शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा येथील शौर्यदिन यंदा दोन दिवस

By नितीन चौधरी | Updated: November 8, 2023 19:59 IST

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या शौर्य दिनाचा सोहळा यंदा ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.

पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या शौर्य दिनाचा सोहळा यंदा ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या सोहळ्यासाठी सुमारे वीस लाख अनुयायी येण्याचा अंदाज असून, त्यासाठी सरकार पातळीवर देण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधा दोन दिवस पुरवण्यात याव्यात, अशी मागणी कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे. दोन वर्षांपूर्वी विजयस्तंभाच्या विकास करण्याबाबतची घोषणा करण्यात आली; मात्र, अद्याप कार्यवाही झाली नसून सरकारकडून न्यायालयीन वाद असल्याचे खोटे सांगितले जात असल्याचाही आरोप समितीने केला आहे.

शौर्य दिनाच्या तयारीसंदर्भात समन्वय समितीने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, माजी उपमहापौर सिद्धार्थ झेंडे, मिलिंद अहिरे, राहुल तुपेरे, उमेश चव्हाण, नागेश भोसले उपस्थित होते. डंबाळे म्हणाले, ‘गेल्या वर्षी शौर्य दिनाला १६ लाख अनुयायी आले होते. यंदा २० लाख अनुयायी येण्याची शक्यता गृहीत धरून सोयी सुविधा देण्याचे नियोजन समन्वय समिती तसेच जिल्हा प्रशासनाच्या एकत्रित बैठकीत करण्यात आले आहे. अभिवादनाला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला तसेच मुलांना त्रास होऊ नये यासाठीच यंदापासून हा सोहळा दोन दिवस अधिकृतरीत्या साजरा करण्याचे समितीने ठरवले आहे. त्यानुसार सरकारी पातळीवर देण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा दोन्ही दिवशी पुरवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यासाठी दोन्ही दिवस प्रशासनाकडून बस सुविधा, पार्किंग सुविधा तसेच अन्य पायाभूत सुविधांची पूर्तता करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनासोबत वारंवार बैठका होत असून, त्यानुसार नियोजन सुरू आहे.’

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री, वित्तमंत्री अजित पवार यांनी विजयस्तंभाच्या विकास आराखड्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. मात्र, दुर्दैवाने दोन वर्षांत यात कोणतीही प्रगती झाली नसल्याचे झेंडे म्हणाले. या परिसरात सुमारे साडेतेरा एकर जागा राज्य सरकारच्या ताब्यात असून, केवळ अडीच एकर जागेचा वाद न्यायालयात आहे. मात्र तोदेखील बहुतांशी सोडवण्यात यश आल्याचे ते म्हणाले. या जागेसंदर्भात राज्य सरकारने सक्षमपणे बाजू मांडावी जेणेकरून स्मारकाचा विकास करण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. स्मारकाच्या विकासासंदर्भात वेगवेगळे विभाग काम करत असून, या सर्व विभागांचे एकत्रित नियोजन करण्यासाठी एका विशेष कंपनी तयार करून समाजकल्याण आयुक्तांना त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमावे. या संदर्भात मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचे धेंडे यांनी स्पष्ट केले. स्मारकाभोवतीची मोकळी जागा पीएमआरडीएकडून आरक्षित करण्यात आली आहे. या संदर्भात अधिसूचना काढून ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी, असेही धेंडे म्हणाले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार