शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

‘भारत बंद’मुळे शाळांचा उडाला गोंधळ, काही बंद, तर काही ठिकाणी लवकर सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 01:10 IST

विरोधी पक्षांच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंददरम्यान शाळांना सुट्टी द्यायची की शाळा सुरू ठेवायच्या यावरून शाळांमध्ये गोंधळ उडाला.

पुणे : विरोधी पक्षांच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंददरम्यान शाळांना सुट्टी द्यायची की शाळा सुरू ठेवायच्या यावरून शाळांमध्ये गोंधळ उडाला. काही शाळांनी सुट्ट्या दिल्या तर काहींनी सोमवारी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र सकाळी एका शाळेच्या स्कूलबसवर दगडफेक झाल्याचे समजताच अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आले.रविवारी सायंकाळी भारत बंद राहणार असल्याच्या बातम्या दाखविल्या जाऊ लागल्या. त्या वेळी सोमवारी शाळा सुरू राहणार आहे का याची विचारणा अनेक पालकांनी शाळांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून शिक्षकांकडे केली होती. मात्र अनेक शाळा प्रशासनांनी शाळा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेला पाठविले. मात्र सकाळी बंदची तीव्रता वाढू लागल्यानंतर अर्ध्यातूनच शाळा सोडण्यात आल्या, त्यामुळे विद्यार्थी व पालकांची मोठी गैरसोय झाली. अनेक ठिकाणी स्कूलबस न आल्याने विद्यार्थी शाळेला जाऊ शकले नाहीत, त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होती.सायंकाळी सहानंतर बंद मागे घेतला जाणार असल्याने स्प्रिंगडेल शाळेने मुलांना सायंकाळी सहानंतर घरी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व पालकांना फोन वमेसेज करून आपल्या पाल्यांना संध्याकाळी सहानंतर सोडण्यातयेईल असे सांगितले. त्यामुळेमुलांना उशिरापर्यंत शाळेत ताटकळत राहावे लागले.हुजूरपागा, हचिंग्स स्कूल, विबग्योअर स्कूल, सिंहगड, बिशप्स स्कूल आदी शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून आले. सकाळी स्कूल बसच्या तोडफोडीचे मेसेज व फोटो व्हायरलने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. काही शाळांनी मात्र सावध पवित्रा घेत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.>महाविद्यालयांचासंमिश्र प्रतिसादएनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची भेट घेऊन महाविद्यालये बंद करण्याची विनंती केली.त्याला महाविद्यालयांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांनी सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अथवा संलग्न महाविद्यालयांनी बंदमध्ये सहभाग घेतला नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.>बंदमध्ये युवक सहभागीबंदमध्ये युवकांनी सक्रिय सहभाग घेतला. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.पर्वती विधानसभा मतदारसंघात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. संबंधित दुकानदार व पेट्रोलपंप चालकांना विनंती केल्याने सिटीप्राईड थिएटर, परिसरातील दुकाने तसेच पेट्रोलपंप बंद ठेवले. संतोष नांगरे, अमोल ननावरे, संजय दामोदरे, करण गायकवाड आदी सहभागी होते.युवक कॉँग्रेसच्या वतीने डेक्कन येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. अमिर शेख, विकास लांडगे, सोनाली मारणे, भूषण रानभरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Schoolशाळा