शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शासनाकडून शाहिरांच्या पदरी उपेक्षाच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 13:14 IST

शाहिरी लोककलेचा प्राचीन आणि समृध्द वारसा जपणा-या शाहिरांच्या पदरी शासनाकडून मात्र उपेक्षाच पदरी पडत आहे.

ठळक मुद्देतुटपुंजे मानधन : मुख्यमंत्र्यांना १४ मागण्यांचे निवेदन सादरमानधनाची रक्कम वाढवून ती ३०००-५००० रुपये करावी

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : ज्ञानेश्वरीच्या बारा ओव्यांमध्ये शाहिरी परंपरेचा उल्लेख आढळतो. शिवकालापासून आजतागायत शाहिरांनी पोवाडे, कवणांमधून मनोरंजनापासून ते सामाजिक प्रबोधनापर्यंतचा प्रवास केला आहे. शाहिरी लोककलेचा प्राचीन आणि समृध्द वारसा जपणा-या शाहिरांच्या पदरी शासनाकडून मात्र उपेक्षाच पदरी पडत आहे.शाहिरी परंपरेतील वृध्द कलावंतांचे मानधन वाढावे, यासाठी मुख्यमंत्र्यांसह, सांस्कृतिक मंत्री आणि सामाजिक न्यायमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने लोककलावंतांच्या मागण्यांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा, अशी अपेक्षा शाहिरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.   शाहिरी वाङ्मय मौखिक परंपरेने आजही बदलत्या जीवनसंदर्भानुसार प्रवाही राहिलेले आहे. कालानुरुप शाहिरी रचना नीटस आणि आशयदृष्टया व्यापक होत गेली. स्वातंत्र्यलढा, युवकांचे कार्य, सामाजिक सुधारणा, अस्पृश्यतानिवारण, हुंडाबंदी, सामाजिक परिवर्तन, कामगारांचे प्रश्न, आंबेडकरी चळवळ, स्त्रियांचे प्रश्न असे विविध विषय शाहिरांनी पोवाडे, कवनांच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा वसा उचलला. लोकवाङ्मय, लोकसंगीत, लोकशिक्षण व लोकरंजन यातच शाहिरीचे मूळ अधिष्ठान असल्याने ते बदलत्या लोकजीवनाशी सुसंगती राखून विकसनशील राहिले. याच परंपरेवर शाहिरांनी आजतागायत उदरनिर्वाह चालवला आहे. तुटपुंज्या रकमेअभाची कुटुंबाचा गाडा ओढणे अवघड होत असताना वृध्दापकाळातही हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. शासनाकडून तुटपुंजे मानधन मिळत असल्याने लोककलावंतांच्या पदरी उपेक्षा पडत असल्याची भावना महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.सासवडला झालेल्या शाहीर परिषदेच्या अधिवेशनामध्ये शासनाकडून शाहिरांना असलेल्या अपेक्षा ठरावांच्या स्वरुपात मांडण्यात आल्या. मात्र, आजतागायत सांस्कृतिक कार्य विभागाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. वृध्द कलावंतांना शासनाकडून अ,ब,क या श्रेणींसाठी अत्यंत कमी मानधन देण्यात येते. मानधनाची रक्कम वाढवून ती ३०००-५००० रुपये करावी, अशी मागणी महाराष्ट्र शाहीर परिषदेतर्फे करण्यात आली आहे. वाढत्या महागाईनुसार, दर चार ते पाच वर्षांनी मानधनामध्ये वाढ करण्याची तरतूदही असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.वृध्द कलावंत मानधन योजनेसाठी जिल्हा समितीकडून दर वर्षी केवळ ६० प्रकरणे मंजूर होतात. १०० टक्के प्रकरणांना मंजुरी मिळावी, मागील शेकडो प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत, वृध्द कलावंतांच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीस योग्य कागदपत्रे सादर झाल्यानंतर त्वरित मानधन सुरु व्हावे, मानधनासाठी वयोमर्यादा ६० ऐवजी ५० करावी, शासनमान्य ओळखपत्र देऊन शाहीरांना आरोग्य सेवा, प्रवास सेवा मोफत उपलब्ध करुन द्यावी, मानधन मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये नियमितपणा असावा, कलावंतांसाठी नामांकित राखीव आसनव्यवस्था असावी, लोककलावंतांना विविध शासकीय समित्यांमध्ये कार्यरत राहण्याची व्यवस्था असावी, प्रत्येक लोककलावंताकडे शिखर संस्थेचे प्रमाणपत्र असावे, आदी १४ मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडे बरेचदा कलावंतांना हेलपाटे घालावे लागतात. वृध्द लोककलावंतांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन केल्यास आणि तो सांस्कृतिक कार्य आणि सामाजिक न्याय विभागाशी संलग्न ठेवल्यास सोय होऊ शकते, या मागणीवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.--------------------प्राचीन काळापासून शाहिरांनी लोककला जतन केली आहे. महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सासवड येथे झालेल्या अकराव्या अधिवेशनात १४ विविध मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले होते. मात्र, अद्याप या मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री यांना देण्यात आले आहे. याबाबत शासन पातळीवर गांभीर्याने विचार व्हायला हवा.- दादा पासलकर, अध्यक्ष, महाराष्ट्र शाहीर परिषद

टॅग्स :PuneपुणेartकलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVinod Tawdeविनोद तावडे