शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळ समाजाने जमीनमोजणी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 05:48 IST

जेजुरी औद्योगिक वसाहत टप्पा क्र. ५ च्या विस्तारीकरणासाठी शासनाने नावळी, कोळविहीरे व मावडी येथील शेतीवर दि. १३ एप्रिल २०११ रोजी आरक्षण टाकले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना धनगर समाजातील शेकडो महिला, पुरुष व तरुणांनी रोखले.

जेजुरी - जेजुरी औद्योगिक वसाहत टप्पा क्र. ५ च्या विस्तारीकरणासाठी शासनाने नावळी, कोळविहीरे व मावडी येथील शेतीवर दि. १३ एप्रिल २०११ रोजी आरक्षण टाकले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना धनगर समाजातील शेकडो महिला, पुरुष व तरुणांनी रोखले. ‘आमच्या जमिनी विस्तारीकरणासाठी द्यायच्या नाहीत. आम्ही त्या देणार नाही,’ अशा घोषणा देत त्यांनी अधिकाºयांना मोजणी करण्यास मज्जाव केला. सुमारे ६५१ एकर मेंढपाळ समाजाची शेतजमीन न मोजण्याचा शासकीय अधिकाºयांना निर्णय घ्यावा लागला. या वेळी येत्या १५ दिवसांत मुंबई येथे अथवा याच ठिकाणी अधिकारी व बाधित शेतकºयांची बैठक घेऊन अधिकृत निर्णय घेण्याचे ठरले.पुरंदर तालुक्यातील नावळी येथील १०६६.४० हेक्टर क्षेत्रावर शासनाने औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी आरक्षण टाकले आहे. समाजबांधवांचा मोठा विरोध आहे. त्यांचा विरोध झुगारून गुरुवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलीस अधिकारी, ५० पोलीस कर्मचारी, एक दंगल प्रतिबंधक तुकडी यांच्यासह एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संतोष देशमुख, भूसंपादन क्र. २२चे उपजिल्हाधिकारी गाडे, प्रांताधिकारी संजय असवले, तहसीलदार सचिन गिरी तसेच मोजणी कर्मचाºयांसह जमिनीची मोजणी करण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, मोजणीसाठी अधिकारी मोठ्या बंदोबस्तात येणार असल्याने येथील बाधित शेतकरी तसेच एमआयडीसी विस्तारीकरणाला विरोध करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकºयांचा आक्रमकपणा पाहून अधिकाºयांनी त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला.या वेळी बाधित शेतकºयांच्या वतीने जयराम थोरवे, धनंजय थोरवे, पुना रामा महानवर, रवा महादू थोरवे, मावडीचे माजी सरपंच चंद्रकांत भामे, प्रकाश भामे, भाजपाचे जिल्हा चिटणीस राजेंद्र जगताप, युवा मोर्चाचे अविनाश वाईकर, प्रसाद अत्रे यांनी शेतकºयांची बाजू मांडली. बैठकीत, येत्या १५ दिवसांत राज्याचे या विभागाचे सचिव, तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह बैठक घेऊन यावर निर्णय घेण्याचे ठरले.आज धनंजय पुनाजी महानवर, महेंद्र दादासाहेब थोरवे, सुमीत लालसाहेब महानवर यांनी उपोषण सुरू केले आहे. या वेळी शेतकरी जयराम तोरवे, बाळू तोरवे, रावा तोरवे, पुना महानवर, राजू तोरवे, धनंजय तोरवे, भिका कारंडे, सुनील कारंडे, मुक्ता थोरवे, हौसाबाई थोरवे, कलावती महानवर, शकुंतला दौंड, राधाबाई करंडी आदी उपस्थित होते़या जमिनीचे भूसंपादन झाल्यास या शेतकºयांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. जमिनी बागायती असूनही शासन त्या संपादित का करते, हेच आम्हाला समजत नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही. ज्यांना जमिनी द्यायच्या आहेत त्यांच्या जरूर घ्या, आम्ही विरोध करणार नाही. शासनाने जबरदस्ती केली तर आम्ही आत्महत्या करू; मात्र जमीन संपादित करू देणार नसल्याचे जयराम थोरवे, पुना रामा महानवर व शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे