शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यात चाराटंचाई; श्वेतक्रांती काळवंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:30 IST

जनावरे सांभाळण्याची कसरत : शेतकरी चिंताग्रस्त, पाणीटंचाईचीही भर

कान्हूर मेसाई : शेताच्या बांधाची वैरण गेल्या महिन्यात संपली असून, जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिरूर तालुक्यातील बऱ्याच शेतकºयांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरली आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकºयांच्या हातात चार पैसे उपलब्ध होत आहेत. या व्यवसायातून आलेल्या पैशातून घरखर्चाला तसेच शेतीसाठी भांडवल म्हणून उपयोग होत आहे. मात्र तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकºयाकडे असलेला चारा पूर्णपणे संपल्यामुळे शेतकºयाची चारा शोधण्यासाठी ऊसपट्ट्यात वारी चालू आहे. चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांना जनावरे कशी सांभाळावीत, असा प्रश्न पडला आहे.

दुभत्या जनावरांना चारा मिळत नसल्याने जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी झाल्याने दूध संकलनात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने तालुक्यातील श्वेतक्रांती काळवंडली आहे. या वर्षी तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीस पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकºयांनी खरीप हंगामात बाजरी व इतर पिकाची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयाच्या हाती थोड्याफार प्रमाणात आला तो आजपर्यंत शेतकºयांनी कसाबसा जनावरांना खाऊ घालून जगविण्याचा खटाटोप केला. मात्र आता चारा पूर्णपणे संपला असून, पाण्याचा प्रश्न ही गंभीर बनल्याने शेतकरीवर्गापुढे आपली जनावरे कशी जगवायची, असा यक्षप्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे.

अनेक शेतकरी हे दुभती जनावरे जगविण्यासाठी जिवाचे रान करीत आहे. आता फक्त शेतकºयांना जनावराचा चारा म्हणून ऊस उपलब्ध होत आहे. त्यासाठी शेतकºयांना एक गुंठा ऊस विकत घेण्यासाठी पाच हजार रुपये वाहनखर्च दोन हजार रुपये व मजुरी एक हजार रुपये इतका खर्च येत आहे. दुधाला मिळणाºया अल्पशा भावामुळे शेतकºयाची ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करून जनावरे जगवावी लागत आहे.शेतकरी आर्थिक अडचणीतखैरेनगर, कान्हूर मेसाई गावात सुमारे पाच दूध संकलन केंद्रे असून, या माध्यमातून सुमारे साडेचार हजार लिटर दूध संकलित केले जात आहे. शेतकºयांना सरासरी पंचवीस-सव्वीस रुपये दर मिळत आहे.चारा व खाद्याचे भाव पाहता हे दर अतिशय कमी असल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीचा विचार करून दुधाचे भाव वाढवावेत,अशी मागणी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका तृप्ती भरणे व माजी सरपंच संतोष भरणे, यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी