शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली", शरद पवार यांचं मोठं विधान; केला मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 12:55 IST

पहाटेच्या शपथविधीबाबत अधिक बोलण्यास अजित पवार वारंवार नकार देत असतात.

पुणे-

पहाटेच्या शपथविधीबाबत अधिक बोलण्यास अजित पवार वारंवार नकार देत असतात. तर राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांना कल्पना होती असं विधान करत खळबळ उडवून दिली होती. याबाबत आता थेट शरद पवार यांनीच मोठं विधान केलं आहे. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली नसती, असं मोठं विधान शरद पवार यांनी केलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पॉलिटिकल मिस्ट्री सुरू आहे ज्यावर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. फडणवीस म्हटले होते की अजित पवारांसोबत जे सरकार झालं त्याची माहिती शरद पवारांना होती. अजित पवार देखील याबाबत काहीच बोलत नाहीत. नेमकं काय घडलं होतं ते तुम्हीच स्पष्ट करा, असा सवाल शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर पवारांनी केलेल्या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

"सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय घडलं ते तुम्हा सर्वांनाच माहित आहे", असं शरद पवार म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. राज्यात तेव्हा तसं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का?, असं शरद पवार म्हणाले. 

महाराष्ट्रात काही झालं की एका व्यक्तीचं नाव येतंशरद पवारांनी केलेल्या विधानावर म्हणजे जे सगळं घडलं त्याला तुमचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता का? राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी हे सारं केलं गेलं होतं का? असा प्रतिप्रश्न केला गेला असता पवारांनी महाराष्ट्रात काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव येतं हे आपल्या राज्याचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल असं मिश्किल उत्तर दिलं. लातूरला भूकंप झाला त्याला कारणीभूत देखील मीच होतो असंही बोललं गेलं, असंही पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार