शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

दुय्यम निबंधक कार्यालयाचा ‘सर्व्हर डाऊन’; नागरिकांची प्रचंड गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 05:20 IST

गेल्या आठ दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी संपूर्ण राज्यातील सर्व्हर सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर लगेचच डाऊन झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे.

पुणे : गेल्या आठ दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी संपूर्ण राज्यातील सर्व्हर सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर लगेचच डाऊन झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. सर्व्हर डाऊनमुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गेलेल्या नागरिकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे.सदनिका, दुकाने, जमीन आदींच्या खरेदी-विक्रीसाठी नागरिकांना नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीसाठी आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दस्त नोंदणीची ही संगणकप्रणाली राष्ट्रीय सूचना केंद्राने (एनआयसी) विकसित केली आहे. या प्रणालीसाठीचे तांत्रिक सहकार्य हे एनआयसीकडून दिले जाते. राज्यात सुमारे ५०६ दुय्यम निबंधक कार्यालये असून या कार्यालयांमध्ये सदनिका, दुकाने, जमीन आदींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार तसेच भाडेकरार, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र आदी प्रकारचे दस्त नोंदविले जातात. या कार्यालयांमध्ये हे दस्त नोंदविण्यासाठी नागरिकांची नेहमी गर्दी असते. राज्यात रोज सरासरी आठ ते नऊ हजार दस्तांची नोंदणी होते.नोंदणी व मुद्रांक विभाग राज्याला महसूल देणारा दुसºया क्रमांकाचा विभाग आहे. दरवर्षी सुमारे २१ हजार कोटींचा महसूल राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो. तसेच कार्यालयात येणाºया नागरिकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे या विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याविषयी असोसिएशन आॅफ रिअल इस्टेट एजंट्स या संघटनेने सोमवारी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांची भेट घेतली. नोंदणी विभागातील या समस्येवर आवश्यक ती कार्यवाही करून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी असोसिएशन आॅफ रिअल इस्टेट एजंट्स या संघटनेने नोंदणी महानिरीक्षकांकडे केली आहे. या वेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र चौकसे, संजय ढोकळे, राजेंद्र जोशी, उमाशंकर यादव आदी उपस्थित होते.- दस्त नोंदणी प्रणालीमधील तांत्रिक समस्या अथवा सर्व्हरच्या डाऊन होण्यामुळे दस्त नोंदणीचे काम संथगतीने सुरू होते. अपेक्षित वेग मिळत नसल्याने दस्त नोंदणीसाठी नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे, तर काहींना दस्त नोंदणीसाठी दुसºया दिवशी पुन्हा कार्यालयात यावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून दस्त नोंदणीच्या प्रणालीमधील तांत्रिक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीचे काम अपेक्षित वेगाने होत नाही. याविषयी वारंवार नागरिकांनी आपल्या तक्रारी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागात दिल्या आहेत. तरी यावर तोडगा काढण्यात नोंदणी विभागाला यश आलेले नाही.

टॅग्स :Puneपुणे