शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जय पवारांच्या लग्नाबद्दल प्रश्न, शरद पवार भडकले; म्हणाले, 'काही तारतम्य ठेवत जा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 22:16 IST

अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचे लग्न ठरले आहे. त्यांचा साखरपुडा होणार आहे, त्याबद्दल शरद पवारांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. 

Sharad Pawar Jay Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचे लग्न ठरले आहे. दोन दिवसांपूर्वी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी शरद पवारांना साखरपुड्यांचे निमंत्रणही दिले. याबद्दलच शरद पवारांना एक प्रश्न विचारण्यात आला, जो ऐकून ते चांगलेच संतापले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी बीडमधील गुन्हेगारी आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना जय पवार यांच्या लग्नाबद्दल आणि साखरपुड्याच्या निमंत्रणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न ऐकून त्यांचा पारा चढला आणि त्यांनी प्रश्न विचाणाऱ्या पत्रकाराला सुनावलं. 

'जय पवार यांनी दहा तारखेला होत असलेल्या साखरपुड्याचं निमंत्रण दिलं आहे. कुटुंब एकत्र येणार आहे', असं विचारत असतानाच शरद पवार म्हणाले, "हा काही प्रश्न आहे? पण, हा काही आहे का? काय विचारावं, याचं तारतम्य तर ठेवत जा", अशा शब्दात पवारांनी सुनावलं. 

जयंत पाटलांच्या नाराजीच्या मुद्द्यावर काय बोलले?

गेल्या तीन-चार दिवसांत जयंत पाटलांच्या एका विधानाची भरपूर चर्चा झाली. ते नाराज असल्याचे दावेही काही पक्षातील नेत्यांकडून केले गेले. या सगळ्या चर्चांवर जयंत पाटलांनी खुलासा केला. 

जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चांबद्दल शरद पवारांनाही प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, "त्यांनी उत्तर दिलं आहे. आज वर्तमानपत्रात छापून आलं आहे. त्यांनी ते उत्तर बारामतीमध्ये दिलं आहे."

बीडमधील गुन्हेगारीबद्दल काय बोलले पवार?

बीडमध्ये मागील तीन महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांची चर्चा होत आहे. त्यावर बोलताना पवार म्हणाले, "काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम गेले महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसताहेत. राज्य सरकारने कोण आहे, याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेईल, वातावरण खराब करतो अशासंबंधी अत्यंत सक्त असे धोरण आखण्याची गरज आहे. बीडला पूर्वीच्या वैभवाचे दिवस परत कसे येतील, याची काळजी घ्यावी", असे शरद पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच बोलताना म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवार