शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

सलग दुसऱ्या वर्षीही बारावीचा टक्का घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 06:59 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८५.८८ टक्के लागला.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८५.८८ टक्के लागला. सलग दुसºया वर्षी निकालाचा टक्का घसरला आहे. त्याचबरोबर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येतही २० टक्क्यांनी घट झाली आहे.बारावीच्या निकालात मुंबई विभागीय मंडळातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचीही संख्या घटली आहे. यंदा मुंबईचा एकूण निकाल ८३.८५ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी तो ८७.४४ टक्के इतका होता. मात्र मुंबईतील सर्वाधिक तब्बल २,२१० विद्यार्थी हे नव्वदीपार असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील नव्वदीपार असलेल्या एकूण ४,४७० विद्यार्थ्यांपैकी जवळपास ५० टक्के विद्यार्थी मुंबईतील आहेत.सीबीएसई, आयसीएसई व इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांना मिळणाºया गुणांचा टक्का वेगाने वाढत असताना एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचा टक्का घटत आहे. त्यामुळे बारावीच्या गुणांवर प्रवेश मिळणाºया अभ्यासक्रमांसाठी एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठी स्पर्धा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यभरातून कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाचे एकूण १४,२१,९३६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी १२,२१,१५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल २०१७ मध्ये ८९.५० टक्के लागला होता. २०१८ मध्ये त्यात घट होऊन ८८.४१ टक्के इतका लागला, त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा निकाल ३ टक्क्यांनी घट झाली. २०१८ मध्ये राज्यभरात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाºयांची संख्या ५,४८६ इतकी होती, यंदा ४,४७० विद्यार्थ्यांना ही मजल मारता आली. तसेच यंदा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्याही केवळ १,०२,५५२ इतकी आहे. निकालात मुलींनी बाजी मारण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. विद्यार्थिनींचा ९०.२५ टक्के तर विद्यार्थ्यांचा निकाल ८२.४० टक्के इतका आहे. विभागनिहाय निकालामध्ये यंदाही कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर नागपूर विभाग शेवटच्या क्रमांकावर राहिले आहे. पुणे विभागाचा निकाल ८७.८८ टक्के इतका लागला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता निकाल घोषित केला. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता आॅनलाइन निकाल उपलब्ध करून देण्यात आला.> कोकणची बाजी१. निकालात मुलींनी बाजीमारण्याची परंपरा यंदाही कायम२. कोकण पुन्हा अव्वल तर नागपूर विभाग शेवटच्या क्रमांकावर३. दिव्यांग विद्यार्थ्यांचानिकाल ९२.६० टक्के५. एकूण १५१ विषयांपैकी २२ विषयांचा निकाल १०० टक्के६. आयपॅडवर परीक्षा देण्याची प्रथमच संधी दिलेल्या मुंबईची दिव्यांग निशिकाला ७३ टक्के>लक्ष ‘नीट’, ‘जेईई’कडेबारावी विज्ञानच्या प्रश्नपत्रिकांचे बदललेले स्वरूप, काठिण्य पातळीतील वाढ आणि विद्यार्थ्यांचे नीट, जईईकडेच असलेले लक्ष यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल ३.२५ टक्क्यांनी कमी लागला आहे. तुलनेने कला, वाणिज्यची घसरण कमी आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल