शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शंकराचार्य हे एकप्रकारची शक्ती - सुमित्रा महाजन; शंकराचार्य पुरस्कार प्रदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:29 IST

जगदगुरू शंकराचार्याने भारतभ्रमण केले आणि त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ, श्रृंगेरी पीठ, शारदापीठ आणि ज्योर्तिमठ अशा भारताच्या चार दिशांना चार पीठांची स्थापना केली.

पुणे : जगदगुरू शंकराचार्याने भारतभ्रमण केले आणि त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ, श्रृंगेरी पीठ, शारदापीठ आणि ज्योर्तिमठ अशा भारताच्या चार दिशांना चार पीठांची स्थापना केली. जगदगुरू शंकराचार्य आपणास मिळालेले देणे आहे. अशा कार्यक्रमातून आम्हाला एक प्रकारची शक्ती मिळते, असे प्रतिपादन लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी केले.आद्य शंकराचार्य जयंती महोत्सवानिमित्त श्रुतिसागर आश्रमातर्फे ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांना भगवत्पूज्यपाद आदी शंकराचार्य पुरस्कार आणि वेदमूर्ती श्रीधर अडी यांना वेदसंवर्धन पुरस्कार सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी महापौर मुक्ता टिळक, कुडली श्रृंगेरी मठाचे शंकराचार्य विद्याभिनव शंकरभारती महास्वामी, श्रुतिसागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती, स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब तराणेकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी, अमरावती विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. एस. टी. देशमुख आदी उपस्थित होते.महाजन म्हणाल्या, आपल्या देशातील सुराज्य आणि सुशासनाची परंपरा रामायण-महाभारतापासून चालत आलेली आहे. मंगोलिया देशातील लोक बौद्ध धर्म स्वीकारून भारताकडे पाहात आहेत. आपण त्यांना जवळ करावे, असे वाटते. भारतातील दगडसुद्धा व्हिएतनाममध्ये सांभाळून ठेवले जातात. आपणास याबद्दल काहीच माहिती नाही. प्रत्येकाने देश समजावून घेणे गरजेचे आहे.महापौर टिळक म्हणाल्या, दांभिकतेमुळे समाज भरकटत जात आहे. समाज भरकटू नये, यासाठी श्रुतिसागर आश्रमाकडून कार्य केले जात आहे. माणिकप्रभूमहाराज म्हणाले, हा सन्मान माझा नाही तर गुरू परंपरेचा सन्मान आहे. स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती म्हणाल्या, आज समाजात दांभिकता वाढलेली आहे. धर्माचे अधिष्ठान सगळ्यांना लाभावे, यासाठी सर्व संत आपणास मार्गदर्शक केले आहे. प्रास्ताविक उदय जोशी यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेSumitra Mahajanसुमित्रा महाजन