शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

आगीत मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना सिरमने नोकरी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आग लागल्यामुळे सिरमचं मोठं नुकसान झाले आहे. त्याबद्दल आपण पंतप्रधान यांना पत्र लिहिणार असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आग लागल्यामुळे सिरमचं मोठं नुकसान झाले आहे. त्याबद्दल आपण पंतप्रधान यांना पत्र लिहिणार असून, आगीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना सरकारने दहा लाख आणि सिरमने कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

सिरमला भेट दिल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, सिरममध्ये आग लागली की लावली याची चौकशी होणे आवश्यक आहे.

न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर दिल्लीतील शेतकरी आंदोलन थांबले पाहिजे होते. शेतकरी नेतेच आज आंदोलन करत आहेत. बाजार समित्या बंद करणे ही सरकारची भूमिका नाही. कृषी कायदा मागे घेणं योग्य नाही, दबाव आणून कायदे मागे घ्यायला लावणे चुकीचं आहे. याबाबत केंद्राने बैठका घेण्यातही अर्थ नाही. शरद पवार यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत. आता कृषी कायद्याचा शरद पवार यांनी अभ्यास करून कायद्यात बदल सुचवायला हवा, असेही आठवले म्हणाले.

-----

चौकट

उद्धव ठाकरेंनी पुन्हा बीजेपीसोबत जावे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा पाहून वाटतंय की, उद्धव यांना ते सांगत आहे की उद्धव ठाकरे यांनी बीजेपी सोबत परत जायला हवे. असे सांगून आठवले यांनी उद्धव ठाकरे यांनी बीजेपीसोबत परत जायला हवे असे सांगितले. दरम्यान, राज्यातील सरकारचे भविष्य मला दिसत नसून, एकतर काँग्रेस पक्ष हात काढून घेईल नाहीतर दोन पक्षाला कंटाळून उद्धव ठाकरे आमच्यासोबत येतील, असेही ते म्हणाले.

---

मराठा समाजापेक्षा ओबीसी समाज मोठा

प्रत्येकाला आपल्या जातीची ताकद कळेल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. याकरिता जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे, अशी ओबीसीचीही मागणी असल्याचे सांगून आठवले यांनी मराठा समाजापेक्षा ओबीसी समाज मोठा असल्याचे सांगितले.

एल्गारमुळे कोरेगाव भीमाला दंगल झाली नाही

एल्गार परिषद घेण्याचा त्यांना अधिकार आहे, पण त्यात नक्षलवादी लोक असू नयेत. आंबेडकर, गांधीवादी लोक असावे. एल्गारमुळे कोरेगाव भीमाला दंगल झालेली नाही.

संभाजी भिडे दोषी असेल तर कारवाई करावी

नक्षलवाद्यांनी स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेऊ नये, असे या वेळी आठवले म्हणाले. संभाजी भिडे दोषी असेल तर या सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.