शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

संमेलन अध्यक्षपदाची जागा माझी नाही : डॉ. गणेश देवी; राजन खान यांनी घेतली मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:06 IST

अक्षरमानव आणि अक्षरधाराच्या वतीने आयोजित ‘डॉ़ देवींच्या मनात काय आहे’ या कार्यक्रमात साहित्यिक राजन खान यांनी डॉ. गणेश देवी यांची मुलाखत घेतली.

ठळक मुद्दे'हिंसा हा प्रगतीचा पाया होऊ शकत नाही''आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्य संमेलन ही चांगली जागा'

पुणे :आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्य संमेलन ही चांगली जागा आहे. पण ती आपली जागा नाही... अशा शब्दांत ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याला नम्रपणे नकार दर्शविला. मात्र, यंदाच्या वर्षी पुण्यात जागतिक साहित्य संमेलन घेणार असून, विविध देशांमधून १५0 साहित्यिकांना आमंत्रित करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.     अक्षरमानव आणि अक्षरधाराच्या वतीने आयोजित ‘डॉ़ देवींच्या मनात काय आहे’ या कार्यक्रमात साहित्यिक राजन खान यांनी डॉ. गणेश देवी यांची मुलाखत घेतली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून खान यांनी त्यांना छेडले असता त्यांनी प्रांजळपणे ती आपली जागा नसल्याचे सांगत प्रश्नाला बगल दिली, परंतु स्वत: जागतिक साहित्य संमेलन भरविणार असल्याचे जाहीर केले. तेजगडमध्ये आदिवासींसाठी कार्य करण्याच्या उद्देशाविषयी भाष्य करताना ते म्हणाले, १९२0 पर्यंत राजकीय नेत्यांना आदिवासी कोण हे माहीत नव्हतं. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे सरकार म्हणाले, आदिवासींना त्यांचे त्यांचे जगू द्या, तर एनडीए सरकार म्हटले त्यांना मुख्य प्रवाहात आणायला हवं. अरे, पण आदिवासींना तरी कुणीतरी विचारायला नको का की त्यांना कुठं जायचंय? हे कुणीच केले नसल्याने आम्हीच त्यांना विचारायचं ठरवलं. आज आदिवासी भागांमध्ये हातात बंदुका घेऊन नक्षलवादी आपली प्रगती करू इच्छित आहेत; 

पण हिंसा हा प्रगतीचा पाया होऊ शकत नाही.  अहिंसक मार्गानेच हा लढा लढावा लागणार आहे.

टॅग्स :Rajan Khanराजन खानPuneपुणेBaroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन