शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रक्रियेचा सावळा गोंधळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:11 IST

पुणे : आरोग्य विभागाची गट-क पदासाठी २८ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली. विद्यार्थ्यांची गुणांकन यादी जाहीर केली. त्यानंतर अंतिम निवड ...

पुणे : आरोग्य विभागाची गट-क पदासाठी २८ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली. विद्यार्थ्यांची गुणांकन यादी जाहीर केली. त्यानंतर अंतिम निवड यादी लावली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, असे न होता थेट कागद पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे ई-मेल आणि फोन कॉल येऊ लागले. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले असून अंतिम यादी न लावता थेट निवड कोणत्या आधारावर केली जात आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित करून परीक्षेच्या निवड प्रक्रियेत गोंधळ होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांना गट-क समुपदेशाकरिता ज्या पात्र उमेदवारांना वैयक्तिरीत्या ई- मेल व दूरध्वनी संदेशद्वारे कळविले आहे, त्या उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व कागदपत्रांचा एक संच घेऊन ई- मेल मध्ये नमूद केलेल्या कार्यालयीन पत्यावर दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे. या आशयाचे पत्र पाठविले आहे. जर विभागाने परीक्षेचा अंतिम निकाल अथवा निवड यादीच प्रसिद्ध केलेली नाही. तर या विद्यार्थ्यांची कोणत्या आधारवर निवड केली. आरक्षणानुसार कोणत्या प्रवर्गाला किती गुणांना यादी निश्चित केली. कोणाची निवड झाली. याची कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे निवड यादी प्रसिद्ध करावी. मगच कागद पडताळणीसाठी बोलवण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

चौकट

परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे होतेय का?

या परीक्षा प्रक्रियेत सुरुवातीपासूनच गोंधळ सुरु आहे. परीक्षा रद्द करून एमपीएससी मार्फत घेण्याची मागणी केली होती. मात्र कोणतेही पुरावे नाहीत म्हणून परीक्षा प्रक्रिया राबविली गेली. अंतिम निवड यादी न लावताच कोणत्या आधारावर कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाऊ शकते. हे न समजण्यापलीकडचे आहे. गुणांकन यादी जाहीर केल्यानुसार एका मागोमाग बसलेल्या बरेच विद्यार्थ्यांना सामान गुण मिळाल्याचे दिसून येत आहे. काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळले असूनही कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले आहे. ज्या विद्यार्थ्याला अधिक गुण मिळाले आहेत, तो अजूनही ई-मेलची वाट बसला आहे. परीक्षा प्रक्रियेची चौकशीची गरज आहे. लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी पहिले ६ विद्यार्थी हे १२ वी पास आहेत. त्यातील पहिले आलेले २ विद्यार्थी हे एकच आडनाव असलेले आणि एकच गावातील आहे. तसेच ५-७ वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी पहिल्या ६ मध्ये नसावा, हे कुठेतरी घोटाळ्याकडे बोट दाखविणारे दिसत आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत नसावी, अशी शंका काही विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.