शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 21:24 IST

बारामती येथे आयोजित महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. 

बारामती दि. ५ (प्रतिनिधी) : "आज सर्वत्र पाणी,शेती,बेकारीचा प्रश्न आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्तेचा वापर होताना दिसून येत नाही.यासाठी वेगळा निकाल हाती घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे देशाला नवीन दिशा देण्याचे काम केले जाईल. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे," असं मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद  पवार यांनी व्यक्त केलं आहे. बारामती येथे आयोजित महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 

पवार पुढे म्हणाले, बारामतीची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या हिताचाच निकाल होईल. अनेक वर्ष शेवटची सभा मिशनच्या ग्राउंडवर होत असे. मात्र, यंदा राज्यातील सत्ताधाऱ्यांनी ती जागा ताब्यात घेतल्याने आपल्याला ती मिळाली नाही. कोणी जागा अडविली तरी नुकसान होऊ शकत नाही, हे आजच्या सभेतील गर्दीने सिद्ध झाल्याचे पवार म्हणाले. 

यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,गेले १० महिने खूप रडले. इतके रडले की आता अश्रू येत नाहीत. तुम्हाला पक्ष,महाराष्ट्र,कुटुंबाची  किंमत नसेल तर कोणासाठी रडायचे? असा सवाल  सुळे यांनी केला.विरोधक मोदी,शाह यांच्यासोबत संबंध चांगले असल्याचे सांगतात. त्यांनी ते सबंध शेतकऱ्यांसाठी वापरावे, असा टोला सुळे यांनी अजित पवार यांना लगावला. त्यांच्या कामात केव्हाच हस्तक्षेप केला नाही. त्यांचा कायम मान राखला. त्या संस्कारी वागण्यासाठी माझ्यावर टीका केली जाते का,असा देखील सवाल सुळे यांनी अजित पवार यांना केला.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले,आजच्या सभेतील गर्दीने बारामतीकरांच्या मनात, काळजात काय हे दाखवून दिले आहे.

यावेळी माजी मंत्री सुनील केदार,माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी खासदार वंदना चव्हाण, आमदार रोहित पवार, भूषणसिंह राजे होळकर,अंकुश काकडे, विठ्ठल मणियार तसेच प्रतिभा पवार यांच्यासह पवार कुटुंबीय उपस्थित होते. ...१८ वर्ष तुम्ही पालकमंत्री होता

मी बारामतीची लेक आहे.मुलांप्रमाणे मुलींना देखील अधिकार आहेत. आमचे दिवस मोजू नका, १८ वर्ष तुम्ही पालकमंत्री होता, इतर तालुक्यात किती वेळा गेला,असा सवाल सुळे यांनी केला. काहीजण म्हणतात,समोरचे भावुक होतील.शेवटची निवडणूक असल्याचे सांगतिल, रडतील.मात्र, त्यांना माझे सांगणे आहे.शेवटची की काय, तो निर्णय माझा पांडुरंग घेईल. तुमच्यासारखे आमचे बुरसटलेले विचार नाहीत. त्या विचारांच्या आम्ही नादी लागणार नाही. सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर असेपर्यंत कोणी माइका लाल आमचं काही करु शकणार नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर केली. दरम्यान, आजच्या सभेत शरद पवार यांचा घसा बसल्याने त्यांनी भाषण आटोपते घेतले. पवार यांनी घसा बसल्याचा उल्लेख भाषणात केला. अवघ्या सात मिनिटात पवार यांनी भाषण आटोपते घेतले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbaramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Sunetra Pawarसुनेत्रा पवारSupriya Suleसुप्रिया सुळे