शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय कामातून सेवेची संधी

By admin | Updated: June 2, 2017 01:39 IST

प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकशाहीत लोकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची संधी मिळाली़ आपल्याला पगार मिळतो़ पगार

प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकशाहीत लोकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची संधी मिळाली़ आपल्याला पगार मिळतो़ पगार घेऊन सामाजिक काम करण्याची ही संधी आहे़ लोकांमध्ये थेट मिसळून त्याप्रमाणे निरपेक्ष भावनाने काम केल्यास लोकही चांगला प्रतिसाद देतात, असा मला अनुभव आला आहे़ आधिकाधिक चांगले काम करण्याची समाजसेवेची संधी आहे़ कोणत्याही कामात सकारात्कता दाखविल्यास व तसे काम केल्यास आणखी काम करण्याची प्रचंड उर्जा मिळते, असा माझा अनुभव असल्याचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी लोकमत शी बोलताना सांगितले़कोकण विभागीय आयुक्त म्हणून प्रभाकर देशमुख हे नुकतेच निवृत्त झाले़ त्यांच्या आजवरच्या सेवेबद्दल रविवारी पुण्यात त्यांचा माण गौरव समितीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे़ मुळचे माण तालुक्यातील असलेले प्रभाकर देशमुख हे १९८२ साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले़ तेव्हापासून २०१७ पर्यंत कोकण विभागीय आयुक्त म्हणून काम करीत असताना आलेल्या अनुभवाविषयी ते म्हणाले, संपूर्ण कारकिर्दीत जेथे जेथे काम करण्याची संधी मिळाली, तेथे नेहमीच्या कामापेक्षा वेगळे प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केला़ पंढरपूर येथे काम करीत असताना शासनाने बडव्यांकडून नुकतीच मंदिर ताब्यात घेतले होते़ सुरुवातीला कोणत्याही कामासाठी विरोध होत होता़ समन्वयाने त्यातून मार्ग काढून पुजा व्यवस्था मार्गी लावली़ मंदिरात चिखलाचे साम्राज्य होते़ वारकऱ्यांना त्याच परिस्थितीत ३० -३० तास रांगेत थांबावे लागत असे़ त्यावेळी हातात १० लाख रुपये असताना ७० लाखांचे दर्शन मंडपाचे काम हाती घेतले़ लोकवर्गणीतून ३ वर्षात हे काम पूर्ण केले़ वारकऱ्यांना सुविधा दिल्याचे खूप मोठे समाधान आहे़ कोल्हापूरला जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत असताना राजश्री शाहू सार्वंगिण शिक्षण कार्यक्रम राबविला़ त्यामध्ये १७२८ शाळा, २ लाख ७१ हजार विद्यार्थी आणि ८ हजार ५०० शिक्षण सहभागी झाले़ मुलांमध्ये बौद्धिक, शारीरिक, मानसिक व सामाजिक जाणीव निर्मिती केली़ मी स्वत: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्याने त्या अवस्थेतून गेलो होतो़ पालक शिक्षकांच्या सहभागातून प्रकल्प यशस्वी केला़ स्वतंत्र संस्थेकडून त्यांचे मुल्यमापन करुन घेतले़ हा उपक्रम प्राथमिक शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरला़ त्याला केंद्र शासनाचा अतिउत्कृष्ट सेवेबद्दलचा पंतप्रधान पुरस्कार मिळाला़ हे सर्वाधिक समाधान देणारे काम वाटते़ याशिवाय कृषि आयुक्त म्हणून काम करताना पिकाचे नुकसान थांबविण्यासाठी कीड रोग निदान व नियंत्रणाबाबत कॉप सव्हिलॅन्स आॅफ अ‍ॅडव्हायजरी प्रकल्प राबविला़ त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुसऱ्यांदा प्रशासनातील उत्कृष सेवेसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले़ कीड सर्व्हेक्षण व नियंत्रण प्रकल्पाबाबत ई -गर्व्हनन्स अंतर्गत त्यांना राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण प्रदकाने गौरविण्यात आले़ डाळ उत्पादनात भरघोस वाढ केल्याने २०१० -११ मध्ये १ कोटी रुपयांच्या कृषि कर्मण पारितोषिकांनी सन्मानित केले गेले़ या सेवा काळात राजकीय पदाधिकाऱ्यांशी संघर्षाचा प्रसंग आला नाही़ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाने काम केले तर खूप चांगले काम होते, असा अनुभव आहे़ पुण्यात काम करीत असताना जिल्हा बँक, साखर कारखान्यांच्या निवडणुकात स्थानिक पातळीवर खूप मतभेद असतात़ पण आपण कायदेशीर आणि पारदर्शक काम केले तर ते सर्वांनाच मान्य करावे लागते़ या निवडणुकात एकही तक्रार झाली नाही़ शेवटच्या काळात रायगड किल्ला विकास, जतन व संवर्धन विकास योजनासाठी ६०० कोटींचा आराखडा तयार करुन महाराष्ट्र शासनामार्फत अंमलबजावणी सुरु केली आहे़ पुरातन विभाग व लोकसहभागातून या कामांमुळे रायगडचे चित्र बदलून जाईल़ सर्वांना प्रेरणा देणारे तीर्थक्षेत्र आहे़ हा ठेवा आपण जतन करुन ठेवायला हवा़ देशाला अभिमान वाटावा असा हा ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने काम करण्याची संधी मिळाली, हे एक समाधान आहे़