शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अंधेर नगरी चौपट राजा! ग्रामपंचायतीत एकाच घरातील अनेक उमेदवार; मतदारही गोंधळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 14:59 IST

या पूर्वीचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी या निवडणुकीत एकत्र झाल्याने गटाचे आणि नेतृत्वाचे अस्तित्व कोठेही दिसत नाही असे वास्तव चित्र आज तरी उरुळी कांचन ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान दिसत आहे

उरुळी कांचन - 'उरुळी कांचन' ग्रामपंचायत निवडणूकीची वाटचाल लोकशाहीतील घराणेशाही कडे तर चालू झाली नाही ना असा प्रश्न ? जनता व मतदारांपुढे उभा राहिला आहे एकाच घरातील दोन दोन - तीन तीन उमेदवारांमुळे मतदारच नव्हे तर गाव पुढारीही गोंधळून गेले आहेत. ऊरूळीकांचन मध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या एकूण १७ जागा असून यापैकी एक जागा बिनविरोध निवडून आल्याने १६ जागांसाठी एकूण ५५ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.  

उरुळी कांचन या गावाला गेल्या १५ वर्षांपासून प्रगल्भ तथा जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार दरबारी वजन असणारे नेतृत्व ग्रामपंचायतीत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा, कचरा निर्मूलनाचा, वाहतूक कोंडीचा, आरोग्याच्या सुविधांचा, गावातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीचा, महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांचा, ग्रामसचिवालय इमारतीचा तसेच रस्ते, ओढे व मोकळ्या सार्वजनिक जागांवर होणारे अतिक्रमण काढण्याचा असे अनेक प्रश्न आ वासून समोर उभे असताना ते सोडवण्यासाठी कोणताही आराखडा आखताना व विकासाची दिशा देणारे काम होत नसताना नेमके ग्रामपंचायत सदस्य का व्हायचे हे कोडे उलगडत नाही अशी  जाणकारांमध्ये चर्चा आहे.

या पूर्वीचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी या निवडणुकीत एकत्र झाल्याने गटाचे आणि नेतृत्वाचे अस्तित्व कोठेही दिसत नाही असे वास्तव चित्र आज तरी उरुळी कांचन ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान दिसत आहे, जिल्ह्यात आपल्या मनमानी व दिशाहीन कारभाराने नेहमीच राजकीय व सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व दलीय ताले वार उमेदवारांनी फक्त ग्रामपंचायतीत निवडून जाण्यासाठी कालचा प्रतिस्पर्धी आजचा मित्र म्हणत वार्डा - वार्डात हातमिळवणी केल्याने  मतदार चांगलेच चक्रावून गेले आहेत, तर स्थानिक राजकीय रंगमंच सतत बदलत्या भूमिकेने हलता ठेवण्याच्या प्रवृत्तीने गटांचे , स्थानिक नेतृत्वाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे फ्लेक्सवरील फोटोवरून जाणवू लागल्याची चर्चा चौका चौकात रंगात आली आहे.

प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र भूमिका, आघाडी,युती, गुप्त आणा भाका..  घेवूनही त्या न पाळता एकाला चलो रे चा नारा देत समोरच्याला कसा अडचणीत आणायचा हे निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांचे व त्यांच्या मार्गदर्शकांचे तंत्र सर्वसामान्य मतदाराला बुचकाळ्यात टाकत असल्याने येत्या १८ तारखेला काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणची निवडणुक  म्हणजे ' अंधेर नगरी चौपट राजा 'अशीच झाली असे जाणकारांचे मत आहे. काही मतदार व जाणकार म्हणतात 'परग्रहावरील तारे मोजता येतील'पण उरुळी कांचनच्या स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांंचा व कार्यकर्त्यांचा अंदाज बांधणे महाकठीण झाले असल्याचा प्रत्यय चालू निवडणूकीत येताना दिसत आहे.

समस्यांच्या गर्तेत असलेल्या या मोठ्या लोकसंख्येच्या शहराला सशक्त नेतृत्वाचा पर्याय मिळेल म्हणून जनता या निवडणुकीकडे अपेक्षेने पाहत आहे, मात्र निवडणूकीत मतदारांना शह काटशहाचं राजकारण करणाऱ्या मंडळींच्या अनोख्या पध्दतीने एकत्र येऊन संधिसाधूपणाचे राजकारण पहाण्याची वेळ जनतेवर येवून ठेपली आहे. प्रत्येक निवडणुकीत या ठिकाणी मतदार राजा आपल्या समस्या सोडविणारा प्रतिनिधी निवडून देण्याचा प्रयत्न करतो मात्र या ठिकाणी निवडून गेल्यावर दरवेळी मतदारांची व नागरिकांची अपेक्षा फोल ठरणारी कृती, आघाडी युती होण्याने गावाला वाली राहणार का गाव बकाल होणार हे १८ जानेवारीलाच कळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक