शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

मुंडण करून ‘जलसंपदा’चा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:02 IST

पाणी सोडण्याची मागणी : कोरड्या तलावात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

भिगवण : पुणे शहरासह मावळ विभागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खडकवासला धरणासह सर्व धरणे भरली; मात्र इंदापूर तालुक्यातील तलाव अद्यापही कोरडेच असल्याने शेतीसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पण, गेल्या पाच वर्षांपासून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव कोरडे पडले आहेत. वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी करूनही तलावात पाणी सोडले जात नसल्याने बुधवारी (दि. २९) शेतकºयांनी तलावात बोंबाबोंब आंदोलन करून सरकार आणि जलसंपदा विभागाच्या विरोधात घोषणा देऊन मुंडण करून निषेध केला.

गेल्या ५ वर्षांपासून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी हे तलाव कोरडेठाक पडले आहेत. मागील काळात पाऊस कमीझाल्याने दुष्काळ पडला होता. याही वर्षी या भागात पाऊस कमी झाला आहे; पण पुणे भागातील धरण साखळीत पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पाऊस सुरू असताना या शासनाने नदीद्वारे पाणी खाली सोडून वाया घालवले. पण, हेच वाया जाणारे पाणी कॅनॉलद्वारेसोडून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव भरून घेतले असते, तर या भागातील सिद्धेश्वर निंबोडी, मदनवाडी, पिंपळे, शेटफळगढे, पोंधवडी, भादलवाडी, स्वामी चिंचोली, पारवडी या लहान खेड्यांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली नसती, अशी खंत या वेळी आंदोलक शेतकºयांनी व्यक्त केली.अनेक वेळा या भागातील नागरिकांनी या तिन्ही तलावांत पाणी सोडण्याची मागणी करूनही त्याकडे डोळेझाक केल्याचा आरोप कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक रंगनाथ देवकाते यांनी केला. या वेळी गणपत ढवळे, गणेश साळुंके, सूरज बंडगर, आबासाहेब बंडगर, राजेंद्र धुमाळ, बबलू भोसले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौंड तालुक्यातील तलाव प्रत्येक पाळीला भरून घेतले जात असताना आकसापोटी इंदापूर तालुक्यातील काही तलाव, ज्यावर राजकीय नेत्यांची शेती सिंचनाखाली नाही, ते जाणूनबुजून पाटबंधारे खात्याकडून कोरडे ठेवले जात आहेत. तर, आमदार आणि माजी मंत्री याकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प