शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

जय पवारांच्या लग्नाबद्दल प्रश्न, शरद पवार भडकले; म्हणाले, 'काही तारतम्य ठेवत जा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 22:16 IST

अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचे लग्न ठरले आहे. त्यांचा साखरपुडा होणार आहे, त्याबद्दल शरद पवारांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. 

Sharad Pawar Jay Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचे लग्न ठरले आहे. दोन दिवसांपूर्वी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी शरद पवारांना साखरपुड्यांचे निमंत्रणही दिले. याबद्दलच शरद पवारांना एक प्रश्न विचारण्यात आला, जो ऐकून ते चांगलेच संतापले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी बीडमधील गुन्हेगारी आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना जय पवार यांच्या लग्नाबद्दल आणि साखरपुड्याच्या निमंत्रणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न ऐकून त्यांचा पारा चढला आणि त्यांनी प्रश्न विचाणाऱ्या पत्रकाराला सुनावलं. 

'जय पवार यांनी दहा तारखेला होत असलेल्या साखरपुड्याचं निमंत्रण दिलं आहे. कुटुंब एकत्र येणार आहे', असं विचारत असतानाच शरद पवार म्हणाले, "हा काही प्रश्न आहे? पण, हा काही आहे का? काय विचारावं, याचं तारतम्य तर ठेवत जा", अशा शब्दात पवारांनी सुनावलं. 

जयंत पाटलांच्या नाराजीच्या मुद्द्यावर काय बोलले?

गेल्या तीन-चार दिवसांत जयंत पाटलांच्या एका विधानाची भरपूर चर्चा झाली. ते नाराज असल्याचे दावेही काही पक्षातील नेत्यांकडून केले गेले. या सगळ्या चर्चांवर जयंत पाटलांनी खुलासा केला. 

जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चांबद्दल शरद पवारांनाही प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, "त्यांनी उत्तर दिलं आहे. आज वर्तमानपत्रात छापून आलं आहे. त्यांनी ते उत्तर बारामतीमध्ये दिलं आहे."

बीडमधील गुन्हेगारीबद्दल काय बोलले पवार?

बीडमध्ये मागील तीन महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांची चर्चा होत आहे. त्यावर बोलताना पवार म्हणाले, "काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम गेले महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसताहेत. राज्य सरकारने कोण आहे, याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेईल, वातावरण खराब करतो अशासंबंधी अत्यंत सक्त असे धोरण आखण्याची गरज आहे. बीडला पूर्वीच्या वैभवाचे दिवस परत कसे येतील, याची काळजी घ्यावी", असे शरद पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच बोलताना म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवार