शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘भारत बंद’मुळे शाळांचा उडाला गोंधळ, काही बंद, तर काही ठिकाणी लवकर सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 01:10 IST

विरोधी पक्षांच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंददरम्यान शाळांना सुट्टी द्यायची की शाळा सुरू ठेवायच्या यावरून शाळांमध्ये गोंधळ उडाला.

पुणे : विरोधी पक्षांच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंददरम्यान शाळांना सुट्टी द्यायची की शाळा सुरू ठेवायच्या यावरून शाळांमध्ये गोंधळ उडाला. काही शाळांनी सुट्ट्या दिल्या तर काहींनी सोमवारी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र सकाळी एका शाळेच्या स्कूलबसवर दगडफेक झाल्याचे समजताच अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आले.रविवारी सायंकाळी भारत बंद राहणार असल्याच्या बातम्या दाखविल्या जाऊ लागल्या. त्या वेळी सोमवारी शाळा सुरू राहणार आहे का याची विचारणा अनेक पालकांनी शाळांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून शिक्षकांकडे केली होती. मात्र अनेक शाळा प्रशासनांनी शाळा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेला पाठविले. मात्र सकाळी बंदची तीव्रता वाढू लागल्यानंतर अर्ध्यातूनच शाळा सोडण्यात आल्या, त्यामुळे विद्यार्थी व पालकांची मोठी गैरसोय झाली. अनेक ठिकाणी स्कूलबस न आल्याने विद्यार्थी शाळेला जाऊ शकले नाहीत, त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होती.सायंकाळी सहानंतर बंद मागे घेतला जाणार असल्याने स्प्रिंगडेल शाळेने मुलांना सायंकाळी सहानंतर घरी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व पालकांना फोन वमेसेज करून आपल्या पाल्यांना संध्याकाळी सहानंतर सोडण्यातयेईल असे सांगितले. त्यामुळेमुलांना उशिरापर्यंत शाळेत ताटकळत राहावे लागले.हुजूरपागा, हचिंग्स स्कूल, विबग्योअर स्कूल, सिंहगड, बिशप्स स्कूल आदी शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून आले. सकाळी स्कूल बसच्या तोडफोडीचे मेसेज व फोटो व्हायरलने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. काही शाळांनी मात्र सावध पवित्रा घेत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.>महाविद्यालयांचासंमिश्र प्रतिसादएनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची भेट घेऊन महाविद्यालये बंद करण्याची विनंती केली.त्याला महाविद्यालयांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांनी सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अथवा संलग्न महाविद्यालयांनी बंदमध्ये सहभाग घेतला नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.>बंदमध्ये युवक सहभागीबंदमध्ये युवकांनी सक्रिय सहभाग घेतला. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.पर्वती विधानसभा मतदारसंघात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. संबंधित दुकानदार व पेट्रोलपंप चालकांना विनंती केल्याने सिटीप्राईड थिएटर, परिसरातील दुकाने तसेच पेट्रोलपंप बंद ठेवले. संतोष नांगरे, अमोल ननावरे, संजय दामोदरे, करण गायकवाड आदी सहभागी होते.युवक कॉँग्रेसच्या वतीने डेक्कन येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. अमिर शेख, विकास लांडगे, सोनाली मारणे, भूषण रानभरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Schoolशाळा