शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नीरेच्या प्रदूषणाबाबत सांगवीकरांचे पवारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 04:09 IST

पाण्याचा प्रश्न गंभीर : पवारांनी केली नीरेच्या प्रदूषणाची पाहणी

सांगवी : दिवसेंदिवस नीरा नदीच्या प्रदूषणा बाबत गंभीर समस्या उद्भवत असून नीरा नदी काठच्या शेतकऱ्यांनी प्रशासना विरोधात आवाज उठवून त्यांच्या असंवेदनशील कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सांगवी ग्रामस्थांनी फलटण दौºयावर निघालेले माजी कृषी मंत्री शरद पवार यांना शुक्रवारी (दि.२२) रोजी सकाळी अकरा वाजता सांगवीत निवेदनाद्वारे लक्ष घालण्यासाठी साकडे घातले आहेत.

सांगवी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पाणी प्रदूषणाची पहाणी करण्याची विनंती केल्याने त्याला प्रतिसाद देताना पवार यांनी देखील तातडीने बारामती फलटण रस्त्यावरील नीरा नदीच्या पूलावरून प्रदूषित झालेल्या पाण्याची प्रत्यक्ष पहाणी केली. तर प्रदूषित पाणी सोडून देणाºया संबंधीत संस्थांशी बोलून मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन याबाबत जातीने लक्ष घालून चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.दिवसेंदिवस नीरा नदीच्या पाण्याचा विषय गंभीर स्वरूपाचा होत चालला आहे. फलटण तालुक्यातील खासगी कंपनी, कारखाने, कत्तलखाने यातून ओढ्यामार्फत कोणत्याही प्रकारे पाण्यावर प्रक्रिया न करता केमिकलयुक्त पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे हजारो शेतकºयांच्या शेती नापीक होण्याच्या मार्गावर असून, पाण्यावर मृत माश्यांचा खच मोठ्या प्रमाणात साचत असून याच पाण्याचा तीथक्याच प्रमाणात उग्र वास देखील येत होता. या पाण्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून पाण्याच्या प्यायल्याने जनावरांनादेखील इजा होत आहे.यावेळी राहुल तावरे, किरण तावरे, उपसरपंच प्रमोद शिपकूले, पोपट तावरे आदी ग्रामस्थउपस्थित होते.प्रदूषण न रोखल्यास निवडणुकीवर बहिष्कार४प्रदुषणामुळे नदी काठचे हजारो शेतकºयांची शेती धोक्यात आली. त्यामुले शेतकºयांनी वारंवार प्रशासनाला लेखी निवेदन दिले. मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. यामुळे ग्रामस्थांनी आगामी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पावीत्रा घेतला होता. त्याबाबत ग्रामस्थांनी शरद पवार यांच्याकडेही हा इशारा दिला. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवार