शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यात चाराटंचाई; श्वेतक्रांती काळवंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:30 IST

जनावरे सांभाळण्याची कसरत : शेतकरी चिंताग्रस्त, पाणीटंचाईचीही भर

कान्हूर मेसाई : शेताच्या बांधाची वैरण गेल्या महिन्यात संपली असून, जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिरूर तालुक्यातील बऱ्याच शेतकºयांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरली आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकºयांच्या हातात चार पैसे उपलब्ध होत आहेत. या व्यवसायातून आलेल्या पैशातून घरखर्चाला तसेच शेतीसाठी भांडवल म्हणून उपयोग होत आहे. मात्र तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकºयाकडे असलेला चारा पूर्णपणे संपल्यामुळे शेतकºयाची चारा शोधण्यासाठी ऊसपट्ट्यात वारी चालू आहे. चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांना जनावरे कशी सांभाळावीत, असा प्रश्न पडला आहे.

दुभत्या जनावरांना चारा मिळत नसल्याने जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी झाल्याने दूध संकलनात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने तालुक्यातील श्वेतक्रांती काळवंडली आहे. या वर्षी तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीस पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकºयांनी खरीप हंगामात बाजरी व इतर पिकाची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयाच्या हाती थोड्याफार प्रमाणात आला तो आजपर्यंत शेतकºयांनी कसाबसा जनावरांना खाऊ घालून जगविण्याचा खटाटोप केला. मात्र आता चारा पूर्णपणे संपला असून, पाण्याचा प्रश्न ही गंभीर बनल्याने शेतकरीवर्गापुढे आपली जनावरे कशी जगवायची, असा यक्षप्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे.

अनेक शेतकरी हे दुभती जनावरे जगविण्यासाठी जिवाचे रान करीत आहे. आता फक्त शेतकºयांना जनावराचा चारा म्हणून ऊस उपलब्ध होत आहे. त्यासाठी शेतकºयांना एक गुंठा ऊस विकत घेण्यासाठी पाच हजार रुपये वाहनखर्च दोन हजार रुपये व मजुरी एक हजार रुपये इतका खर्च येत आहे. दुधाला मिळणाºया अल्पशा भावामुळे शेतकºयाची ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करून जनावरे जगवावी लागत आहे.शेतकरी आर्थिक अडचणीतखैरेनगर, कान्हूर मेसाई गावात सुमारे पाच दूध संकलन केंद्रे असून, या माध्यमातून सुमारे साडेचार हजार लिटर दूध संकलित केले जात आहे. शेतकºयांना सरासरी पंचवीस-सव्वीस रुपये दर मिळत आहे.चारा व खाद्याचे भाव पाहता हे दर अतिशय कमी असल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीचा विचार करून दुधाचे भाव वाढवावेत,अशी मागणी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका तृप्ती भरणे व माजी सरपंच संतोष भरणे, यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी