शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

अंधेर नगरी चौपट राजा! ग्रामपंचायतीत एकाच घरातील अनेक उमेदवार; मतदारही गोंधळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 14:59 IST

या पूर्वीचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी या निवडणुकीत एकत्र झाल्याने गटाचे आणि नेतृत्वाचे अस्तित्व कोठेही दिसत नाही असे वास्तव चित्र आज तरी उरुळी कांचन ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान दिसत आहे

उरुळी कांचन - 'उरुळी कांचन' ग्रामपंचायत निवडणूकीची वाटचाल लोकशाहीतील घराणेशाही कडे तर चालू झाली नाही ना असा प्रश्न ? जनता व मतदारांपुढे उभा राहिला आहे एकाच घरातील दोन दोन - तीन तीन उमेदवारांमुळे मतदारच नव्हे तर गाव पुढारीही गोंधळून गेले आहेत. ऊरूळीकांचन मध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या एकूण १७ जागा असून यापैकी एक जागा बिनविरोध निवडून आल्याने १६ जागांसाठी एकूण ५५ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.  

उरुळी कांचन या गावाला गेल्या १५ वर्षांपासून प्रगल्भ तथा जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार दरबारी वजन असणारे नेतृत्व ग्रामपंचायतीत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा, कचरा निर्मूलनाचा, वाहतूक कोंडीचा, आरोग्याच्या सुविधांचा, गावातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीचा, महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांचा, ग्रामसचिवालय इमारतीचा तसेच रस्ते, ओढे व मोकळ्या सार्वजनिक जागांवर होणारे अतिक्रमण काढण्याचा असे अनेक प्रश्न आ वासून समोर उभे असताना ते सोडवण्यासाठी कोणताही आराखडा आखताना व विकासाची दिशा देणारे काम होत नसताना नेमके ग्रामपंचायत सदस्य का व्हायचे हे कोडे उलगडत नाही अशी  जाणकारांमध्ये चर्चा आहे.

या पूर्वीचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी या निवडणुकीत एकत्र झाल्याने गटाचे आणि नेतृत्वाचे अस्तित्व कोठेही दिसत नाही असे वास्तव चित्र आज तरी उरुळी कांचन ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान दिसत आहे, जिल्ह्यात आपल्या मनमानी व दिशाहीन कारभाराने नेहमीच राजकीय व सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व दलीय ताले वार उमेदवारांनी फक्त ग्रामपंचायतीत निवडून जाण्यासाठी कालचा प्रतिस्पर्धी आजचा मित्र म्हणत वार्डा - वार्डात हातमिळवणी केल्याने  मतदार चांगलेच चक्रावून गेले आहेत, तर स्थानिक राजकीय रंगमंच सतत बदलत्या भूमिकेने हलता ठेवण्याच्या प्रवृत्तीने गटांचे , स्थानिक नेतृत्वाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे फ्लेक्सवरील फोटोवरून जाणवू लागल्याची चर्चा चौका चौकात रंगात आली आहे.

प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र भूमिका, आघाडी,युती, गुप्त आणा भाका..  घेवूनही त्या न पाळता एकाला चलो रे चा नारा देत समोरच्याला कसा अडचणीत आणायचा हे निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांचे व त्यांच्या मार्गदर्शकांचे तंत्र सर्वसामान्य मतदाराला बुचकाळ्यात टाकत असल्याने येत्या १८ तारखेला काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणची निवडणुक  म्हणजे ' अंधेर नगरी चौपट राजा 'अशीच झाली असे जाणकारांचे मत आहे. काही मतदार व जाणकार म्हणतात 'परग्रहावरील तारे मोजता येतील'पण उरुळी कांचनच्या स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांंचा व कार्यकर्त्यांचा अंदाज बांधणे महाकठीण झाले असल्याचा प्रत्यय चालू निवडणूकीत येताना दिसत आहे.

समस्यांच्या गर्तेत असलेल्या या मोठ्या लोकसंख्येच्या शहराला सशक्त नेतृत्वाचा पर्याय मिळेल म्हणून जनता या निवडणुकीकडे अपेक्षेने पाहत आहे, मात्र निवडणूकीत मतदारांना शह काटशहाचं राजकारण करणाऱ्या मंडळींच्या अनोख्या पध्दतीने एकत्र येऊन संधिसाधूपणाचे राजकारण पहाण्याची वेळ जनतेवर येवून ठेपली आहे. प्रत्येक निवडणुकीत या ठिकाणी मतदार राजा आपल्या समस्या सोडविणारा प्रतिनिधी निवडून देण्याचा प्रयत्न करतो मात्र या ठिकाणी निवडून गेल्यावर दरवेळी मतदारांची व नागरिकांची अपेक्षा फोल ठरणारी कृती, आघाडी युती होण्याने गावाला वाली राहणार का गाव बकाल होणार हे १८ जानेवारीलाच कळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक