शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

सत्याचा शोध म्हणजे गुरूतत्वयोग : अभयकुमार सरदार; पुण्यात स्मरणिका प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 12:33 IST

जीवनातील सत्याचा शोध म्हणजे गुरुतत्त्वयोग, असे गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी सांगितले. गुरुतत्त्वयोग संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरदार बोलत होते.

ठळक मुद्देगुरुतत्त्वयोग विशिष्ट जात, धर्म, पंथ, विशिष्ट समाज किंवा माणसापुरता मर्यादित नाही : सरदारवर्तमानात जगताना स्वत:शी संवाद साधत, स्वत:चा शोध घेणे महत्त्वाचे : सुषमा देशपांडे

पुणे : माणूस हा प्राणी सर्वगुणसंपन्न असूनही तो दु:खी आहे. समाजात एकीकडे मोठ्या इमारती उभ्या आहेत तर दुसरीकडे लोकांना दोन वेळचे अन्न देखील मिळत नाही. अशी परिस्थिती का निर्माण झाली, याचे उत्तर शोधण्यासाठी गुरुतत्त्वाचे मार्गदर्शन गरजेचे आहे. गुरुतत्त्वातूनच संपूर्ण जीवनाचे आकलन होते. जीवनातील सत्याचा शोध म्हणजे गुरुतत्त्वयोग, असे गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी सांगितले.गुरुतत्त्वयोग संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरदार बोलत होते. या वेळी गुरुतत्त्ववेध या स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे, अभयकुमार सरदार, श्रीपाद पेंडसे, अरुण राजे, तेजा दिवाण यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे देखील उद्घाटन यावेळी करण्यात आले. गुरुतत्त्वयोग संस्थेचे विश्वस्त श्रीकृष्ण चितळे तसेच साधक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सरदार म्हणाले, ‘गुरुतत्त्व समजून घेवून ते आत्मसात केले तर आपण सहज जाणिवेत जातो आणि संपूर्ण जीवनाचे आकलन होते. गुरुतत्त्वयोग हा विशिष्ट जात, धर्म, पंथ, विशिष्ट समाज किंवा माणसापुरता मर्यादित नाही. गुरुतत्त्व स्वत: आत्मसात करून इतरांना त्यासाठी प्रेरीत करणे, ही सामाजिक गरज आहे. गुरुतत्त्वाचा विचार लोकांपर्यंत पोहचवला तर समाजात बदल घडेल.’

सुषमा देशपांडे म्हणाल्या, ‘महात्मा ज्योतिबा फुले यांचा अभ्यास करीत असताना मी त्यांची तत्त्वे आपोआप आत्मसात करू लागले. स्वत: स्वत:शी संवाद साधणे हा माझ्या लेखनाचा मुख्य भाग आहे. आपण स्वत:शी संवाद साधत जगलो तर भूतकाळ आणि भविष्याच्या पलीकडे जाऊन जगू शकतो. वर्तमानात जगताना स्वत:शी संवाद साधत, स्वत:चा शोध घेणे महत्त्वाचे आहे.’ गुरुतत्त्वाला अनुसरुन विविध विषयांवर प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते. तेजा दिवाण यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Puneपुणे