शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

"पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली", शरद पवार यांचं मोठं विधान; केला मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 12:55 IST

पहाटेच्या शपथविधीबाबत अधिक बोलण्यास अजित पवार वारंवार नकार देत असतात.

पुणे-

पहाटेच्या शपथविधीबाबत अधिक बोलण्यास अजित पवार वारंवार नकार देत असतात. तर राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांना कल्पना होती असं विधान करत खळबळ उडवून दिली होती. याबाबत आता थेट शरद पवार यांनीच मोठं विधान केलं आहे. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली नसती, असं मोठं विधान शरद पवार यांनी केलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पॉलिटिकल मिस्ट्री सुरू आहे ज्यावर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. फडणवीस म्हटले होते की अजित पवारांसोबत जे सरकार झालं त्याची माहिती शरद पवारांना होती. अजित पवार देखील याबाबत काहीच बोलत नाहीत. नेमकं काय घडलं होतं ते तुम्हीच स्पष्ट करा, असा सवाल शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर पवारांनी केलेल्या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

"सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय घडलं ते तुम्हा सर्वांनाच माहित आहे", असं शरद पवार म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. राज्यात तेव्हा तसं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का?, असं शरद पवार म्हणाले. 

महाराष्ट्रात काही झालं की एका व्यक्तीचं नाव येतंशरद पवारांनी केलेल्या विधानावर म्हणजे जे सगळं घडलं त्याला तुमचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता का? राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी हे सारं केलं गेलं होतं का? असा प्रतिप्रश्न केला गेला असता पवारांनी महाराष्ट्रात काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव येतं हे आपल्या राज्याचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल असं मिश्किल उत्तर दिलं. लातूरला भूकंप झाला त्याला कारणीभूत देखील मीच होतो असंही बोललं गेलं, असंही पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार