शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

पालावरची बिनभिंतीची शाळा! एक अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 04:29 IST

ज्या समाजात पिढीजात शिक्षण नाही, दर काही महिन्यांनी त्यांची राहण्याची जागा बदलते, कामाचं ठिकाण बदलतं, रोज मजुरी मिळेलच याची खात्री नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांचा सतत ससेमिरा झेलत जीवन जगणारा समाजातील असा एक उपेक्षित घटक म्हणजे पोतराज.

- सुनील जगतापउरुळी कांचन : ज्या समाजात पिढीजात शिक्षण नाही, दर काही महिन्यांनी त्यांची राहण्याची जागा बदलते, कामाचं ठिकाण बदलतं, रोज मजुरी मिळेलच याची खात्री नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांचा सतत ससेमिरा झेलत जीवन जगणारा समाजातील असा एक उपेक्षित घटक म्हणजे पोतराज.अशा उपेक्षित समाजाच्या आयुष्यात नवचैतन्य आणण्याचे काम सोरतापवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रांजली चौधरी (ढगे)या करीत आहेत. प्रांजली या समाजातील नव्या पिढीला अक्षरओळख करून देऊन त्यांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधकारदूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्या समाजात एक नवचैतन्य आणायचे काम करीत आहेत. यामागेत्यांचे प्रयोजन काय असे विचारले असता, केवळ आनंद व या उपेक्षित समाजाची शैक्षणिक परवड थांबविताना मिळणारे मानसिक समाधान वेगळेच असल्याचेमत प्रांजली चौधरी (ढगे) यांनीव्यक्त केले.याबद्दल अधिक माहिती देताना प्रांजली म्हणाल्या की, आमच्या वस्तीवर डोंगराच्या बाजूला असलेल्या माळरानावर आपली पालं टाकून ही दहा-बारा कुटुंबं दरवर्षी काही काळ राहायला येतात. यात एक वर्ष वयापासून अठरा-वीस वयाच्या मुला-मुलींचा समावेश आहे. मात्र, त्यांचा अबकड या मराठी भाषेतील बाराखडीतील अक्षरांशी कसलाच संबंध आलेला नसल्याने दैनंदिन जीवनात वावरताना त्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते आणि काही वेळा फसवणूक, अडवणूक वा काही अपमानालाही सामोरं जावं लागतं.या गोष्टी ध्यानात घेऊन प्रांजली चौधरी (ढगे) यांनी त्या खासगी कंपनीतील आपले काम संपवून घरी आल्यावर या मुला-मुलींशी जवळीक साधून त्यांची शिक्षणाच्या बाबतीत काय अडचण आहे व ती कशी दूर करायची याबाबत माहिती घेतली आणि नंतर त्यांच्या अनपड आई-वडिलांशी चर्चा करून त्यांना दररोज सायंकाळी अबकड शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या माळावरच्या बिनभिंतीच्या शाळेत एक एक करत जवळपास २५ मुलं-मुली शिकू लागली व त्यांच्या आयुष्याच्या नव्या बदलाची खरी सुरुवात झाली.कामाचं चीज होतंयया शाळेत शिकायला वयाची अट नसल्याने एक लग्न झालेली जोडी पण अबकड शिकत आहे आणि आपली मुले शिकत असताना बघून त्यांचे अशिक्षित आई-वडील पण समाधानी झाल्याचा वेगळाच अनुभव या ठिकाणी पाहायला मिळत आहे.यांचा अनुभव विचारले असता त्या म्हणाल्या, की मुलांना शिक्षणाची आवड आहे. अभ्यासाची गोडीही निर्माण झाली आहे आणि मुलांची लिखाण व वाचनात छान प्रगती होत असताना दिसत आहे. त्यांचे अक्षरही मोत्यासारखे आहे. मुलांची आकलनशक्ती वाढलेली आहे. त्यांच्यातील सुप्त गुण हळूहळू विकसित होत असताना दिसत आहेत. यामुळे आपणकरत असलेल्या कामाचं चीजहोत आहे याचं समाधान काही वेगळंच आहे..प्रांजलीच्या कार्यामुळेअनेक निरागस मुलांच्या आयुष्यात सोनेरी पहाटयेऊन त्यांच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळेल हेमात्र निश्चित.

टॅग्स :Schoolशाळा