शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

लोकसहभागातून स्थानिक बियाणांची निवड व संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 11:55 IST

शेतीकट्टा : बायफ, पुणे या संस्थेने लोकसहभागातून स्थानिक पीक जातीचे संवर्धन, संरक्षण व पुनर्वापर कार्यक्रम सुरू केला आहे. 

- प्रमोद जाधव (उपायुक्त, समाजकल्याण)

शेतीमध्ये बियाणे ही मूलभूत बाब असून, तो शेतीचा आत्मा आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागात पिकामध्ये वाणांची विविधता आढळते. सध्या वातावरणातील बदल, पोषण व अन्नसुरक्षा, चांगले जीवनमान या आव्हानांसाठी स्थानिक पिकांतील जैववैविधता संवर्धन ही काळाची गरज आहे. बायफ, पुणे या संस्थेने लोकसहभागातून स्थानिक पीक जातीचे संवर्धन, संरक्षण व पुनर्वापर कार्यक्रम सुरू केला. त्यांनी स्थानिक भाताचे सुमारे ३५० प्रकार तसेच नाचणी, ज्वारी व मका आदींचे २०० वाण संकलित केले आहेत. या वाणाची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केली. त्यातील चांगले बियाणे निवडून अधिक उत्पादन देणारे शुद्ध वाण विकसित केले आहेत. शेतकरी गट व बियाणे बँकाची निर्मिती असे उपक्रम सुरू आहेत.

काही जुन्या भात व अन्य बियाणांची चव अतिशय उत्तम आहे. तसेच काही पौष्टिक आहेत. या नैसिर्गक परिस्थितीत दीर्घकाळ टिकून असल्याने बहुतांश वाण काटक आहेत. हे वाण कमी-जास्त पाऊस व अन्य प्रतिकूल परिस्थितीतही तग धरतात. या वाणामध्ये प्रतिकारक क्षमता चांगली असल्याने रोग, किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. यातील बहुतांश भात जातीचे टरफल जाड असल्याने व अन्य कारणाने दाण्याचे किडीपासून कमी नुकसान होते.

स्थानिक जातींमध्ये जैववैविध्य मोठ्या प्रमाणात आढळते. डोंगराळ भाग, सखल भाग, खाडी किनाऱ्याचा भाग अशा विविध भौगोलिक परिस्थितीमध्ये येणारे वाण आहेत. तसेच हळवा, निमगरवा, गरवा अशा विविध कालावधीत येणारे वाण आहेत. कोथिंबीर साळ तांदळाला सुगंध आहे. बदलत्या हवामानाच्या काळात बियाणांचे जतन व संवर्धन आवश्यक आहे. या वैशिष्ट्यपूर्ण पीक जातीच्या स्थानिक ज्ञानाचे संकलन तसेच शुद्ध बियाणांची निर्मिती करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची नितांत आवश्यकता आहे. यामुळे बियाणांमध्ये स्वयंपूर्णता येईल.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी