शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

आठपैकी सात बंधारे कोरडे; १३ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: February 24, 2016 03:28 IST

इंदापूर तालुक्यातील ११ गावे व २३ वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ५ गावांचे टँकरचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात, तर १५ प्रस्ताव पंचायत समितीच्या कार्यालयात

इंदापूर तालुक्यातील ११ गावे व २३ वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ५ गावांचे टँकरचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात, तर १५ प्रस्ताव पंचायत समितीच्या कार्यालयात प्रलंबित आहेत. ३ गावांकडून चारा छावणीची मागणी आली आहे.तालुक्यातील कळंब, वडापुरी, शिरसटवाडी, गलांडवाडी क्र. १ (विठ्ठलवाडी), गोखळी, खोरोची, वकीलवस्ती, कौठळी, शेटफळगढे, रुई, कळस या ११ गावांना व ५७ चाळ, लालपुरी, लक्ष्मीनगर, वेताळनगर, साठेनगर, पवारवस्ती, शिंदेवस्ती, रामवाडी, पिंगळेवाडी, पांढरेवस्ती, माळशिकारेवस्ती, घोगरेवस्ती, सोपानवस्ती, खामगळवस्ती, मगरवस्ती, चोरमलेवस्ती, मारकडवस्ती, कौठी, आमराईमळा, काळेवागळेवस्ती, शिंदेवस्ती, थोरातवस्ती, मराडेवस्ती, गोसावीवस्ती, बिरंगुडी, पिलेवाडी या २३ वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दगडवाडी, अकोले (वायसेवस्ती), घोरपडेवस्ती, व्याहळी, भोडणी या गावांचे टँकरचे प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत.निमसाखर, कडबनवाडी, चाकाटी, बावडा (कचरवाडी), बावडा, बिजवडी, निमगाव केतकी, पिटकेश्वर, न्हावी, काझड, सराफवाडी, सुरवड, निमगाव केतकी (कचरवाडी) तरंगवाडी, झगडेवाडी येथील प्रस्ताव पंचायत समितीमध्ये प्रलंबित आहेत. तालुक्यात १ लाख ४० हजार ६१७ पाळीव जनावरे आहेत. त्यांमध्ये १ लाख १६ हजार मोठी व २३ हजार ९०७ लहान जनावरे आहेत. तालुक्यात १ लाख १४ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. हा चारा मार्चअखेर पुरेल, असे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले. यामधील १ हजार ९३० मेट्रिक टन चारा दररोज लागणार आहे. तालुक्यातील २२ गावे अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतात. एप्रिल महिन्यात म्हसोबाचीवाडी, लाकडी, निमगाव केतकी; तर मे महिन्यात बिजवडी, शहजीनगर, कळस, निमसाखर भागात चारा छावण्या सुरू कराव्या लागतील, अशी स्थिती आहे. दरम्यान, म्हसोबाचीवाडी, कळंब अकोले येथील शेतकऱ्यांनी चाऱ्याची मागणी केली आहे. पाण्याची उपलब्धता असणाऱ्या भागातील १,२०० हेक्टर क्षेत्रावर चारापिकांसाठी बियाण्यांचा पुरवठा करण्याच्या सूचना तालुका कृषी कार्यालयाला करण्यात आल्या आहेत. ४ फेब्रुवारी रोजी खडकवासला कालव्याच्या आर्वतनाने तालुक्यातील तलाव भरण्यात आले. तालुक्यातील ८ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांपैकी केवळ जांब येथील बंधाऱ्यातच ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर, उरलेले बंधारे कोरडे आहेत.