शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुंडण करून ‘जलसंपदा’चा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:02 IST

पाणी सोडण्याची मागणी : कोरड्या तलावात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

भिगवण : पुणे शहरासह मावळ विभागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खडकवासला धरणासह सर्व धरणे भरली; मात्र इंदापूर तालुक्यातील तलाव अद्यापही कोरडेच असल्याने शेतीसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पण, गेल्या पाच वर्षांपासून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव कोरडे पडले आहेत. वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी करूनही तलावात पाणी सोडले जात नसल्याने बुधवारी (दि. २९) शेतकºयांनी तलावात बोंबाबोंब आंदोलन करून सरकार आणि जलसंपदा विभागाच्या विरोधात घोषणा देऊन मुंडण करून निषेध केला.

गेल्या ५ वर्षांपासून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी हे तलाव कोरडेठाक पडले आहेत. मागील काळात पाऊस कमीझाल्याने दुष्काळ पडला होता. याही वर्षी या भागात पाऊस कमी झाला आहे; पण पुणे भागातील धरण साखळीत पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पाऊस सुरू असताना या शासनाने नदीद्वारे पाणी खाली सोडून वाया घालवले. पण, हेच वाया जाणारे पाणी कॅनॉलद्वारेसोडून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव भरून घेतले असते, तर या भागातील सिद्धेश्वर निंबोडी, मदनवाडी, पिंपळे, शेटफळगढे, पोंधवडी, भादलवाडी, स्वामी चिंचोली, पारवडी या लहान खेड्यांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली नसती, अशी खंत या वेळी आंदोलक शेतकºयांनी व्यक्त केली.अनेक वेळा या भागातील नागरिकांनी या तिन्ही तलावांत पाणी सोडण्याची मागणी करूनही त्याकडे डोळेझाक केल्याचा आरोप कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक रंगनाथ देवकाते यांनी केला. या वेळी गणपत ढवळे, गणेश साळुंके, सूरज बंडगर, आबासाहेब बंडगर, राजेंद्र धुमाळ, बबलू भोसले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौंड तालुक्यातील तलाव प्रत्येक पाळीला भरून घेतले जात असताना आकसापोटी इंदापूर तालुक्यातील काही तलाव, ज्यावर राजकीय नेत्यांची शेती सिंचनाखाली नाही, ते जाणूनबुजून पाटबंधारे खात्याकडून कोरडे ठेवले जात आहेत. तर, आमदार आणि माजी मंत्री याकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प