शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

व्यसनमुक्तीसाठी संतांचे विचार महत्वाचे : प्रतिभाताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 15:04 IST

सरकार लाखो रुपयांच्या योजना राबविते. त्यातील ५० टक्के रक्कम व्यसनांमध्ये जात असेल, तर त्या योजनांचा काय उपयोग ? : प्रतिभाताई पाटील

ठळक मुद्देसुमंतजी महाराज नलावडे यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा

पुणे : सरकार लाखो रुपयांच्या योजना राबविते. त्यातील ५० टक्के रक्कम व्यसनांमध्ये जात असेल, तर त्या योजनांचा उपयोग नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी संतांचे विचार महत्वाचे आहेत. संतांचे हे विचार समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. देशातील गरिबी हटवण्यासाठी, देश व्यसनमुक्त करण्यासाठी संतांचे विचार महत्वाचे आहे, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. संत तुकाराम महाराज सेवा प्रतिष्ठान व सुमंतजी महाराज नलावडे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा समिती यांच्या वतीने वारकरी संप्रदायातील अध्वर्यु व्यक्तिमत्व, ज्येष्ठ कीर्तनकार भागवताचार्य गुरुवर्य सुमंतजीमहाराज नलावडे (ओतुरकर) यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आणि मीराबाई सुमंतमहाराज नलावडे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. यावेळी मारुती महाराज कु-हेकर, स्वागताध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, बालयोगी सदानंद महाराज, माजी आमदार उल्हास पवार, शरद सोनावणे, सत्यशील शेरकर, शरद लेंडे, अतुल बेनके, उर्मिला विश्वनाथ कराड, चंद्रकांत महाराज वांजळे, संभाजी खोमणे, महेश महाराज नलावडे, प्रा.सागर शेडगे, अनंत सुतार उपस्थित होते.  प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, ‘महाराष्ट्रात मंत्री म्हणून कार्यरत असताना सन १९७४ ते १९७५ च्या सुमारास भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळेला सरकारने दुष्काळासाठी योजना राबविली होती. शेतात काम करणा-या मजुराला रोजच्या कमाईपेक्षा जास्त पैसे मिळत होते. परंतु त्यातील ५० टक्के लोक ते पैसे व्यसनांसाठी खर्च करीत असल्याचे निदर्शनास आले. गरिबी हटवण्यासाठी सरकारी योजनेचा काहीच उपयोग होत नव्हता.’     मारुती महाराज कु-हेकर म्हणाले, ‘भारत ही संतांची भूमी आहे. संतांनी दिलेली अध्यात्माची देणगी पुढे नेण्याचे काम सुमंत महाराज करत आहेत. संतांचा हा वारसा चालवणा-या लोकांची समाजाला गरज आहे.   चंद्रकांत वांजळे यांनी प्रास्ताविक केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र नलावडे यांनी आभार मानले.  

टॅग्स :PuneपुणेPratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलGovernmentसरकारgovernment schemeसरकारी योजना