्बल २१ केंद्रे बंद झाली आहेत. जिल्ह्यातील ११ तालुक्यांत असलेले ४० शिवभोजन केंद्रे सध्या केवळ ७ तालुक्यांमध्येच १९ इतकेच उरले आहेत. या केंद्रांना गेल्या पाच महिन्यांपासून अनुदानही मिळाले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गरिबांना मिळणारी स्वस्तातील थाळी दुरापास्त होत असल्याचे चित्र आहे. राज्यातील गरीब व गरजू लोकांना दहा रुपयांत भोजन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारतर्फे शिवभोजन थाळीची योजना चालविली जाते. ही योजना महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाली होती. २०२३च्या मार्चअखेर जिल्ह्यात अशी ४० केंद्र सुरू होती. मात्र, राज्य सरकारकडून अनुदान वेळेत न मिळत असल्याने केंद्रचालकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. परिणामी, अनेक चालकांनी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या नोव्हेंबरअखेर जिल्ह्यात केवळ १९ केंद्रे सुरू असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे. अनुदानाव्यतिरिक्त विकलेल्या थाळ्यांचा हिशेब ठेवणे, सीसीटीव्ही लावणे, त्याची पडताळणी तहसीलदारांकडून होणे अशा जिकरीच्या अटी तसेच नागरिकांचा अल्प प्रतिसादही केंद्र बंद होण्यामागील कारण आहे.जिल्हा पुरवठा विभागाने २३ जूनपर्यंत शिवभोजन केंद्रांना अनुदान वितरित केले आहे. यासाठी राज्य सरकारकडून एकूण २ कोटी ८२ हजार ५१ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. संबंधित तहसीलदारांकडून सप्टेंबरपर्यंतचे शिवभोजन प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, या कालावधीचे अनुदान शिवभोजन केंद्रचालकांना चार-पाच दिवसांत वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. परिणामी, या १९ केंद्रचालकांना गेल्या पाच महिन्यांचे अनुदान मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.दहा रुपयांत काय मिळते?दहा रुपयांच्या या शिवभोजन थाळीत २ चपात्या, एक वाटी भाजी, १ मूद भात व एक वाटी वरण दिले जाते.केंद्रांना मिळते २५ आणि ४० रुपयांचे अनुदानया केंद्रांना राज्य सरकारकडून प्रतिथाळी अनुदान दिले जाते. त्यात ग्रामीण भागातील केंद्रांसाठी २५ रुपये तर शहरी भागासाठी ४० रुपयांचे अनुदान दिले जाते.जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रबारामती ४हवेली ६पुरंदर ३आंबेगाव १दौंड २मावळ १खेड २एकूण १९ 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकारMahayutiमहायुती