शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शासनाकडून शाहिरांच्या पदरी उपेक्षाच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 13:14 IST

शाहिरी लोककलेचा प्राचीन आणि समृध्द वारसा जपणा-या शाहिरांच्या पदरी शासनाकडून मात्र उपेक्षाच पदरी पडत आहे.

ठळक मुद्देतुटपुंजे मानधन : मुख्यमंत्र्यांना १४ मागण्यांचे निवेदन सादरमानधनाची रक्कम वाढवून ती ३०००-५००० रुपये करावी

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : ज्ञानेश्वरीच्या बारा ओव्यांमध्ये शाहिरी परंपरेचा उल्लेख आढळतो. शिवकालापासून आजतागायत शाहिरांनी पोवाडे, कवणांमधून मनोरंजनापासून ते सामाजिक प्रबोधनापर्यंतचा प्रवास केला आहे. शाहिरी लोककलेचा प्राचीन आणि समृध्द वारसा जपणा-या शाहिरांच्या पदरी शासनाकडून मात्र उपेक्षाच पदरी पडत आहे.शाहिरी परंपरेतील वृध्द कलावंतांचे मानधन वाढावे, यासाठी मुख्यमंत्र्यांसह, सांस्कृतिक मंत्री आणि सामाजिक न्यायमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने लोककलावंतांच्या मागण्यांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा, अशी अपेक्षा शाहिरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.   शाहिरी वाङ्मय मौखिक परंपरेने आजही बदलत्या जीवनसंदर्भानुसार प्रवाही राहिलेले आहे. कालानुरुप शाहिरी रचना नीटस आणि आशयदृष्टया व्यापक होत गेली. स्वातंत्र्यलढा, युवकांचे कार्य, सामाजिक सुधारणा, अस्पृश्यतानिवारण, हुंडाबंदी, सामाजिक परिवर्तन, कामगारांचे प्रश्न, आंबेडकरी चळवळ, स्त्रियांचे प्रश्न असे विविध विषय शाहिरांनी पोवाडे, कवनांच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा वसा उचलला. लोकवाङ्मय, लोकसंगीत, लोकशिक्षण व लोकरंजन यातच शाहिरीचे मूळ अधिष्ठान असल्याने ते बदलत्या लोकजीवनाशी सुसंगती राखून विकसनशील राहिले. याच परंपरेवर शाहिरांनी आजतागायत उदरनिर्वाह चालवला आहे. तुटपुंज्या रकमेअभाची कुटुंबाचा गाडा ओढणे अवघड होत असताना वृध्दापकाळातही हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. शासनाकडून तुटपुंजे मानधन मिळत असल्याने लोककलावंतांच्या पदरी उपेक्षा पडत असल्याची भावना महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.सासवडला झालेल्या शाहीर परिषदेच्या अधिवेशनामध्ये शासनाकडून शाहिरांना असलेल्या अपेक्षा ठरावांच्या स्वरुपात मांडण्यात आल्या. मात्र, आजतागायत सांस्कृतिक कार्य विभागाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. वृध्द कलावंतांना शासनाकडून अ,ब,क या श्रेणींसाठी अत्यंत कमी मानधन देण्यात येते. मानधनाची रक्कम वाढवून ती ३०००-५००० रुपये करावी, अशी मागणी महाराष्ट्र शाहीर परिषदेतर्फे करण्यात आली आहे. वाढत्या महागाईनुसार, दर चार ते पाच वर्षांनी मानधनामध्ये वाढ करण्याची तरतूदही असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.वृध्द कलावंत मानधन योजनेसाठी जिल्हा समितीकडून दर वर्षी केवळ ६० प्रकरणे मंजूर होतात. १०० टक्के प्रकरणांना मंजुरी मिळावी, मागील शेकडो प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत, वृध्द कलावंतांच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीस योग्य कागदपत्रे सादर झाल्यानंतर त्वरित मानधन सुरु व्हावे, मानधनासाठी वयोमर्यादा ६० ऐवजी ५० करावी, शासनमान्य ओळखपत्र देऊन शाहीरांना आरोग्य सेवा, प्रवास सेवा मोफत उपलब्ध करुन द्यावी, मानधन मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये नियमितपणा असावा, कलावंतांसाठी नामांकित राखीव आसनव्यवस्था असावी, लोककलावंतांना विविध शासकीय समित्यांमध्ये कार्यरत राहण्याची व्यवस्था असावी, प्रत्येक लोककलावंताकडे शिखर संस्थेचे प्रमाणपत्र असावे, आदी १४ मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडे बरेचदा कलावंतांना हेलपाटे घालावे लागतात. वृध्द लोककलावंतांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन केल्यास आणि तो सांस्कृतिक कार्य आणि सामाजिक न्याय विभागाशी संलग्न ठेवल्यास सोय होऊ शकते, या मागणीवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.--------------------प्राचीन काळापासून शाहिरांनी लोककला जतन केली आहे. महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सासवड येथे झालेल्या अकराव्या अधिवेशनात १४ विविध मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले होते. मात्र, अद्याप या मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री यांना देण्यात आले आहे. याबाबत शासन पातळीवर गांभीर्याने विचार व्हायला हवा.- दादा पासलकर, अध्यक्ष, महाराष्ट्र शाहीर परिषद

टॅग्स :PuneपुणेartकलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVinod Tawdeविनोद तावडे