शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मानवंदना अन् साश्रूनयनांनी प्रसाद बेंद्रे यांना निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 01:47 IST

सीमा सुरक्षा दलाचे होते अधिकारी : कर्तव्य बजावत असताना झाले निधन

पुणे : अवघ्या २७ व्या वर्षी प्रसाद बेंद्रे यांचे सीमेवर देशाचे रक्षण करीत असताना त्यांचे निधन झाले. त्यांना मानवंदना देत असताना आणि आईच्या हाती तिरंगा सोपविताना उपस्थितांचे डोळेही पाणावले. शिवाजीनगर गावठाण येथे राहणारे सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद प्रकाश बेंद्रे (वय २७) यांच्यावर रविवारी भावपूर्ण वातावरणात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मणिपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले होते़ त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आले़शिवाजीनगर गावठाण येथील राहत्या घरापासून फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली़ शिवाजीनगर गावठाणाबरोबर शहरातील विविध भागातील नागरिक अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ वैकुंठ स्मशानभूमीत अंत्ययात्रा आल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी बेंद्रे यांच्या पार्थिवावरील तिरंगा काढून त्यांच्या आईच्या हातात दिला़ यावेळी त्यांना व बेंद्रे यांच्या बहिणींच्या अश्रूंचा बांध फुटला़ तेव्हा उपस्थितांनाही गहिवरून आले़ सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हवेत तीन वेळा गोळीबार करून त्यांना मानवंदना दिली़ यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते़बेंद्रे कुटुंबीय शिवाजीनगर गावठाणात पंचमुखी मारुती परिसरात वास्तव्यास आहेत. शनिवारी प्रसाद यांचे निधन झाल्याची माहिती नातेवाइकांना समजली. त्यानंतर परिसरातील नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेतली.उपस्थितांच्याही कडा ओलावल्या...४प्रसाद बेंद्रे यांच्या मागे पत्नी, आई व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे़ चार वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते़ प्रसाद यांचा दौंड येथील सायली डहाळे यांच्याशी जुलै २०१६ मध्ये विवाह झाला होता़ तसेच सायली या गरोदर आहेत. त्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावलेल्या दिसून येत होत्या.१ पोलीस वसाहतीतील हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालयामध्ये त्यांचे शिक्षण झाले़ त्यानंतर मॉडर्न हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण झाले़ बारावीनंतर ते बीएसएफच्या १८२ व्या तुकडीत दाखल झाले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ते श्रीनगरमध्ये कार्यरत होते. नुकतीच त्यांची मणिपूर, इम्फाळ येथील चीन सीमेवर बदली झाली.२ गणपतीत ते पुण्यात आले होते़ हीच त्यांची अखेरची भेट ठरली़ गणपतीनंतर त्यांची मणिपूरला बदली झाली़ सुमारे ५ दिवसांपूर्वी त्यांना न्युमोनिया झाला होता़ भाऊबिजेनिमित्त त्यांच्याशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे शुक्रवारी बोलणे झाले होते़३ त्यांना श्वसनाचा थोडा त्रास जाणवत होता. हॉस्पिटलमधून लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते़ त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचे एका पाठोपाठ दोन झटके आले़ त्यातच त्यांचे निधन झाले.

टॅग्स :Puneपुणे