शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रक्रियेचा सावळा गोंधळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:11 IST

पुणे : आरोग्य विभागाची गट-क पदासाठी २८ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली. विद्यार्थ्यांची गुणांकन यादी जाहीर केली. त्यानंतर अंतिम निवड ...

पुणे : आरोग्य विभागाची गट-क पदासाठी २८ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली. विद्यार्थ्यांची गुणांकन यादी जाहीर केली. त्यानंतर अंतिम निवड यादी लावली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, असे न होता थेट कागद पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे ई-मेल आणि फोन कॉल येऊ लागले. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले असून अंतिम यादी न लावता थेट निवड कोणत्या आधारावर केली जात आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित करून परीक्षेच्या निवड प्रक्रियेत गोंधळ होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांना गट-क समुपदेशाकरिता ज्या पात्र उमेदवारांना वैयक्तिरीत्या ई- मेल व दूरध्वनी संदेशद्वारे कळविले आहे, त्या उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व कागदपत्रांचा एक संच घेऊन ई- मेल मध्ये नमूद केलेल्या कार्यालयीन पत्यावर दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे. या आशयाचे पत्र पाठविले आहे. जर विभागाने परीक्षेचा अंतिम निकाल अथवा निवड यादीच प्रसिद्ध केलेली नाही. तर या विद्यार्थ्यांची कोणत्या आधारवर निवड केली. आरक्षणानुसार कोणत्या प्रवर्गाला किती गुणांना यादी निश्चित केली. कोणाची निवड झाली. याची कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे निवड यादी प्रसिद्ध करावी. मगच कागद पडताळणीसाठी बोलवण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

चौकट

परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे होतेय का?

या परीक्षा प्रक्रियेत सुरुवातीपासूनच गोंधळ सुरु आहे. परीक्षा रद्द करून एमपीएससी मार्फत घेण्याची मागणी केली होती. मात्र कोणतेही पुरावे नाहीत म्हणून परीक्षा प्रक्रिया राबविली गेली. अंतिम निवड यादी न लावताच कोणत्या आधारावर कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाऊ शकते. हे न समजण्यापलीकडचे आहे. गुणांकन यादी जाहीर केल्यानुसार एका मागोमाग बसलेल्या बरेच विद्यार्थ्यांना सामान गुण मिळाल्याचे दिसून येत आहे. काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळले असूनही कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले आहे. ज्या विद्यार्थ्याला अधिक गुण मिळाले आहेत, तो अजूनही ई-मेलची वाट बसला आहे. परीक्षा प्रक्रियेची चौकशीची गरज आहे. लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी पहिले ६ विद्यार्थी हे १२ वी पास आहेत. त्यातील पहिले आलेले २ विद्यार्थी हे एकच आडनाव असलेले आणि एकच गावातील आहे. तसेच ५-७ वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी पहिल्या ६ मध्ये नसावा, हे कुठेतरी घोटाळ्याकडे बोट दाखविणारे दिसत आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत नसावी, अशी शंका काही विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.