शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

आगीत मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना सिरमने नोकरी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आग लागल्यामुळे सिरमचं मोठं नुकसान झाले आहे. त्याबद्दल आपण पंतप्रधान यांना पत्र लिहिणार असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आग लागल्यामुळे सिरमचं मोठं नुकसान झाले आहे. त्याबद्दल आपण पंतप्रधान यांना पत्र लिहिणार असून, आगीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना सरकारने दहा लाख आणि सिरमने कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

सिरमला भेट दिल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, सिरममध्ये आग लागली की लावली याची चौकशी होणे आवश्यक आहे.

न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर दिल्लीतील शेतकरी आंदोलन थांबले पाहिजे होते. शेतकरी नेतेच आज आंदोलन करत आहेत. बाजार समित्या बंद करणे ही सरकारची भूमिका नाही. कृषी कायदा मागे घेणं योग्य नाही, दबाव आणून कायदे मागे घ्यायला लावणे चुकीचं आहे. याबाबत केंद्राने बैठका घेण्यातही अर्थ नाही. शरद पवार यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत. आता कृषी कायद्याचा शरद पवार यांनी अभ्यास करून कायद्यात बदल सुचवायला हवा, असेही आठवले म्हणाले.

-----

चौकट

उद्धव ठाकरेंनी पुन्हा बीजेपीसोबत जावे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा पाहून वाटतंय की, उद्धव यांना ते सांगत आहे की उद्धव ठाकरे यांनी बीजेपी सोबत परत जायला हवे. असे सांगून आठवले यांनी उद्धव ठाकरे यांनी बीजेपीसोबत परत जायला हवे असे सांगितले. दरम्यान, राज्यातील सरकारचे भविष्य मला दिसत नसून, एकतर काँग्रेस पक्ष हात काढून घेईल नाहीतर दोन पक्षाला कंटाळून उद्धव ठाकरे आमच्यासोबत येतील, असेही ते म्हणाले.

---

मराठा समाजापेक्षा ओबीसी समाज मोठा

प्रत्येकाला आपल्या जातीची ताकद कळेल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. याकरिता जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे, अशी ओबीसीचीही मागणी असल्याचे सांगून आठवले यांनी मराठा समाजापेक्षा ओबीसी समाज मोठा असल्याचे सांगितले.

एल्गारमुळे कोरेगाव भीमाला दंगल झाली नाही

एल्गार परिषद घेण्याचा त्यांना अधिकार आहे, पण त्यात नक्षलवादी लोक असू नयेत. आंबेडकर, गांधीवादी लोक असावे. एल्गारमुळे कोरेगाव भीमाला दंगल झालेली नाही.

संभाजी भिडे दोषी असेल तर कारवाई करावी

नक्षलवाद्यांनी स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेऊ नये, असे या वेळी आठवले म्हणाले. संभाजी भिडे दोषी असेल तर या सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.