शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

मुंडण करून ‘जलसंपदा’चा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:02 IST

पाणी सोडण्याची मागणी : कोरड्या तलावात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

भिगवण : पुणे शहरासह मावळ विभागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खडकवासला धरणासह सर्व धरणे भरली; मात्र इंदापूर तालुक्यातील तलाव अद्यापही कोरडेच असल्याने शेतीसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पण, गेल्या पाच वर्षांपासून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव कोरडे पडले आहेत. वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी करूनही तलावात पाणी सोडले जात नसल्याने बुधवारी (दि. २९) शेतकºयांनी तलावात बोंबाबोंब आंदोलन करून सरकार आणि जलसंपदा विभागाच्या विरोधात घोषणा देऊन मुंडण करून निषेध केला.

गेल्या ५ वर्षांपासून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी हे तलाव कोरडेठाक पडले आहेत. मागील काळात पाऊस कमीझाल्याने दुष्काळ पडला होता. याही वर्षी या भागात पाऊस कमी झाला आहे; पण पुणे भागातील धरण साखळीत पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पाऊस सुरू असताना या शासनाने नदीद्वारे पाणी खाली सोडून वाया घालवले. पण, हेच वाया जाणारे पाणी कॅनॉलद्वारेसोडून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव भरून घेतले असते, तर या भागातील सिद्धेश्वर निंबोडी, मदनवाडी, पिंपळे, शेटफळगढे, पोंधवडी, भादलवाडी, स्वामी चिंचोली, पारवडी या लहान खेड्यांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली नसती, अशी खंत या वेळी आंदोलक शेतकºयांनी व्यक्त केली.अनेक वेळा या भागातील नागरिकांनी या तिन्ही तलावांत पाणी सोडण्याची मागणी करूनही त्याकडे डोळेझाक केल्याचा आरोप कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक रंगनाथ देवकाते यांनी केला. या वेळी गणपत ढवळे, गणेश साळुंके, सूरज बंडगर, आबासाहेब बंडगर, राजेंद्र धुमाळ, बबलू भोसले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौंड तालुक्यातील तलाव प्रत्येक पाळीला भरून घेतले जात असताना आकसापोटी इंदापूर तालुक्यातील काही तलाव, ज्यावर राजकीय नेत्यांची शेती सिंचनाखाली नाही, ते जाणूनबुजून पाटबंधारे खात्याकडून कोरडे ठेवले जात आहेत. तर, आमदार आणि माजी मंत्री याकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प