शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
2
उणे 40% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
3
मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
4
स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा
5
कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच
6
ना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; 'आधार स्कॅम'पासून राहा सावध
7
संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं
8
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
9
‘भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, मनपा निवडणुकीत ही विषवल्ली कापा’, काँग्रेसचं आवाहन
10
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
11
IND vs NZ : 'लॉटरी' लागली तो बाकावरच! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हमध्ये 'या' खेळाडूची एन्ट्री
12
Makar Sankranti 2026: किंक्रांत म्हणजे नेमके काय? जाणून घ्या हा दिवस खरंच अशुभ असतो का?
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचा ऐतिहासिक भडका, एका दिवसात चांदी १४,१४३ रुपयांनी महागली; Gold मध्येही तेजी, पाहा नवे दर
14
"ट्रम्प यांच्या खाण्याच्या सवयी जणू विषच!" आरोग्य सचिवांचा धक्कादायक खुलासा, काय खातात?
15
IT कंपनीत ५ वर्षे काम, पण पगार वाढण्याऐवजी घटला! जावा डेव्हलपरची 'Reddit' पोस्ट व्हायरल
16
पैसे वाटप करताना भाजप उमेदवाराच्या मुलास काँग्रेसच्या उमेदवाराने पकडले
17
'बिनविरोध' निवड झालेल्या उमेदवारांना मोठा दिलासा; हायकोर्टाने मनसेची याचिका फेटाळली
18
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
19
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
20
जीवघेणा शेवट! जिच्यावर प्रेम केलं, तिचे आधीच होते २ बॉयफ्रेंड; सत्य समजताच 'तो' हादरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यात चाराटंचाई; श्वेतक्रांती काळवंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:30 IST

जनावरे सांभाळण्याची कसरत : शेतकरी चिंताग्रस्त, पाणीटंचाईचीही भर

कान्हूर मेसाई : शेताच्या बांधाची वैरण गेल्या महिन्यात संपली असून, जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिरूर तालुक्यातील बऱ्याच शेतकºयांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरली आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकºयांच्या हातात चार पैसे उपलब्ध होत आहेत. या व्यवसायातून आलेल्या पैशातून घरखर्चाला तसेच शेतीसाठी भांडवल म्हणून उपयोग होत आहे. मात्र तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकºयाकडे असलेला चारा पूर्णपणे संपल्यामुळे शेतकºयाची चारा शोधण्यासाठी ऊसपट्ट्यात वारी चालू आहे. चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांना जनावरे कशी सांभाळावीत, असा प्रश्न पडला आहे.

दुभत्या जनावरांना चारा मिळत नसल्याने जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी झाल्याने दूध संकलनात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने तालुक्यातील श्वेतक्रांती काळवंडली आहे. या वर्षी तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीस पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकºयांनी खरीप हंगामात बाजरी व इतर पिकाची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयाच्या हाती थोड्याफार प्रमाणात आला तो आजपर्यंत शेतकºयांनी कसाबसा जनावरांना खाऊ घालून जगविण्याचा खटाटोप केला. मात्र आता चारा पूर्णपणे संपला असून, पाण्याचा प्रश्न ही गंभीर बनल्याने शेतकरीवर्गापुढे आपली जनावरे कशी जगवायची, असा यक्षप्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे.

अनेक शेतकरी हे दुभती जनावरे जगविण्यासाठी जिवाचे रान करीत आहे. आता फक्त शेतकºयांना जनावराचा चारा म्हणून ऊस उपलब्ध होत आहे. त्यासाठी शेतकºयांना एक गुंठा ऊस विकत घेण्यासाठी पाच हजार रुपये वाहनखर्च दोन हजार रुपये व मजुरी एक हजार रुपये इतका खर्च येत आहे. दुधाला मिळणाºया अल्पशा भावामुळे शेतकºयाची ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करून जनावरे जगवावी लागत आहे.शेतकरी आर्थिक अडचणीतखैरेनगर, कान्हूर मेसाई गावात सुमारे पाच दूध संकलन केंद्रे असून, या माध्यमातून सुमारे साडेचार हजार लिटर दूध संकलित केले जात आहे. शेतकºयांना सरासरी पंचवीस-सव्वीस रुपये दर मिळत आहे.चारा व खाद्याचे भाव पाहता हे दर अतिशय कमी असल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीचा विचार करून दुधाचे भाव वाढवावेत,अशी मागणी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका तृप्ती भरणे व माजी सरपंच संतोष भरणे, यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी