शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

नाशिक पॅटर्नवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: April 5, 2015 00:34 IST

सत्तेच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी काँग्रेसला दूर सारत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेचा वाटा दिला आहे.

पुणे : सत्तेच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी काँग्रेसला दूर सारत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेचा वाटा दिला आहे. त्यामुळे नाशिक पॅटर्न आता पुणे महापालिकेतही कायम झाला असून, राष्ट्रवादीला भविष्यात मदत करण्याच्या आश्वासनावर मनसेला शहर सुधारणा समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने शनिवारी झालेल्या निवडणुकीत मतदान केले. या समित्यांवर अनुक्रमे अ‍ॅड. रूपाली पाटील आणि अचर्ना कांबळे यांची अध्यक्षपदासाठी वर्णी लागली. तर विधी समिती आणि क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी अनुक्रमे महेंद्र पठारे आणि सुनील गोगले यांची निवड झाली. मात्र, राष्ट्रवादीने मनसेचा पाठिंबा घेत त्यांनाही सत्तेत सहभागी करून घेतल्याने नाराज झालेल्या काँग्रेसने या चारही समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर बहिष्कार टाकत आपला राग व्यक्त केला आहे.मागील महिन्यात झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू होती. काँग्रेसला अध्यक्षपद देण्यासाठी राष्ट्रवादीने नकार दिल्याने कॉंग्रेसने परिवहन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का देत, शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीकडून विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस एवढेच संख्याबळ असलेल्या मनसेला हाताला धरत, कॉंग्रेसला धडा शिकविण्यासाठी मनसेला दोन अध्यक्षपदे देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार, आज राष्ट्रवादीने मनसेच्या उमेदवारांना तर मनसेने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करत निवडून दिले.तर क्रीडा समितीच्या अध्यक्षपदासाठी मनसे आणि राष्ट्रवादीनेही अर्ज दाखल न केल्याने भाजपाच्या नगरसेविका मनीषा चोरबेले या बिनविरोध निवडून आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साखर आयुक्त विपीन शर्मा यांनी काम पाहिले. नगरसचिव सुनील पारखी, सभागृह नेते सुभाष जगताप, मनसेचे गटनेते बाबू वागस्कर, सेनेचे गटनेते अशोक हरणावळ, भाजपाच्या माजी गटनेत्या मुक्ता टिळक या वेळी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)काँग्रेसचा बहिष्कार या सर्व समित्यांमध्ये काँग्रेसचे प्रत्येकी २ नगरसेवक होते. त्यामुळे काँग्रेसला या समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यपक्षासाठी सूचक आणि अनुमोदक नसल्याने अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यातच समविचारी असलेल्या राष्ट्रवादीने मनसेला सोबत घेतल्याने काँग्रेसच्या सदस्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, निवडणूक सुरू होताच विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, आपल्या सदस्यांनी बहिष्कार टाकल्याचे सांगत निघून गेले.