शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सत्याचा शोध म्हणजे गुरूतत्वयोग : अभयकुमार सरदार; पुण्यात स्मरणिका प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 12:33 IST

जीवनातील सत्याचा शोध म्हणजे गुरुतत्त्वयोग, असे गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी सांगितले. गुरुतत्त्वयोग संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरदार बोलत होते.

ठळक मुद्देगुरुतत्त्वयोग विशिष्ट जात, धर्म, पंथ, विशिष्ट समाज किंवा माणसापुरता मर्यादित नाही : सरदारवर्तमानात जगताना स्वत:शी संवाद साधत, स्वत:चा शोध घेणे महत्त्वाचे : सुषमा देशपांडे

पुणे : माणूस हा प्राणी सर्वगुणसंपन्न असूनही तो दु:खी आहे. समाजात एकीकडे मोठ्या इमारती उभ्या आहेत तर दुसरीकडे लोकांना दोन वेळचे अन्न देखील मिळत नाही. अशी परिस्थिती का निर्माण झाली, याचे उत्तर शोधण्यासाठी गुरुतत्त्वाचे मार्गदर्शन गरजेचे आहे. गुरुतत्त्वातूनच संपूर्ण जीवनाचे आकलन होते. जीवनातील सत्याचा शोध म्हणजे गुरुतत्त्वयोग, असे गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी सांगितले.गुरुतत्त्वयोग संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरदार बोलत होते. या वेळी गुरुतत्त्ववेध या स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे, अभयकुमार सरदार, श्रीपाद पेंडसे, अरुण राजे, तेजा दिवाण यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे देखील उद्घाटन यावेळी करण्यात आले. गुरुतत्त्वयोग संस्थेचे विश्वस्त श्रीकृष्ण चितळे तसेच साधक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सरदार म्हणाले, ‘गुरुतत्त्व समजून घेवून ते आत्मसात केले तर आपण सहज जाणिवेत जातो आणि संपूर्ण जीवनाचे आकलन होते. गुरुतत्त्वयोग हा विशिष्ट जात, धर्म, पंथ, विशिष्ट समाज किंवा माणसापुरता मर्यादित नाही. गुरुतत्त्व स्वत: आत्मसात करून इतरांना त्यासाठी प्रेरीत करणे, ही सामाजिक गरज आहे. गुरुतत्त्वाचा विचार लोकांपर्यंत पोहचवला तर समाजात बदल घडेल.’

सुषमा देशपांडे म्हणाल्या, ‘महात्मा ज्योतिबा फुले यांचा अभ्यास करीत असताना मी त्यांची तत्त्वे आपोआप आत्मसात करू लागले. स्वत: स्वत:शी संवाद साधणे हा माझ्या लेखनाचा मुख्य भाग आहे. आपण स्वत:शी संवाद साधत जगलो तर भूतकाळ आणि भविष्याच्या पलीकडे जाऊन जगू शकतो. वर्तमानात जगताना स्वत:शी संवाद साधत, स्वत:चा शोध घेणे महत्त्वाचे आहे.’ गुरुतत्त्वाला अनुसरुन विविध विषयांवर प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते. तेजा दिवाण यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Puneपुणे