शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवारांनी सोयीची भूमिका घेऊ नये, यामुळे पोलिसांचे मनोबल खचू शकते" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 18:25 IST

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.

पुणे : एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होते. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी सोयीची भूमिका घेऊ नये, यामुळे पोलिसांचे मनोबल खचू शकते असे सांगत शरद पवारांवर निशाणा साधला. 

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सुधीर ढवळे, अरुण परेरा यांना अटक केली तेव्हा गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. 18 फेब्रुवारी 2014ला मनमोहन  सिंग यांचे सरकार होते, तेव्हा माओवादी संघटनेच्या यादीत कबीर कला मंचाचे नाव होते. म्हणजे, मनमोहन सरकारच्या काळात झालेली अटक योग्य आणि आमच्या काळात अटक झाली तर जातीयवाद कसा असू शकेल? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. याचबरोबर, शरद पवारांनी सोयीची भूमिका घेणे योग्य नाही. यामुळे पोलिसांचे मनोबल खचू शकते. एफआयआर झाला तर तपास झाला असेलच, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

याशिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने बधितांना 25 हजार हेक्टरी देऊ अशी घोषणा केली होती. मात्र राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट काळात केलेली मदत सोडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने नव्या पैशाचीही वाढीव मदत केली नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देशात मोठ्या राज्यांच्या तुलनेत सर्वांत जास्त चांगली स्थिती महाराष्ट्राची आहे. राज्याच्या तिजोरीत जास्त पैसे नाहीत, मात्र इतर राज्यांपेक्षा चांगली स्थिती आहे. सकल उत्पन्न 15.8 टक्के आहे. ऋणभार कमी आहे असून महसूल तूट मर्यादेत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होते. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला. मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून काहींना आत टाकण्यात आले. पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे शरद पवारांनी केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार