शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मानवंदना अन् साश्रूनयनांनी प्रसाद बेंद्रे यांना निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 01:47 IST

सीमा सुरक्षा दलाचे होते अधिकारी : कर्तव्य बजावत असताना झाले निधन

पुणे : अवघ्या २७ व्या वर्षी प्रसाद बेंद्रे यांचे सीमेवर देशाचे रक्षण करीत असताना त्यांचे निधन झाले. त्यांना मानवंदना देत असताना आणि आईच्या हाती तिरंगा सोपविताना उपस्थितांचे डोळेही पाणावले. शिवाजीनगर गावठाण येथे राहणारे सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद प्रकाश बेंद्रे (वय २७) यांच्यावर रविवारी भावपूर्ण वातावरणात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मणिपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले होते़ त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आले़शिवाजीनगर गावठाण येथील राहत्या घरापासून फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली़ शिवाजीनगर गावठाणाबरोबर शहरातील विविध भागातील नागरिक अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ वैकुंठ स्मशानभूमीत अंत्ययात्रा आल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी बेंद्रे यांच्या पार्थिवावरील तिरंगा काढून त्यांच्या आईच्या हातात दिला़ यावेळी त्यांना व बेंद्रे यांच्या बहिणींच्या अश्रूंचा बांध फुटला़ तेव्हा उपस्थितांनाही गहिवरून आले़ सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हवेत तीन वेळा गोळीबार करून त्यांना मानवंदना दिली़ यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते़बेंद्रे कुटुंबीय शिवाजीनगर गावठाणात पंचमुखी मारुती परिसरात वास्तव्यास आहेत. शनिवारी प्रसाद यांचे निधन झाल्याची माहिती नातेवाइकांना समजली. त्यानंतर परिसरातील नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेतली.उपस्थितांच्याही कडा ओलावल्या...४प्रसाद बेंद्रे यांच्या मागे पत्नी, आई व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे़ चार वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते़ प्रसाद यांचा दौंड येथील सायली डहाळे यांच्याशी जुलै २०१६ मध्ये विवाह झाला होता़ तसेच सायली या गरोदर आहेत. त्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावलेल्या दिसून येत होत्या.१ पोलीस वसाहतीतील हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालयामध्ये त्यांचे शिक्षण झाले़ त्यानंतर मॉडर्न हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण झाले़ बारावीनंतर ते बीएसएफच्या १८२ व्या तुकडीत दाखल झाले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ते श्रीनगरमध्ये कार्यरत होते. नुकतीच त्यांची मणिपूर, इम्फाळ येथील चीन सीमेवर बदली झाली.२ गणपतीत ते पुण्यात आले होते़ हीच त्यांची अखेरची भेट ठरली़ गणपतीनंतर त्यांची मणिपूरला बदली झाली़ सुमारे ५ दिवसांपूर्वी त्यांना न्युमोनिया झाला होता़ भाऊबिजेनिमित्त त्यांच्याशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे शुक्रवारी बोलणे झाले होते़३ त्यांना श्वसनाचा थोडा त्रास जाणवत होता. हॉस्पिटलमधून लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते़ त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचे एका पाठोपाठ दोन झटके आले़ त्यातच त्यांचे निधन झाले.

टॅग्स :Puneपुणे