शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शंकराचार्य हे एकप्रकारची शक्ती - सुमित्रा महाजन; शंकराचार्य पुरस्कार प्रदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:29 IST

जगदगुरू शंकराचार्याने भारतभ्रमण केले आणि त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ, श्रृंगेरी पीठ, शारदापीठ आणि ज्योर्तिमठ अशा भारताच्या चार दिशांना चार पीठांची स्थापना केली.

पुणे : जगदगुरू शंकराचार्याने भारतभ्रमण केले आणि त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ, श्रृंगेरी पीठ, शारदापीठ आणि ज्योर्तिमठ अशा भारताच्या चार दिशांना चार पीठांची स्थापना केली. जगदगुरू शंकराचार्य आपणास मिळालेले देणे आहे. अशा कार्यक्रमातून आम्हाला एक प्रकारची शक्ती मिळते, असे प्रतिपादन लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी केले.आद्य शंकराचार्य जयंती महोत्सवानिमित्त श्रुतिसागर आश्रमातर्फे ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांना भगवत्पूज्यपाद आदी शंकराचार्य पुरस्कार आणि वेदमूर्ती श्रीधर अडी यांना वेदसंवर्धन पुरस्कार सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी महापौर मुक्ता टिळक, कुडली श्रृंगेरी मठाचे शंकराचार्य विद्याभिनव शंकरभारती महास्वामी, श्रुतिसागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती, स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब तराणेकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी, अमरावती विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. एस. टी. देशमुख आदी उपस्थित होते.महाजन म्हणाल्या, आपल्या देशातील सुराज्य आणि सुशासनाची परंपरा रामायण-महाभारतापासून चालत आलेली आहे. मंगोलिया देशातील लोक बौद्ध धर्म स्वीकारून भारताकडे पाहात आहेत. आपण त्यांना जवळ करावे, असे वाटते. भारतातील दगडसुद्धा व्हिएतनाममध्ये सांभाळून ठेवले जातात. आपणास याबद्दल काहीच माहिती नाही. प्रत्येकाने देश समजावून घेणे गरजेचे आहे.महापौर टिळक म्हणाल्या, दांभिकतेमुळे समाज भरकटत जात आहे. समाज भरकटू नये, यासाठी श्रुतिसागर आश्रमाकडून कार्य केले जात आहे. माणिकप्रभूमहाराज म्हणाले, हा सन्मान माझा नाही तर गुरू परंपरेचा सन्मान आहे. स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती म्हणाल्या, आज समाजात दांभिकता वाढलेली आहे. धर्माचे अधिष्ठान सगळ्यांना लाभावे, यासाठी सर्व संत आपणास मार्गदर्शक केले आहे. प्रास्ताविक उदय जोशी यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेSumitra Mahajanसुमित्रा महाजन