शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शंभूराजांचा इतिहास पाठ्यपुस्तकात- विनोद तावडे; समाधीस्थळी हजारो भक्तांची पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:05 IST

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शनिवारी राज्यभरातून आलेल्या हजारो शंभूभक्तांनी समाधिस्थळावर पुष्पवृष्टी केली.

कोरेगाव भीमा (जि. पुणे) : धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शनिवारी राज्यभरातून आलेल्या हजारो शंभूभक्तांनी समाधिस्थळावर पुष्पवृष्टी केली. धर्मसभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी, पुढच्या पिढीला शिवरायांचे प्रशासक नेतृत्व व शंभू छत्रपतींचा खरा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन दिले.भीमानदी तीरावर श्री क्षेत्र वढू-तुळापूर या स्मारकांना जोडणाऱ्या पुलाच्या निर्मितीच्या मागणीस हिरवा कंदील मिळाल्याचे सूतोवाच मंत्रिमहोदयांनी दिल्याने यापुढील काळात वढू-तुळापूर-आळंदी-देहू तीर्थक्षेत्र जोडण्यास मदत होणार आहे.ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडेअकरा वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच शासकीय मानवंदनाही देण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे, इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांच्यासह शंभूभक्त उपस्थित होते.तावडे म्हणाले, ‘श्री क्षेत्र वढू बुद्रुक हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. राज्य शासनाच्या वतीने शंभू छत्रपतींच्या समाधिस्थळाचा विकास आराखडा तयार करून आवश्यक तो निधी उपलब्ध करू. मराठा मोर्चाच्या मागणी पत्रावर निर्णय सुरू झाले आहेत. शिवशंभूंनी निर्माण केलेले स्वराज्य आपण सुजलाम सुफलाम करण्याचे काम करण्याची गरज असून, १ जानेवारीच्या दंगलीतील सर्व गुन्हे शासन मागे घेईल.पुरस्कार वितरणया वर्षीचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार डॉ. अमोल कोल्हे यांना, तर शंभूसेवा पुरस्कार मध्य प्रदेश इंदोर येथील युवराज विष्णू वस्ताद काशिद व गोकाकचे राजीव जाधव यांना प्रदान करण्यात आला.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे