शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक प्रगतीसाठी सीमेवर शांतता हवी - डेव्हिड. आर. सिमेलेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 03:22 IST

आर्थिक विकास साधायचा असेल, तर देशाच्या सीमांवर शांतता असणे गरजेचे असते. यासाठी सैन्यदल महत्त्वाची भूमिका बजावत असतात. संपूर्ण जगात भारतीय लष्कराची शिस्तबद्ध लष्कर म्हणून ओळख आहे.

पुणे : आर्थिक विकास साधायचा असेल, तर देशाच्या सीमांवर शांतता असणे गरजेचे असते. यासाठी सैन्यदल महत्त्वाची भूमिका बजावत असतात. संपूर्ण जगात भारतीय लष्कराची शिस्तबद्ध लष्कर म्हणून ओळख आहे. बदलत्या काळानुसार नवी आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करा, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हिड. आर. सिमेलेह यांनी केले.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)चा १३३व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ एनडीएच्या हबिबुल्ला सभागृहात उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिमेलेह बोलत होते. या प्रसंगी एनडीएचे कमांडंट एयर मार्शल जसजितसिंग कलेर, प्रबोधिनीचे उपप्रमुख रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला, प्राध्यापक, प्रशिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी बॅचलर आॅफ सायन्स विभागातील कमांडंट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ आर्मी स्टाफ ट्रॉफीचा मानकरी गुरुवंशसिंग गोसाल ठरला. बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स विभागातील कमांडंट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ नेव्हल स्टाफ ट्रॉफीचा मानकरी अनमोल अग्रहरी तर कला शाखेतील कमांडंट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ एअर स्टाफचा मानकरी राहुल बिष्ट ठरला. तिघांनाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ट्रॉफी देण्यात आल्या.सिमेलेह म्हणाले, ‘‘जागतिक पातळीवर अनेक बदल आज होत आहेत. आर्थिक विकासासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. मात्र, सीमेवर शांतता असल्यास आर्थिक विकास वेगाने साधता येतो. ही शांतता राखण्यासाठी सैन्यदले महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीय लष्कराला प्रतिष्ठा आहे. देशाच्या कानाकोपºयातून मोठी चाळणी पार करून विद्यार्थी येथे दाखल झाले आहेत. भविष्यात लष्करी तंत्रज्ञानात मोठे बदल होणार आहेत. यामुळे येणारा काळ हा आव्हाहनांचा असेल. यासाठी नवे बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा, नवी कौशल्ये आत्मसात करून स्वत:ला सिद्ध करा.’’जसजितसिंग कलेर म्हणाले, ‘‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संपूर्ण जगातील लष्करी सेवेसाठी अधिकारी तयार करणारी मानाची संस्था आहे. आतापर्यंत देशाच्या तिन्ही दलांना जवळपास ३६ हजार अधिकारी दिले आहेत. जवळपास ३० लष्करप्रमुख दिले आहेत. या ठिकाणी मिळणारे प्रशिक्षण अति उच्च दर्जाचे आहे. विद्यार्थ्यांनी ३ वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आता भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.’’प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर, प्रबोधिनीचे उपप्रमुख रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.२५० विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवीराष्ट्रीय संरक्षण प्रबोधनिच्या १३३व्या तुकडीतील २५० विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी बहाल करण्यात आली. यात बॅचलर आॅफ सायन्सचे ५६, बॅचलर आॅफ कॉम्प्युटर सायन्सचे १४६ आणि बॅचलर आॅफ आर्ट्सच्या ४८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या वेळी विद्यार्थ्यांचे पालक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ३ वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून हे सर्व विद्यार्थी पायदळ, वायुदल तसेच नौदलात सेवा बजावण्यासाठी सिद्ध झाले.आज रंगणार संचलन सोहळाराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३३व्या तुकडीचा संचलन सोहळा पार पडणार आहे. यानंतर हे विद्यार्थी पुढील लष्करी शिक्षणासाठी एनडीएतून बाहेर पडतील.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून किरगीझ रिपब्लिकचे लष्करप्रमुख रेमबेरडी दुशेनबीएव्ह उपस्थित राहणार आहेत. सूर्यकिरण या विमानांचे प्रात्यक्षिक हे या सोहळ्याचे आकर्षण असेल.तीन वर्षांचा काळ आव्हानात्मकलहानपणापासून लष्करात दाखल होण्याचे स्वप्न होते. आज ते पूर्ण झाले आहे. एनडीएतील तीन वर्षे खूप आव्हानात्मक होती. सकाळी उठल्यापासून ते दिवस संपेपर्यंत रोज नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत होते. मात्र, प्रशिक्षणादरम्यान सोबत असलेल्या मित्रांमुळे ही आव्हानांना सामोरे जाऊ शकलो, असे बॅचलर आॅफ सायन्स विभागातील कमांडंट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ आर्मी स्टाफ ट्रॉफीचा मानकरी गुरुवंशसिंग गोसाल याने सांगितले. गुरुवंश हा पंजाबमधील उपनगर येथील आहे. त्याचे वडील कृषी विभागात अधिकारी आहेत. लष्कराची घरात कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्याने हे यश मिळविले आहे. लष्करात आघाडीवर काम करायचे आहे. जम्मू-काश्मीर तसेच देशांच्या विविध सीमांवर जवानांची आज गरज आहे. यासाठी पायदळात दाखल होण्याचा निर्णय घेतल्याचे गोसाल याने सांगितले.व्यक्तिमत्त्वात मोठा बदलएनडीएत तीन वर्षांत मिळलेल्या प्रशिक्षणादरम्यान खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. शिस्त, अनुशासन आणि वक्तशीरपणा यामुळे व्यक्तिमत्त्वात मोठा बदल झाल्याचे कला शाखेतील कमांडंट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ एअर स्टाफचा मानकरी राहुल बिष्ट याने सांगितले. देशात दहशतवादाचा प्रश्न गंभीर आहे. तसेच, सीमेवर शत्रुराष्ट्राकडून कुरापती काढल्या जातात. या आव्हानाला तोंड देण्यासाठी लष्करात जाण्याचा निर्णय राहुलने घेतला आहे. राहुल बिष्ट हा मूळचा देहरादूनचा आहे. त्याचे वडील निवृत्त आॅनररी कॅप्टन असून लष्करात दाखल होण्याचे बाळकडू त्याला त्याच्या वडिलांकडून मिळाले आहे.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शिकण्याचे स्वप्न पूर्णभारतीय लष्कराचे लहानपणापासून आकर्षण होते. बाबा नौदलात अधिकारी असल्याने त्यांना पाहून लष्करात जाण्याची इच्छा प्रबळ झाली होती. लष्करी शिक्षण हे एनडीएतून घेण्याचे माझे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आहे, असे बीएस्सी कॉप्म्युटर सायन्स विभागातील कमांडंट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ नेव्हल स्टाफ ट्रॉफीचा मानकरी अनमोल अग्रहरीयाने सांगितले. अनमोल हा मध्य प्रदेशातील जबलपूर येथील आहे. तीन वर्षांच्या काळात सांघिक जीवन आणि शिस्त या गोष्टी अंगीभूत झाल्या. भविष्यात नौदलात नेव्हीगेशन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय लष्कर